राम मंदिर भूमिपूजन : बद्रीनाथमधून माती आणि अलकनंदा नदीचे पाणी आयोध्येला रवाना!

    28-Jul-2020
Total Views | 46

ram mandir_1  H


५ ऑगस्टला पार पडणार राम मंदिर भूमिपूजन सोहळा!

मुंबई : अयोध्या येथे उभारण्यात येणाऱ्या राम मंदिराकचे ५ ऑगस्ट रोजी भूमिपूजन होणार आहेत. यासाठी बद्रीनाथ येथून माती आणि अलकनंदा नदीचे पाणी अयोध्या येथे पाठवण्यात आले आहे. विश्व हिंदू परिषदेचे प्रतिनीधी सोमवारी अयोध्या येथे अलकनंदा नदीचे पाणी आणि बद्रीनाथ येथील माती घेऊन गेले.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ५ ऑगस्ट रोजी राम मंदिराचे भूमिपूजन होणार आहे. या कार्यक्रमासाठी देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी केवळ २०० लोक उपस्थित असतील. त्यापैकी १५० आमंत्रित पाहुणे असतील. तसेच कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टसिंग पाळून हा कार्यक्रम पार पडणार आहे.


राम मंदिर उभारण्यापूर्वी जमिनीत २००० फूट खाली एक टाईम कॅप्सूल पुरण्यात येणार आहे. भविष्यात पुढील पिढ्यांना राम मंदिर आणि त्याच्या इतिहास याविषयी माहिती देण्यासाठी ही कॅप्सुल उपयुक्त ठरेल. तसेच वर्तमानातील विविध घटना यामध्ये नमूद केल्या जातील, अशी माहिती राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सदस्य चौपाल यांनी काल दिली होती. त्यानंतर आता भूमिपूजनाच्या कार्यक्रमापूर्वी त्या संदर्भातील पूर्वतयारीला वेग आला आहे.




अग्रलेख
जरुर वाचा
तस्करीतील परदेशी वन्यजीवांना परत पाठवण्याची जबाबदारी विमान कंपन्यांचीच - DGCA

तस्करीतील परदेशी वन्यजीवांना परत पाठवण्याची जबाबदारी विमान कंपन्यांचीच - DGCA

विमानतळावर दाखल झालेल्या परदेशी वन्यजीवांना पुन्हा आलेल्या देशी धाडण्याची जबाबदारी ही विमान कंपन्यांचीच असल्याची स्पष्टोक्ती नागरी विमानवाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) दिली आहे (exotice live animal). यासंबंधीचे परिपत्रक त्यांनी २३ जुलै रोजी सर्व विमान कंपन्यांना पाठवले आहे (exotice live animal). गेल्या काही महिन्यांमध्ये परदेशी वन्यजीवांच्या तस्करीत वाढ झाल्याचे निदर्शनास आले होते. यासंबंधी मुंबई विमानतळावर मोठ्या प्रमाणात आलेल्या परदेशी वन्यजीवांच्या तस्करीचे वार्तांकन सर्वप्रथम दै. मुंबई तरुण भारतने ..

विजय सत्याचा, विजय न्यायाचा, विजय हिंदुत्वाचा!

विजय सत्याचा, विजय न्यायाचा, विजय हिंदुत्वाचा!

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण अत्यंत संवेदनशील आणि तितकेच वादग्रस्तही ठरले. या खटल्यात हिंदुत्ववादी व्यक्ती आणि संघटनांना नाहक गोवून बेछूट आरोप, असहनीय शारीरिक-मानसिक अत्याचार तर झालेच; पण तत्कालीन सत्ताधारी काँग्रेसची मजल ‘भगवा दहशतवाद’ असा शब्दप्रयोग रुढ करण्यापर्यंत गेली. पण, तब्बल १७ वर्षांच्या प्रदीर्घ न्यायालयीन लढ्यानंतर काल या खटल्याचा लागलेला निकाल म्हणजे, ‘भगवा दहशतवादा’चे कुभांड रचणार्‍यांना लगावलेली जोरदार चपराकच! त्यामुळे हिंदू धर्माविषयी कितीही असत्य पेरले, पसरवले, तरी शेवटी विजय सत्याचा, न्यायाचा..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121