अर्थसंकल्प खरोखरच सोप्या भाषेत समजविणारे पुस्तक

    14-Mar-2020
Total Views | 128


budget_1  H x W


अर्थसंकल्प वाचतानासुद्धा काही तत्त्वे समजावून घेतल्याशिवाय त्याचा अन्वयार्थ आणि तिचे राज्याच्या अर्थव्यवस्थेवर होणारे परिणाम समजावून घेता येत नाहीत. थोडक्यात, अर्थसंकल्प समजावून घेणे ही एक अशी कळीची प्रक्रिया आहे, जिथे लोकशिक्षण अत्यावश्यक होऊन बसले आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व अभ्यासू लोकप्रतिनिधी म्हणून प्रसिद्ध असलेल्या देवेंद्र फडणवीसांनी लिहिलेले 'अर्थसंकल्प सोप्या भाषेत..!' हे पुस्तक ही गरज अत्यंत सक्षमपणे पूर्ण करते.


सक्षम लोकशाही घडविण्यासाठी लोकशाहीचा पायाभूत घटक, तो म्हणजे मतदार, सक्षम असणे अत्यंत आवश्यक आहे. जशी वैयक्तिक आयुष्यात 'अर्थसाक्षरता' आवश्यक आहे असते, तशीच राष्ट्राच्या किंवा राज्याच्या अर्थव्यवस्थेविषयीसुद्धा 'अर्थसाक्षरता' असणे आवश्यक आहे. आपल्या राज्याची अर्थव्यवस्था कशी आहे, ती कोणत्या दिशेने जाते आहे, तिच्या पुढील वाटचालीत कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागणार आहे, हे मतदारांना स्पष्टपणे माहीत असणे आवश्यक आहे. असे असेल, तरच लोकशाहीतील सरकारांच्या आर्थिक धोरणावर मतदारांचा योग्य तो वचक राहील. असे जेव्हा नसते तेव्हा शासनकर्त्यांना लोकानुनय करणारी, शासनाची तात्कालिक लोकप्रियता वाढविणारी, परंतु दीर्घकाळात अर्थव्यवस्थेचे नुकसान करणारी उधळपट्टीची धोरणे अवलंबणे सोपे असते. अर्थव्यवस्थेचे आणि पर्यायाने राज्यातील सर्वसामान्य मतदाराला शासनाच्या आर्थिक धोरणाचा 'अर्थ' व्यवस्थित लावता यायला हवा. शासनाच्या आर्थिक धोरणाचे सर्वात मोठे प्रतिबिंब त्या त्या राज्याच्या अर्थसंकल्पातून दिसत असते. अर्थसंकल्प वाचणे आणि समजावून घेणे हे वाटते तितके सोपे नसते. सर्वसाधारणपणे आपल्याकडे माध्यमातून फक्त वित्तमंत्र्यांच्या भाषणातून होणाऱ्या घोषणा म्हणजे जणू काय अर्थसंकल्पाची सर्व प्रक्रिया, असे समजून चर्चा होते. कित्येक माध्यमे तर वित्तमंत्र्यांचे भाषण सुरू असतानाचा 'तज्ज्ञां'कडून चर्चा चालवतात. परंतु, अर्थसंकल्पाचा 'अर्थ' लावणे इतके साधे आणि बाळबोध नसते. वित्तमंत्र्यांचे भाषण हा फारतर महत्त्वाचा एक भाग असतो. अर्थसंकल्प सादरीकरण, त्यावर चर्चा, त्याची मंजुरी ही एक प्रक्रिया असते. त्यात अनेक महत्त्वाच्या संज्ञा, ज्यांना अत्यंत विवक्षित असा अर्थ असतो, त्या वापरल्या जातात. या संज्ञांचा नीट अर्थ लावणे अत्यंत महत्त्वाचे असते. तसेच अर्थसंकल्पाची निर्मिती संविधानाच्या काही विशिष्ट अनुच्छेदांच्या चौकटीत होते. हे अनुच्छेद समजावून घेणे अत्यावश्यक असते. वित्तमंत्र्यांच्या भाषणाबरोबर राज्याची आर्थिक पाहणी, वार्षिक वित्तविषयक विवरण पत्र, अर्थसंकल्पीय अंदाज (भाग १ आणि भाग २) अर्थसंकल्पीय निवेदन, मध्यम मुदतीचे राज्यकोषीय धोरण, राज्यकोषीय धोरणाच्या व्यूहरचनेचे विवरण पत्र आणि प्रकटीकरणे, कार्यक्रम अंदाजपत्रक, वाणिज्यिक आणि अर्थ वाणिज्यिक स्वरुपाच्या योजनांचे आर्थिक अंदाज दाखविणारे विवरण पत्र, अशा अनेक इतर दस्तावेजांसोबत 'बजेट' सादर केले जाते. या दस्तावेजांचा धांडोळा घेतल्याशिवाय 'बजेट'चा 'अर्थ' नीटपणे लावता येत नाही.

