...म्हणून ‘विश्व हिंदू काँग्रेस’आवश्यक

    08-Sep-2018
Total Views | 26



 

 

शिकागो : ‘द्वितीय विश्व हिंदू काँग्रेस’ दि. ७ ते ९ सप्टेंबर या काळात अमेरिकेतील शिकागो येथे संपन्न होत आहे. आज या परिषदेचा पहिला दिवस होता. ‘विश्व हिंदू काँग्रेस’ची गरज का निर्माण झाली? आणि ‘विश्व हिंदू काँग्रेस’ यशस्वी होणे का आवश्यक आहे? याची काही कारणे आहेत. त्यापैकी प्रमुख पाच पुढीलप्रमाणे-
 
 

. हिंदुंसाठी जागतिक मंच स्थापण्याची हीच योग्य वेळ

 

ख्रिश्चन आणि मुस्लीमधर्मियांनतर जगात हिंदू धर्मियांची लोकसंख्या सर्वाधिक आहे. तथापि मुस्लीमधर्मियांसाठी जगातील ४५ इस्लामी देशांच्या पाठिंब्याने, समर्थनाने काम करणारी ‘ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक को-ऑपरेशन’ (ओआयसी) ही प्रबळ संघटना अस्तित्वात आहे, तर ‘ख्रिश्चन इकॉनॉमिक फोरम’सारख्या ख्रिश्चन धर्मियांसाठी काम करणाऱ्या कितीतरी संघटनाही अस्तित्वात आहेत. मात्र, हिंदूधर्मियांना भेडसावणाऱ्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी कोणतेही जागतिक व्यासपीठ सध्याच्या घडीला अस्तित्वात नाही. ही एकूणच परिस्थिती पाहता हिंदुंसाठी एका जागतिक मंचाची गरज असल्याचे प्रकर्षाने जाणवते. याच पार्श्वभूमीवर जगातल्या ५० देशांतील २५० विचारवंत-वक्त्यांच्या आणि २ हजार २०० प्रतिनिधींच्या सहभागाने ‘विश्व हिंदू काँग्रेस’च्या माध्यमातून पहिल्यांदाच केवळ धर्मच नव्हे, तर धर्माच्याही पलीकडे जात ‘विश्व हिंदू इकॉनॉमिक फोरम,’ ‘हिंदू एज्युकेशनल कॉन्फरन्स,’ ‘वुमन्स फोरम’ आदींची सुरुवात करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवून हिंदूधर्मिय एकत्र येत आहेत.

 

. धर्म : अर्थव्यवस्थेतील एक प्रभावशाली ‘नॉन स्टेट प्लेअर’

 

जगाच्या अर्थव्यवस्थेला आकार देणारे ‘नॉन स्टेट प्लेअर’ म्हणजे ज्यांचा सरकारशी संबंध नसतो, असे घटक सध्या एक महत्त्वाचे आणि प्रबळ खेळाडू म्हणून समोर आले आहेत. विशेष म्हणजे राष्ट्राराष्ट्रांच्या सीमा ओलांडून लोकांना एकत्र आणण्यातला आणि विधायक आर्थिक विकासामध्ये महत्वाची भूमिका बजावणारा धर्म हा एक प्रबळ घटक आहे. ‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’च्या एका लेखात तर असेही म्हटले आहे की, अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेमध्ये दरवर्षी धर्माचे योगदान १.२ ट्रिलियन डॉलर्स एवढे प्रचंड असते. या १.२ ट्रिलियन डॉलर्सपैकी ४१८ बिलियन डॉलर्स धर्मविषयक परिषदांतून, ३०३ बिलियन डॉलर्स विद्यापीठे, सेवाभावी संस्था आणि आरोग्य विषयक आणि धर्माशी निगडीत असलेल्या प्रणालीतून येतात आणि ४३७ बिलियन डॉलर्स धर्मावरील विश्वासातून, धर्मावरील विश्वासाच्या संबंधातून किंवा धर्मावरील विश्वासातून प्रेरणा घेतलेल्या व्यवसायातून येतात. दुसरीकडे, जागतिक पातळीवर, आठ बिलियन डॉलर्सची संपत्ती व मालमत्ता असलेली व्हॅटीकन बँक कॅथलिक ख्रिश्चनांसाठी प्रभावी भूमिका निभावत आहे. त्याचबरोबर ओआयसीदेखील इस्लामी राष्ट्रांच्या पाठिंब्याने मुस्लिमांसाठी अशीच भूमिका निभावत असते. पण हिंदुंसाठी जागतिक पातळीवर अशी कोणतीही परिषद वा व्यासपीठ अस्तित्वात नाही. त्यामुळेच ‘विश्व हिंदू काँग्रेस’ हे त्या दिशेने उचललेले एक स्वागतार्ह पाऊल ठरते.

