नवी दिल्ली : ‘प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत’ (पीएमईजीपी) गेल्या तीन वर्षात देशभरात १३ लाख ८२ हजार ४४० बेरोजगारांना काम मिळाले आहे. तर, महाराष्ट्र आणि दादरा नगर हवेली मध्ये ८९ हजार ५६७ जणांना रोजगार मिळाला असल्याची माहिती सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी लोकसभेत लिखीत उत्तरात दिली.
देशात ‘प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत’ १४ लाख ८३ हजार ८०८ रोजगार निर्मितीचे लक्ष ठेवण्यात आले होते. यापैकी १३ लाख ८२ हजार ४४० एवढी रोजगार निर्मिती झाली आहे. देशात अनुक्रमे वर्ष २०१६-२०१७ मध्ये ४ लाख ७ हजार ८४०, वर्ष २०१७-२०१८ मध्ये ३ लाख ८७ हजार १८४ तर वर्ष २०१८-२०१९ मध्ये ५ लाख ८७ हजार ४१६ रोजगार निर्मिती झाली आहे.
महाराष्ट्र, दादरा-नगर हवेलीत ८९ हजार ५६७ रोजगार
महाराष्ट्र व दादरा नगर हवेलीमध्ये गेल्या तीन वर्षांच्या कालावधीत ‘प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत’ ६५ हजार ८७२ रोजगार निर्मितीचे लक्ष ठेवण्यात आले होते. या योजनेची उत्तम अंमलबजावणी होऊन इच्छित लक्षापेक्षा अधीक म्हणजे ८९ हजार ५६७ एवढी रोजगार निर्मिती झाली आहे. वर्ष २०१६-२०१७ मध्ये १७ हजार ७९९, वर्ष २०१७-२०१८ मध्ये २६ हजार ६३२ तर वर्ष २०१८-२०१९ मध्ये ४५ हजार १३६ रोजगार निर्मिती झाली.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat