सचिनच्या सुरक्षेत घट करून आ. आदित्य ठाकरेंच्या सुरक्षेत वाढ ?

    25-Dec-2019
Total Views | 130


asf_1  H x W: 0

 

मुंबई : मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर याच्या सुरक्षेत घट करण्यात आली आहे. त्याच्या 'एक्स' दर्जाची सुरक्षा काढून घेण्यात आली आहे. तर शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांच्या सुरक्षेत वाढमध्ये वाढकरण्यात आली आहे. त्यांचा आता 'वाय प्लस' सुरक्षेचा दर्जा 'झेड' सुरक्षेत करण्यात आला आहे.

 

राज्य सरकारकडून राज्यातील काही व्हिआयपींना सुरक्षा प्रदान करण्यात येत असते. नुकतेच राज्यातील ४५ महत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेत बदल करण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, सचिन तेंडुलकर याला यापूर्वी एक्स दर्जाची सुरक्षा व्यवस्था होती. म्हणजेच सचिनसोबत चोवीस तास पोलीस कॉन्स्टेबल असत होता. मात्र आता अशा पद्धतीची सुरक्षा व्यवस्था काढून घेण्यात आली आहे. यापुढे सचिनला पोलीस एस्कॉर्ट सुरक्षा व्यवस्था दिली जाणार आहे.

 

यासोबतच भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना यापूर्वी वाय दर्जाच्या सुरक्षा होती. यासोबतच एस्कॉर्ट सुरक्षा देखील होती. आता खडसेंची एस्कर्ट सुरक्षा काढून घेण्यात आली आहे. तर उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक यांना असलेली 'झेड प्लस' सुरक्षा कमी करुन 'एक्स' दर्जाची प्रदान करण्यात आली आहे. सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या सुरक्षेमध्येही घट करण्यात आली आहे. निकम यांना असलेली 'झेड प्लस' सुरक्षा व्यवस्था 'वाय' दर्जाची करण्यात केली आहे. तर समाजसेवक अण्णा हजारे यांच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. त्यांची सुरक्षा आता 'वाय प्लस'वरुन 'झेड' दर्जाची करण्यात आली आहे.

अग्रलेख
जरुर वाचा
राज ठाकरेंची पक्षसंघटनेवर आचारसंहिता! म्हणाले, मला विचारल्याशिवाय...

राज ठाकरेंची पक्षसंघटनेवर आचारसंहिता! म्हणाले, "मला विचारल्याशिवाय..."

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षातील सर्व नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना एक ठाम आणि स्पष्ट आदेश दिला आहे. राज ठाकरे यांनी सांगितले की, "पक्षातील कोणताही नेता, कार्यकर्ता, प्रतिनिधी यांनी कोणत्याही वृत्तपत्र, वृत्तवाहिनी किंवा डिजिटल माध्यमांशी संपर्क साधू नये. तसेच, स्वतःचे मत व्हिडीओच्या माध्यमातून सोशल मीडियावर अपलोड करणेही थांबवावे." याशिवाय, त्यांनी पक्षाचे अधिकृत प्रवक्ते यांनाही इशारा दिला आहे. राज ठाकरे म्हणाले, "ज्यांना अधिकृत प्रवक्त्याची जबाबदारी दिली आहे त्यांनी सुद्धा माझी परवानगी घेतल्याशिवाय ..

महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुनर्रचनेची अधिसूचना जाहीर ; पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या पाठपुराव्याला यश

महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुनर्रचनेची अधिसूचना जाहीर ; पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या पाठपुराव्याला यश

राज्यातील विविध विकास कामे व प्रकल्पांना किनारी क्षेत्र नियमन (सीआरझेड) अंतर्गत वेळेवर मंजुरी मिळावी यासाठी महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण पुनर्रचना व्हावी यासाठी राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या या प्रयत्नांना अखेर यश मिळाले असून, केंद्र सरकारच्या पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण पुनर्रचित करत अधिसूचना जारी केली आहे...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121