डहाणू : पालघरमध्ये गडचिंचली भागात जमावातर्फे कट रचून साधूंची हत्या झाल्यानंतर या प्रकरणी आणखी एक संशय बळावत आहे. ज्या गडचिंचली भागांत साधूंची हत्या झाली त्या भागात तब्बल १८ चर्च आणि मिशनऱ्यांच्या हालचाली सुरू असल्याची बाब उजेडात आली आहे. अत्यंत कमी लोकवस्ती असलेल्या या भागात इतक्या मोठ्या संख्येने चर्च आणि मिशनऱ्या केव्हा उभ्या राहिल्या हा देखील प्रश्न आहे.
पालघरचे गडचिंचली हे गाव साधूंची हत्या झाल्यामुळे प्रकाशात आले. अत्यंत तुरळक वस्ती असलेल्या भागात इतर सोईसुविधाही तशा फारशा नाहीत. ज्या भागात हे हत्याकांड झाले तिथून पोलीस चौकीही ४५ मिनिटांच्या अंतरावर असल्याचे खुद्द राज्य सरकारने स्पष्ट केले आहे. मात्र, अशा या दुर्गभ भागात १८ चर्च किंवा तत्सम ख्रिस्ती मिशनऱ्यांचे कामकाज सुरू असल्याचे समजते. मिशनऱ्यांच्या माध्यमातून इथे धर्मप्रसारण केले जात असल्याचे यापूर्वीच उघड झाले आहे.