कोईम्बतूर : पुलवामा हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर जैश-ए-मोहम्मदचे भारतीय वायुदलाने दहशतवाद्यांचे तळ उध्वस्त केल्यानंतर भारतीय वायू सेनेचे प्रमुख बी.एस. धनुआ यांनी पत्रकार परिषद घेऊन एअर स्ट्राईकसंदर्भात खुलासा केला. भारतीय वायू सेनेच्या हल्ल्यात जैश-ए-मोहम्मदचे किती दहशतवादी मारले गेले, याबाबत विरोधकांनी पुरावे मागत शंका उपस्थित केली होती.
एअर स्ट्राईकचा मुद्दा राजकीय बनत चालल्याने वायू सेनेकडून सांगण्यात आले आहे. आम्ही फक्त लक्ष्य ठेवतो आणि ते पूर्ण करतो, किती दहशतवादी मारले हे मोजणे आमचे काम नाही, असे धनुआ यांनी स्पष्ट केले. भारताने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून दहशतवादी तळांवर एअर सर्जिकल स्ट्राईक केला आहे. १४ फेब्रुवारीला पुलवामात झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय हवाई दलाने २६ फेब्रुवारीला जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवादी तळांवर हल्ले.
कारवाईने जैश-ए-मोहम्मदचे धाबे दणाणले आहेत. पंचतारांकीत सुविधा असलेले जैशचे तळ उध्वस्त झाले. एअर स्ट्राईकमध्ये नेमके किती दहशतवादी मारले गेले त्याचा अधिकृत आकडा समोर आला नाही. विरोधी पक्षांकडून नेमके किती दहशतवादी मारले याचा आकडा सरकारने जाहीर करावा, अशी मागणी होत होती. तर, पाकिस्ताकडूनही या हल्ल्यात कुठलिही जिवीतहानी झाली नसल्याचे सांगण्यात आले होते. त्या पार्श्वभूमीवर भारतीय वायू सेनेकडून याबाबत अधिकृत माहिती देण्यात आली आहे.
“आम्ही फक्त आमचं टार्गेट निश्चित करतो, आणि त्यावर मारा करतो. त्यामध्ये किती दहशतवादी मारले गेले किती, जिवीतहानी झाली, हे मोजणे आमचे काम नाही, ते सरकार पाहिल, असे वायू सेना प्रमुख बी.ए. धनुआ यांनी म्हटले. मिग २१ हे विमान सक्षम असे फायटर जेट आहे. त्यामध्ये उच्च दर्जाची शस्त्रास्त्र आणि मिसाईल सिस्टीम आहे. देशाकडील सर्वच एअरक्राफ्ट उत्कृष्ट दर्जाची असल्याचेही धनुआ यांनी स्पष्ट केले.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat