मनुस्मृती व डॉ. आंबेडकरांवरील प्रश्नामुळे KBC वादात

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Nov-2020
Total Views |
KBC_1  H x W: 0



भाजप आमदार अभिमन्यू पवार यांनी केली एफआयर नोंदवण्याची मागणी

 
 
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल विचारलेल्या प्रश्नावरून वादंग उठल्यानंतर अमिताभ बच्चन निवेदन करत असलेला ‘कौन बनेगा करोडपती’ हा शो पुन्हा एकदा वादात सापडला आहे. सोनी टिव्ही आणि अमिताभ बच्चन यांच्याविरोधात भाजप आमदार अभिमन्यू पवार यांनी पोलीसांत तक्रार दाखल केली आहे. हिंदू व बौद्ध धर्मीयांमध्ये जाणीवपूर्वक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
 
 
 
पवार यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे. ते म्हणाले, “कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमाद्वारे हिंदू धर्मीयांची भावना दुखावल्याबद्दल तसेच अत्यंत सलोख्याने राहणाऱ्या हिंदू व बौद्ध धर्मीयांमध्ये जाणीवपूर्वक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल महानायक अमिताभ बच्चन व सोनी टेलिव्हिजन नेटवर्क विरोधात तक्रार नोंदवली आहे.”
 
 
 
“३० ऑक्टोबर २०२० रोजी प्रसारित झालेल्या ‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमात "२५ डिसेंबर १९२५ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अनुयायांसोबत कोणत्या धर्मग्रंथाच्या प्रति जाळल्या?" असा प्रश्न विचारला. आपल्या देशात अनेक धर्म असतानाही प्रश्नाखालील सर्वच्या सर्व पर्याय जाणीवपूर्वक हिंदू धर्माशी निगडितच देण्यात आले, अशा कृतीतून हिंदू धर्मग्रंथ हे जाळण्यायोग्यच असल्याचा संदेश देण्याचा तसेच जवळपास शतकापूर्वीची घटना चर्चेत आणून गुण्यागोविंदाने एकत्र राहणाऱ्या हिंदू व बौद्ध धर्मीयांमध्ये तेढ निर्माण करण्याचा आणि सामाजिक सलोखा बिघडवण्याचा खोडसाळ प्रयत्न लपून राहत नाही.”, असा थेट आरोप पवार यांनी केला आहे.
 
 
 
“हिंदू धर्म हा अत्यंत सर्जनशील व सर्वसमावेशक धर्म आहे. काळसुसंगत अनेक चांगले बदल आत्मसात करून हिंदू धर्म समृद्ध बनलेला आहे. पण स्यूडो सेक्युलॅरिझम ढोंग घेतलेले अनेक तथाकथित बुद्धीजीवी आपल्या वक्तव्यांच्या माध्यमातून नित्यनेमाने सहिष्णू हिंदू धर्मीयांच्या भावना दुखावत असतात. कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमात विचारण्यात आलेला प्रश्न हा त्याच विघातक प्रयत्नांचा भाग असून दुर्लक्षित केला जाऊ शकत नाही. लातूर पोलीस अधीक्षक यांच्याकडे मी लिखित तक्रार नोंदवली आहे. हा कार्यक्रम लातूर जिल्ह्यातही प्रसारित झाल्याने लातूर पोलीस गुन्हा नोंदवू शकतात लवकरच एफआरआय नोंदवला जाईल अशी अपेक्षा आहे.”, अशी माहिती त्यांनी दिली आहे.




 
 
@@AUTHORINFO_V1@@