नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी त्यांच्या संपूर्ण जीवनात आपल्या क्रांतिकारी विचारांनी लाखो लोकांना प्रेरणा दिली. सुभाषचंद्र बोस यांची आज १२२ वी जयंती देशभरात साजरी केली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुभाषचंद्र बोस संग्राहालयाचे बुधवारी सकाळी उद्घाटन केले. दिल्लीच्या लाल किल्ल्यात स्थित आझाद हिंद सेनेच्या वस्तूंचे हे संग्राहालय आजपासून सर्वांसाठी खुले झाले आहे.
Inaugurated Centers of Excellence at Deen Dayal Hastkala Sankul. These centres will give a boost to those associated with the textiles and handicrafts sector and contribute to India’s prosperity. pic.twitter.com/mc2U98E1g5
— Narendra Modi (@narendramodi) January 22, 2019
१९४२ मध्ये त्यांनी हिटलरची भेट घेतली होती. त्याने भारताच्या स्वातंत्र्याच्या समर्थनार्थ कोणतेही पाऊल उचलले नाही. हीटलरने दिलेल्या वचनात तसे कोणतिही स्पष्टता नव्हती. सुभाषचंद्र बोस यांनी स्थापन केलेल्या आझाद हिंद सरकारला जर्मनी, जपान, फिलीपीन्स, कोरिया, चीन, इटली, आयरलॅंण्ड सरकारने मान्यता दिली होती. आझाद हिंद सरकारने १९४३मध्ये आझाद हिंद बॅंकेची स्थापना केली होती. या बॅंकेने १० रुपयांपासून ते १ लाखापर्यंत चलन छापले होते. एक लाखांच्या नोटेवर सुभाषचंद्र बोस यांची प्रतिमा होती.
१८ ऑगस्ट १९४५ मध्ये तायवान येथील विमान दुर्घटनेत त्यांचा मृत्यू झाल्याचे इतिहास सांगतो. मात्र, बोस या अपघातातून बचावले, असेही म्हटले जाते. भारत सरकारने त्यांच्या संबंधित माहिती घेण्यासाठी बराच पाठपुरावा केला मात्र, काहीच हाती लागले नाही. त्यांच्या मृत्यूबद्दल अनेक कहाण्या सांगितल्या जातात मात्र, त्यांना पुरावा काहीच नाही.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/