खा. कपिल पाटील यांच्याकडून पालिकेच्या कारभाराची ‘झाडाझडती’

    30-Aug-2018
Total Views | 17



ठाणे : भिवंडी शहरातील खड्डे, कचरा आणि वाहतूककोंडीच्या मुद्द्यावरून भाजपचे खा. कपिल पाटील यांनी पालिकेच्या कारभाराची झाडाझडती घेत अधिकाऱ्या ना धारेवर धरले. महापालिका प्रशासनाच्या बेजबाबदार कारभारामुळे हजारो नागरिकांना त्रास होत आहे. त्यामुळे युद्धपातळीवर कामे करण्याची तंबीही दिली. भिवंडी शहरातील रस्त्यांची पावसाळ्याच्या काळात दुरवस्था झाली. शहरातील मुख्य रस्त्यांबरोबरच गल्ल्यांमध्येही मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले त्यामुळे शहरातील वाहतूककोंडीत भर पडली. काही दिवसांपासून शहरातील कचरा उचलण्यातही महापालिका प्रशासनाकडून दिरंगाई होत होती. या पार्श्वभूमीवर भाजपचे खा. कपिल पाटील यांनी लोकप्रतिनिधी व पालिका अधिकाऱ्या बरोबर बैठक घेतली.

 

महापालिका क्षेत्रातील सर्वच रस्त्यांवर खड्डे पडले. मात्र, त्याबाबत पालिका प्रशासनाकडून जुजबी उपाययोजना झाली. पालिकेच्या बेजबाबदार कारभारामुळे नागरिकांकडून लोकप्रतिनिधींबद्दल नाराजी व्यक्त होते, त्यामुळे पालिकेच्या अधिकाऱ्या ना कारभार सुधारण्याची गरज आहे, असे कपिल पाटील यांनी सुनावले. तर, गणेशोत्सवापूर्वी शहरातील रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी अडीच कोटी रुपयांची तरतूद करण्यात येईल, अशी माहिती आयु्क्त मनोहर हिरे यांनी दिले.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
अग्रलेख
जरुर वाचा
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना पात्र आणि अपात्र लाभार्थी

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना पात्र आणि अपात्र लाभार्थी

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील पात्र असलेल्या २.२५ कोटी लाभार्थ्यांना जूनचा सन्मान निधी वितरित करण्यात आला आहे.मात्र २६.३४ लाख लाभार्थ्यांना अपात्र करण्यात आले आहेत. य.ाअपात्र लाभार्थ्यांपैकी काहीजण एकापेक्षा अधिक योजनांचा लाभ घेत आहेत. तर काही कुटुंबांमध्ये दोनपेक्षा जास्त लाभार्थी आहेत,तसेच ही ठिकाणी पुरुषांनीही अर्ज केल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. या सर्व २६.३४ लाख अपात्र लाभार्थींना जूनपासून योजनेचा लाभ घेण्यास स्थगिती दिल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. या योजनेअ..

महापुरुषांचे विचार आजच्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचे काम करायचे आहे : पद्मश्री गिरीश प्रभुणे

महापुरुषांचे विचार आजच्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचे काम करायचे आहे : पद्मश्री गिरीश प्रभुणे

लोकमान्य टिळकांनी ब्रिटिश राजवटी विरोधात सर्व भारतीयांना एकत्र करून स्वातंत्र्यलढा हा देश पातळीवरून नेला. स्वदेशी,स्वधर्म जागरूत करून राष्ट्रीय शिक्षणावर भर दिला. या सर्व कामासाठी त्यांना तुरुंगात जावे लागले.आपल्याला महापुरुषांचे विचार आजच्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचे काम करायचे आहे.‘असे पद्मश्री गिरीश प्रभुणे म्हणाले. नुकतेच मातंग साहित्य परिषद, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे संज्ञापन व वृत्तपत्र विभाग व अण्णा भाऊ साठे अध्यासन यांच्या वतीने लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर, महर्षी विठ्ठल रामजी ..

ओला, उबेरची स्पर्धा थेट राज्य सरकारशी राज्य सरकारच चालवणार अ‍ॅप आधारित टॅक्सी आणि इ बाईक

ओला, उबेरची स्पर्धा थेट राज्य सरकारशी राज्य सरकारच चालवणार अ‍ॅप आधारित टॅक्सी आणि इ बाईक

"राज्य सरकार मराठी तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी अ‍ॅप आधारित प्रवासी वाहनसेवा सुरू करण्याच्या विचारात असुन प्रवासी वाहतुकीसाठी अ‍ॅप आधारित रिक्षा,टॅक्सी व ई-बाईक सेवा आता खासगी कंपन्यांपुरती मर्यादित न राहता, परिवहन विभागाच्या सहकार्याने सुरू करण्यात येणार आहे. याॲपला जय महाराष्ट्र, महा-राईड, महा-यात्री, महा-गो यापैकी एखादे नाव देणे प्रस्तावित आहे,अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. राज्य सरकारच्या अंतिम मान्यतेने हे शासकीय ॲप लवकरच कार्यान्वित होईल असा विश्वास त्यांनी ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121