 

अर्थसंकल्प वाचतानासुद्धा काही तत्त्वे समजावून घेतल्याशिवाय त्याचा अन्वयार्थ आणि तिचे राज्याच्या अर्थव्यवस्थेवर होणारे परिणाम समजावून घेता येत नाहीत. थोडक्यात, अर्थसंकल्प समजावून घेणे ही एक अशी कळीची प्रक्रिया आहे, जिथे लोकशिक्षण अत्यावश्यक होऊन बसले आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व अभ्यासू लोकप्रतिनिधी म्हणून प्रसिद्ध असलेल्या देवेंद्र फडणवीसांनी लिहिलेले 'अर्थसंकल्प सोप्या भाषेत..!' हे पुस्तक ही गरज अत्यंत सक्षमपणे पूर्ण करते. पुस्तकाचे पहिले प्रकरण परिचयात्मक आहे. परंतु, दुसऱ्या प्रकरणात अर्थसंकल्पविषयक संज्ञांचे मराठी आणि इंग्रजी शब्दप्रयोग दिले गेले आहेत. तिसऱ्या प्रकरणामध्ये यापैकी काही महत्त्वाच्या संज्ञांचे सटीक आणि थोडक्यात स्पष्टीकरण दिले आहे. अर्थसंकल्प वाचतानाया स्पष्टीकरणाची मदत घेतली, तर कित्येक बाबींचा उलगडा सहजपणे होईल. पुढील प्रकरणात संविधानातील अर्थसंकल्पविषयक तरतुदींचा ऊहापोह केला आहे. ज्या संविधानिक चौकटीत अर्थसंकल्प तयार होतो, त्या चौकटीचे स्पष्टीकरण या संकल्पनातून होते. पाचव्या प्रकरणामध्ये अर्थसंकल्पाची रचना स्पष्ट केली आहे. अर्थसंकल्प वाचताना 'काय आणि कुठे' याचे स्पष्टीकरण येथे केले जाते. हा भाग अभ्यासकांना आणि विशेषतः विद्यार्थ्यांना उपयुक्त आहे. या भागात लेखकाने थोडी अधिक उदाहरणे दिली असती तर विषय अधिक स्पष्टपणे कळला असता. सहाव्या प्रकरणात अर्थसंकल्प कसा तयार होतो, याची प्रक्रिया सांगितली आहे. त्यात आर्थिक शिस्तीचे महत्त्व विशद करण्यात आले आहे. सातव्या भागात अर्थसंकल्प समजावून घेण्यासाठी अर्थसंकल्पाला जोडून जी प्रकाशने असतात, त्यात विविध तर्‍हेचे बारकावे असतात, त्याचा परिचय करून दिलेला आहे. हा भाग अभ्यासकांसाठी आणि साधारण वाचकांसाठीसुद्धा अत्यंत महत्त्वाचा आहे. साधारणपणे आपल्यासाठी अगदी 'तज्ज्ञ' समजल्या गेलेल्या व्यक्तीसुद्धा फक्त अर्थसंकल्पाचे भाषण ऐकून अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देत असतात. पण, खरा 'मामला' त्या इतर प्रकाशनांमध्ये असतो. अर्थमंत्र्यांच्या भाषणाला जोडून त्या प्रकाशनांचा अभ्यास केल्यावरच आपल्याला अर्थसंकल्पाची समज येते. म्हणून हे प्रकरण अत्यंत महत्त्वाचे आहे. आपल्या प्रकरणात अर्थसंकल्पास मंजुरी मिळण्याची प्रक्रिया स्पष्ट केलेली आहे. शेवटच्या प्रकरणात अर्थसंकल्प वाचण्यासाठीची साधी मूलभूत तत्त्वे मांडलेली आहेत.

