मराठा आरक्षण : मागासवर्ग आयोगाचा अहवाल द्या, न्यायालयाचे निर्देश

    28-Jan-2019
Total Views | 53

 

 
 
 
मुंबई : मराठा आरक्षणासाठी राज्य मागास प्रवर्ग आयोगाने तयार केलेला अहवाल ‘जशाचा तसा’ सर्व याचिकाकर्त्यांना आणि प्रतिवाद्यांना देण्यात यावा. असे निर्देश उच्च न्यायालयाकडून राज्य सरकारला देण्यात आले. या अहवालातील काही भागामुळे राज्यात कायदा व सुव्यवस्था बिघडू शकते. असा दावा राज्य सरकारने केला होता. उच्च न्यायालयाने आज हा दावा फेटाळून लावला. येत्या ६ फेब्रुवारीपासून मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या याचिकांवर सुनावणीला सुरुवात होईल.
 

मराठा आरक्षणाला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. याप्रकरणी मागे झालेल्या सुनावणीत राज्य मागास प्रवर्गाने तयार केलेला मराठा आरक्षणाबाबतचा अहवाल सादर करण्यात यावा. अशी विनंती याचिकाकर्त्यांनी उच्च न्यायालयाला केली होती. हा अहवाल जाहीर न करण्याची भूमिका राज्य सरकारने घेतली होती. या अहवालातील काही भाग आरक्षणाबाबत लागू होत नसून त्याला ऐतिहासिक संदर्भ आहेत. हे ऐतिहासिक संदर्भ जाहीर केल्यास समाजात अस्वस्थता पसरेल. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था बिघडू शकते. अशी भीती राज्य सरकारने व्यक्त केली होती.

 

या मागास प्रवर्गाच्या अहवालातील कोणताही भाग न वगळता तो याचिकाकर्त्यांना सादर करण्याचे आदेश न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत. हा अहवाल मंगळवारपर्यंत सीडी स्वरुपात न्यायालयात सादर करण्यात येईल अशी माहिती वकील गुणरत्न सदावर्ते यांनी दिली. दरम्यान, एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी मराठा आरक्षणाबाबत दाखल केलेली याचिका सोमवारी मागे घेतली. काही दिवसांपूर्वीच त्यांनी याचिका मागे घेणार असल्याचे जाहीर केले होते.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
अग्रलेख
जरुर वाचा
मुंब्रा घटनेबाबत कोणतीही माहिती असेल तर संपर्क साधा -  मध्य रेल्वेचे प्रवासी आणि रेल्वे कर्मचाऱ्यांना आवाहन - घटनेच्या तपासासाठी मध्य रेल्वेची समिती

मुंब्रा घटनेबाबत कोणतीही माहिती असेल तर संपर्क साधा -  मध्य रेल्वेचे प्रवासी आणि रेल्वे कर्मचाऱ्यांना आवाहन - घटनेच्या तपासासाठी मध्य रेल्वेची समिती

दिवा-मुंब्रा घटनेबद्दल माहितीसाठी मध्य रेल्वेचे जनतेला आवाहन केले आहे. सोमवार, दि.९.०६.२०२५ रोजी सकाळी ९.०१ वाजताच्या सुमारास झालेल्या एका दुर्दैवी घटनेत, दिवा आणि मुंब्रा स्थानकांदरम्यान उपनगरीय ट्रेनमधून प्रवास करणारे सुमारे ८ जण त्यांचा तोल गेला आणि चालत्या ट्रेनमधून पडले. रेल्वे प्रशासनाने या घटनेचे कारण तपासण्यासाठी वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांची एक समिती स्थापन केली आहे, अशी माहिती मध्य रेल्वेने दिली आहे. याचसोबत प्रवासी जनता आणि रेल्वे कर्मचाऱ्यांना या घटनेबद्दल आणि त्याच्याशी संबंधित बाबींबद्दल कोणतीही ..

विरार अलिबाग बहुउद्देशीय मार्गिका प्रकल्पाला गती भूसंपादनासाठी २२ हजार कोटींच्या कर्जाला शासन हमी

विरार अलिबाग बहुउद्देशीय मार्गिका प्रकल्पाला गती भूसंपादनासाठी २२ हजार कोटींच्या कर्जाला शासन हमी

आगामी वाहतूककोंडी मुंबई महानगर प्रदेशात विविध प्रकल्पांना गती असतानाच आता बहुप्रतीक्षित विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिका प्रकल्पाला आता राज्य सरकारकडून गती देण्यात येत आहे. या प्रकल्पासाठी आवश्यक जमीन संपादन करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला २२ हजार २५० कोटी रुपये कर्जास मंजुरी दिली आहे.भूसंपादनासाठी आवश्यक कर्जासाठी राज्य सरकारने शासन हमी घेतली आहे, त्यामुळेविरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिका प्रकल्पाला गती प्राप्त झाली आहे...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121