मिशन मंगलची २०० कोटींची घोडदौड

    13-Sep-2019
Total Views | 26


अक्षय कुमार, विद्या बालन, सोनाक्षी सिन्हा, तापसी पन्नू, कीर्ती कुल्हारी, शर्मन जोशी, निथ्या मेनन, विक्रम गोखले, दलिप ताहिल यांच्यासारखी जबरदस्त स्टारकास्ट घेऊन 'मिशन मंगल' चित्रपटाचे यान देशभर प्रक्षेपित झाले. आणि आज या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तब्बल २०० कोटींची घोडदौड केली. या पार्श्वभूमीवर 'मिशन मंगल' २०० कोटींच्या क्लबमध्ये दाखल झाला.

'मिशन मंगल' ने आत्तापर्यंत २००.१६ कोटींची कमाई करत बॉक्स ऑफिसच्या यादीत तिसरे स्थान मिळवले आहे. पहिल्या स्थानावर ३४२.५३ कोटींची कमाई असलेला 'संजू' आहे, दुसऱ्या स्थानावर २१०.१६ कोटींची कमाई असलेला 'प्रेम रतन धन पायो' हा चित्रपट आहे आणि आता 'एक था टायगर या चित्रपटाला मागे टाकत 'मिशन मंगल' ने तिसरी जागा पटकावली आहे.

जगन शक्ती यांचा 'मिशन मंगल' हा दिग्दर्शक म्हणून पहिलाच चित्रपट. त्यामुळे पहिल्याच चित्रपटाला इतके भरभरून यश मिळाल्याने प्रेक्षकांकडून त्यांचे कौतुक होत आहे. दरम्यान त्यांनी 'इक्का' या आगामी चित्रपटाची घोषणा देखील केली आहे त्यामुळे प्रेक्षकांच्या अपेक्षा आता उंचावणार आहेत हे नक्की.

अग्रलेख
जरुर वाचा
कल्याणमध्ये चिमुकल्यांची शाळा मालवाहतूक टेम्पोमधूनच सुरू

कल्याणमध्ये चिमुकल्यांची शाळा मालवाहतूक टेम्पोमधूनच सुरू

ना दरवाजे, ना अटेंडंट, ना सुरक्षा विद्यार्थी लोंखडीपट्टयांना धरून करतात प्रवास अंबरनाथ मधील अपघाताच्या घटनेने संपूर्ण राज्याला हादरवून सोडले असतानाच कल्याणात एका खाजगी शाळेतील विद्यार्थ्यांना चक्क एका मालवाहतूक करणाऱ्या टेम्पोमधून शाळेत ने-आण केली जात आहे. विशेष म्हणजे मुलांच्या सुरक्षिततेसाठी एक ही अटेंडंट (सहाय्यक) सोबत नाही. विद्यार्थ्यांचा धोकादायक प्रवास सुरू असताना आरटीओच्या अधिकाऱ्याचे मात्र त्याकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. त्यामुळे अपघात झाल्यानंतरच जाग येणार का असा प्रश्न आता सर्वसामान्यांकडून ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121