 

एकंदरीतच, सदर पुस्तक हे अत्यंत उपयुक्त छोटेखानी, सहजपणे वाचता येईल असे सोप्या भाषेत लिहिलेले आहे. विद्यार्थी, जिज्ञासू वाचक, तरुण राजकीय नेते, सर्वसामान्य मतदार, पत्रकार इत्यादींना उपयोगी पडेल असे पुस्तक आहे. या पुस्तकाची एक अधिक विस्तृत आवृत्ती काढावी, ज्यात अधिक उदाहरणे असतील. तसेच मागील वर्षाच्या अर्थसंकल्पाचा ऊहापोह करून त्याचे स्पष्टीकरण केले असेल, अशा स्वरुपाचे अधिक विस्तृत पुस्तक विविध अभ्यासकांना तसेच प्रशिक्षणार्थींना वगैरे फारच उपयोगी पडेल. तरीसुद्धा सध्याच्या सोप्या, सुटसुटीत आणि अत्यंत उपयुक्त पुस्तक लेखनाबद्दल फडणवीस जनतेच्या अभिनंदनाला नक्कीच पात्र आहेत...!

 
 

पुस्तकाचे नाव : अर्थसंकल्प सोप्या भाषेत!

लेखक : देवेंद्र गंगाधरराव फडणवीस

प्रकाशक : लाखे प्रकाशन, नागपूर, ४ मार्च, २०२०

पृष्ठसंख्या : ५१

मूल्य : रु. १००

 
 

- प्रा. नीरज हातेकर

अग्रलेख
जरुर वाचा
पोलिसांवर कट्टरपंथींची दगडफेक! अतिक्रमणाला विरोध केला म्हणून हिंदूंवरही हल्ला; शिव मंदिर परिसराची तोडफोड

पोलिसांवर कट्टरपंथींची दगडफेक! अतिक्रमणाला विरोध केला म्हणून हिंदूंवरही हल्ला; शिव मंदिर परिसराची तोडफोड

पश्चिम बंगालमधील दक्षिण २४ परगणा येथे हिंदूंवर आणि पोलिसांवर देखील काही इस्लामिक कट्टरपंथी जमावाने दगडफेक केल्याची घटना घडली आहे. येथील शिव मंदिराच्या जमिनीवरील अतिक्रमणाविरुद्ध हिंदू समुदायाच्या लोकांनी निषेध केला असता कट्टरपंथींनी मंदिरावरही हल्ला करत मंदिर परिसराची देखील तोडफोड केल्याचे दिसतेय. दरम्यान जमावाने पोलिसांवरही दगडफेक केली व परिसरातील दुकाने आणि वाहनांची तोडफोड केल्याचे निदर्शनास येतेय. यात पोलिसांसह अनेकजण जखमी झाल्याची माहिती आहे...

मालवणच्या राजकोट किल्ल्यावर शिवाजी महाराजांच्या नौदल पराक्रमाची गाथा मांडणारे संग्रहालय उभारणार

मालवणच्या राजकोट किल्ल्यावर शिवाजी महाराजांच्या नौदल पराक्रमाची गाथा मांडणारे संग्रहालय उभारणार

मालवणमधील राजकोट किल्ल्याच्या तटबंदीवर उभा असलेला शिवरायांचा ८३ फूट उंच पुतळा केवळ स्मारक नाही, तर मराठा आरमाराच्या तेजस्वी परंपरेचे जागृत प्रतीक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी समुद्रावर निर्माण केलेले भारतीय इतिहासातील पहिले स्वकीय आरमार, ही केवळ दूरदृष्टी नव्हे, तर सागरी सुरक्षिततेची स्वाभिमानी घोषणा होती. या परंपरेला नव्याने उजाळा देण्यासाठी राजकोट किल्ल्याच्या परिसरात ‘शिवआरमार’ संग्रहालय उभारण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला आहे. बुधवार, दि. ११ जून रोजी त्यास मंजुरी देण्यात आली...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121