एक दौड जलसंवर्धनासाठी !

    26-Feb-2020
Total Views | 80

Marathod 2020_1 &nbs






मुंबई : भारतातील सर्वात मोठी रासायनिक अभियांत्रिकी संस्था आयसीटीद्वारे १० आणि ५ किमी 'आयसीटी मॅरेथॉन'चे आयोजन करण्यात आले आहे. संस्थेतील विद्यार्थी संख्या कमी असूनदेखील गेली अनेक वर्षे त्यांनी अनेक धावपटूंची गर्दी सांभाळली आहे. विद्यार्थ्यांद्वारे आयोजित करण्यात आलेल्या या मॅरेथॉनमध्ये सर्व वयोगटातील धावपटू सहभागी होतील. पर्यावरण जनजागृती हे या मॅरेथॉनचे वैशिष्ट्य आहे.
 
 
भारतातील 'एमआरआर रेट'मध्ये 'आयसीटी मॅरेथॉन'चा नववा क्रमांक असून मुंबईतील तिसऱ्या क्रमांकाची मॅरेथॉन म्हणून नोंद आहे. 'आयसीटी'तर्फे यंदा जलसंवर्धन मोहिमेबद्दल जनजागृती अभियान राबवण्यात येणार आहे. पाणी संपुष्टात येण्यापूर्वी जागे व्हा, या धर्तीवर आयसीटीच्या 'वॅट-ए-रन', अशी थीम ठेवली आहे. मोठ्या संख्येने धावपटू दरवर्षी यात सहभागी होतात. २२ मार्च. २०२० रोजी जागतिक जल दिनानिम्मित्त जलसंवर्धन मोहिमेत मोठ्या संख्येने सहभागी व्हा!, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. नाव नोंदणीसाठी संपर्क : ९९२०५ ४९७७०
अग्रलेख
जरुर वाचा
जगन्नाथ रथयात्रा LIVE : ३०० टन वजन, ४५ फूट उंचीचा १६ चाकी जगन्नाथाचा रथ दरवर्षी बनवून नष्ट का केला जातो? काय आहे कारण?

जगन्नाथ रथयात्रा LIVE : ३०० टन वजन, ४५ फूट उंचीचा १६ चाकी जगन्नाथाचा रथ दरवर्षी बनवून नष्ट का केला जातो? काय आहे कारण?

भगवान जगन्नाथ यात्रेची सुरुवात दि. २७ जून रोजी ओडिशात सुरू होत आहे. ही पुरीतील वर्षानुवर्षांची पारंपारीक रथयात्रा आहे. भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा यांचे रथ तयार करण्यात आले आहेत. दरवर्षी दोनशेहून अधिक लोक फक्त ५८ दिवसांत ४५ फूट उंच तीन रथ तयार करतात. दरवर्षी तीन नवीन रथ बनवले जातात. नंदीघोष – भगवान जगन्नाथसाठी, या रथाला गरुड्ध्यज असेही संबोधले जाते. हे रथ बनवण्यासाठी तब्बल ८३२ लाकडांचा वापर केला जातो त्याचबरोबर याचे वजन २८० ते ३०० टन एवढे असते. या रथाची उंची ४५ फूट सहा इंच तर लांबी ३४ फूट सहा इंच ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121