२७ महापालिकांच्या महापौरपदाच्या आरक्षणाची सोडत जाहीर

    14-Nov-2019
Total Views | 39


राज्यातल्या सुमारे २७ महापालिकांमध्ये पुढच्या अडीच वर्षांसाठी महापौरपदाच्या आरक्षणाची सोडत काल जाहीर झाली. महापालिकांच्या महापौरपदाचा अडीच वर्षांचा कार्यकाळ यापूर्वीच संपुष्टात आला मात्र, विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे त्याला मुदतवाढ देण्यात आली होती. काल मुंबईत प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली महापौर पदांच्या आरक्षणाची ही सोडत काढण्यात आली.

या सोडतीत औरंगाबाद महापालिकेचे महापौरपद खुल्या प्रवर्ग महिलांसाठी, नांदेड वाघाळा शहर महानगर पालिकेचे महापौर पद इतर मागासवर्ग महिलांसाठी, परभणी महानगरपालिकेचे महापौरपद अनुसूचित जाती महिलांसाठी तर लातूर महानगरपालिकेचं महापौरपद नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी राखीव झाले आहे.

याशिवाय मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, नाशिक, कल्याण, उल्हासनगर, सांगली-मिरज-कुपवड या महापालिकांमधलं महापौर पद खुल्या प्रवर्गासाठी, नवी मुंबई, पिंपरी चिंचवड, चंद्रपूर, पनवेल, अकोला, भिवंडी, जळगाव या महापालिकांमधले महापौर पद खुल्या प्रवर्गातल्या महिलांसाठी, सोलापूर, कोल्हापूर, मालेगाव या महापालिकांमधले महापौर पद नागरिकांच्या मागास प्रवर्गातल्या महिलांसाठी राखीव, अमरावती, धुळे या महापालिकांमधले महापौर पद नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी, अहमदनगर महापालिकेचे महापौर पद अनुसूचीत जाती प्रवर्गातल्या महिलांसाठी, तर वसई-विरार महापालिका अनुसूचित जमातींसाठी तर मिरा-भाईंदर येथील महापौर पद अनुसूचीत जातीसाठी आरक्षित झाले आहे.

अग्रलेख
जरुर वाचा
पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंची पहिली प्रतिक्रिया समोर! म्हणाल्या, प्रत्येक गोष्टीला वेळ...

पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंची पहिली प्रतिक्रिया समोर! म्हणाल्या, "प्रत्येक गोष्टीला वेळ..."

(Rohini Khadse Breaks Silence After Husband Pranjal Khewalkar’s Arrest) राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना पुण्यातील खराडी येथे सुरू असलेल्या रेव्ह पार्टीतून अटक करण्यात आली. पुणे पोलिसांनी रविवारी मध्यरात्री ही कारवाई केली. प्रांजल खेवलकर यांच्यावर ही रेव्ह पार्टी आयोजित केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या पार्टीदरम्यानचा व्हिडीओ पुढे आल्याने राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर आता रोहिणी खडसे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांन..

पहलगाम हल्ल्यावर पी. चिदंबरम यांचं वादग्रस्त वक्तव्य; म्हणाले, दहशतवादी पाकिस्तानचे की भारतातच...

पहलगाम हल्ल्यावर पी. चिदंबरम यांचं वादग्रस्त वक्तव्य; म्हणाले, "दहशतवादी पाकिस्तानचे की भारतातच..."

(P Chidambaram's Remark on Pahalgam Terror Attack) पहलगाम येथील भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर त्याला प्रत्युत्तर म्हणून मे महिन्यात ऑपरेशन सिंदूर राबवण्यात आले. यामध्ये भारताने हवाई हल्ले करत पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे नऊ तळ उद्ध्वस्त केले. यासंदर्भातच विरोधी पक्षांनी संसदेत ऑपरेशन सिंदूरवर चर्चेची मागणी केली होती, जी सत्ताधाऱ्यांनी मान्य केली. मात्र संसदेत चर्चेपूर्वी, ज्येष्ठ काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी एका मुलाखतीत केलेले वक्तव्य समोर आले आहे. ज्यावरुन मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121