 

. राजकीय मंचासाठी निभावण्याजोगी भूमिका

 

यंदा जगातल्या चार ते पाच देशांतील राजकीय व्यक्ती पहिल्यांदाच ‘विश्व हिंदू काँग्रेस’मध्ये सहभागी होत आहेत, हे खरे तर स्वागतार्ह पाऊल आहे. इथे एका गोष्टीची नोंद घेतली पाहिजे की, दि. ४ सप्टेंबर, २०१६ रोजी पोप कॅननाइझ्ड तेरेसा यांच्या नेतृत्वाखाली ख्रिश्चनधर्मियांच्या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेत १३ सरकारी वा सरकारप्रमुखांनी भाग घेतला होता, तर ९० सरकारांनी आपापल्या प्रतिनिधींना या परिषदेत सहभागी होण्यासाठी पाठवले होते. नुकत्याच उद्भवलेल्या रोहिंग्या मुस्लिमांच्या मुद्यावर ओआयसीने तर एक विशेष अधिवेशन घेत चर्चादेखील केली होती. या सर्वच गोष्टींचा विचार करता हिंदुंची स्थिती काय आहे? जगभरातील ४५ देशांमध्ये पसरलेल्या हिंदूधर्मियांची संख्या ६० ते ७० मिलियन इतकी आहे. जगातील १५ देशांमध्ये हिंदुंची संख्या पाच लाखांपेक्षा अधिक आहे, ज्यात भारत, नेपाळ, बांगलादेश, इंडोनेशिया, पाकिस्तान, श्रीलंका, मलेशिया, अमेरिका, म्यानमार, युनायटेड किंग्डम, कॅनडा, दक्षिण आफ्रिका, मॉरीशस, कॅरेबीयन बेटे म्हणजेच वेस्ट इंडिज आणि फिजी यांचा समावेश आहे. या सर्वच देशांत हिंदूधर्मियांना राजकीय आणि नागरी अधिकारविषयक प्रश्नांना सामोरे जावे लागते. याच प्रश्नांच्या निराकरणासाठी एखादा राजकीय मंच असावा, असे अनेक वर्षांपासून वाटत होते. ते अनेक वर्षांचे उद्दिष्ट आता पूर्ण होत आहे, हेही नसे थोडके.

 

. हिंदुंच्या स्वतंत्र ओळखीची गरज

 

युरोप व अमेरिकेतील राजकीय आणि सामाजिक वातावरण वाढत्या इस्लामी दहशतवादाच्या पार्श्वभूमीवर वैध वा अवैधरित्या त्या त्या देशांत आलेल्या स्थलांतरितांच्या मु्द्यांवरून वेगाने धृवीकरणाकडे वाटचाल करत आहे. दरम्यान, प्यु. रिसर्चने हिंदूधर्मियांच्या स्थलांतराविषयी केलेल्या अभ्यासातून युरोप आणि अमेरिकेत हिंदूधर्मीय मोठ्या प्रमाणात स्थलांतर करत असल्याचे समोर आले. यावरून प्यु. रिसर्चने असा सल्ला दिला की, हिंदुंची स्वतंत्र ओळख आणि हिंदुंच्या स्वतंत्र इतिहासाची स्थापना करणे, जगासमोर आणणे गरजेचे झाले आहेइथे हिंदूधर्मियांची काही वैशिष्ट्येही लक्षात घेतली पाहिजेत. जसे की, हिंदुधर्मियांनी कधीही इतिहासात साम्राज्य स्थापन करण्यासाठी एखाद्या परक्या देशावर आक्रमण केले नाही. ना कधी हिंदुंनी कोणत्याही लोकांना गुलाम केले, ना कधी हिंदुंनी अन्य धर्मियांचे आपल्या धर्मात धर्मांतर केले. हिंदुंनी ज्या कोणत्या ठिकाणी स्थलांतर केले, तिथे त्या देशाशी, त्या देशातील नागरिकांशी शांततामय आणि एकमेकांना फायदेशीर ठरेल असे नातेसंबंध तयार केले. शिवाय विविध क्षेत्रांतील मूल्यवर्धनाने स्वतःचे जीवनमान समृद्ध केले.

 

. १२५ वर्षांनंतर पुन्हा एकदा वैश्विक प्रेमाचा संदेश देण्याची वेळ

 

स्वामी विवेकानंदांनी विश्व धर्म संमेलनात निरनिराळ्या धर्मांना आणि राष्ट्रांना वैश्विक प्रेमाचा आणि शांतीचा संदेश दिला. विवेकानंदांच्या चित्तवेधक व्यक्तिमत्वामुळे त्यांचा ठसा या संमेलनात तर उमटलाच पण जगातही त्यांचे नाव आदराने घेतले जाऊ लागले. पण स्वामी विवेकानंदांनी आपले ‘विश्व संमेलना’त मत मांडले. त्यावेळी भारत एक दुभंगगेला, छिन्नविछिन्न झालेला देश होता. मात्र, स्वामीजींच्या भाषणानंतर १०० पेक्षा जास्त वर्षांनंतरचा इतिहास पाहता असे दिसते की, भारत पुनरूत्थानाच्या मार्गावर आहे आणि भविष्यात आपले संदेश सामूहिकपणे आणि प्रभावीपणे देण्यासाठी सक्षम आहे. यंदाची ‘विश्व हिंदू काँग्रेस’ही शिकागो येथेच होत आहे. पण ही निवड काही फक्त प्रतिकात्मक राहणार नाही, तर जागतिक शांततेची इच्छा करणाऱ्या सर्वांना प्रेरणा देणारी ठरेल, यात काही शंका नाही.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121