भारताची ‘जैव’भरारी

    27-Aug-2018
Total Views | 16



 

 

नवी दिल्ली: देशातील पहिल्यावहिल्या जैव इंधनावर चालणाऱ्या विमानाची सोमवारी घेण्यात आलेली चाचणी यशस्वी ठरली. स्पाईसजेट कंपनीचे विमान डेहराडून येथून उड्डाण करून नवी दिल्ली विमानतळावर सुरक्षितरित्या उतरले व ही चाचणी यशस्वी ठरली. या चाचणीमुळे आगामी काळात जैव इंधनाचा (बायो फ्यूएल) वापर देशात वाढविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
 

उत्तराखंडची राजधानी डेहराडून येथून उड्डाण केल्यानंतर स्पाईसजेटचे हे विमान नवी दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले. नवी दिल्ली विमानतळावर केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी, नागरी विमानोड्डाण मंत्री सुरेश प्रभू, पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी विमानाचे स्वागत केले. या विमानात ७५ १० टक्के एव्हिएशन टर्बाईन फ्युएल तर २५ टक्के बायो फ्युएल वापरण्यात आले होते. या यशस्वी प्रयोगाबाबत बोलताना पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान म्हणाले की, “दि. १० ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवे ‘जैव इंधन धोरण’ जाहीर केले. त्यानंतर आज आपण या धोरणाची यशस्वी अंमलबजावणी केली आहे.” विमान क्षेत्रातील आणि ऊर्जा क्षेत्रातील ही मोठी कामगिरी असल्याचे ते म्हणाले. तसेच, केंद्र सरकारने जैव इंधन आणि इथेनॉलवरील जीएसटीत कपात केल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. केंद्र सरकारने गेल्या दोन-तीन वर्षांपासून बायो फ्यूएल वापर वाढविण्यासाठी प्रयत्न चालवले आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी इथेनॉलसह जैव इंधनाच्या वापराबाबत सातत्याने आग्रही भूमिका मांडत आहेत. आता विमानोड्डाण क्षेत्रात स्पाईसजेटसह अन्य आघाडीच्या कंपन्यांनी जैव-इंधनाचा वापर सुरू केल्यास या धोरणाला चालना मिळू शकणार आहे.

 
 

ही विमानोड्डाण क्षेत्रातील नव्या क्रांतीची सुरूवात

देशातील विमानोड्डाण क्षेत्रात आज नव्या क्रांतीची सुरुवात झाली आहे. जैव इंधनावरील विमानाच्या यशस्वी परीक्षणामुळे भारत आता अमेरिका आणि ऑस्ट्रेलियासारख्या देशांच्या पंक्तीत जाऊन बसला आहे. आता या स्वदेशी, स्वस्त आणि देशातील शेतकऱ्या ना फायदेशीर ठरणाऱ्या जैव इंधनाचा अधिकाधिक वापर होण्याची गरज आहे. स्पाईसजेटने केलेल्या या प्रयोगाचे मी स्वागत करतो. अन्य विमानोड्डाण कंपन्याही असे प्रयोग करतील, अशी मला आशा आहे.

-नितीन गडकरी, केंद्रीय वाहतूकमंत्री

 
 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
अग्रलेख
जरुर वाचा
राज ठाकरेंची पक्षसंघटनेवर आचारसंहिता! म्हणाले, मला विचारल्याशिवाय...

राज ठाकरेंची पक्षसंघटनेवर आचारसंहिता! म्हणाले, "मला विचारल्याशिवाय..."

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षातील सर्व नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना एक ठाम आणि स्पष्ट आदेश दिला आहे. राज ठाकरे यांनी सांगितले की, "पक्षातील कोणताही नेता, कार्यकर्ता, प्रतिनिधी यांनी कोणत्याही वृत्तपत्र, वृत्तवाहिनी किंवा डिजिटल माध्यमांशी संपर्क साधू नये. तसेच, स्वतःचे मत व्हिडीओच्या माध्यमातून सोशल मीडियावर अपलोड करणेही थांबवावे." याशिवाय, त्यांनी पक्षाचे अधिकृत प्रवक्ते यांनाही इशारा दिला आहे. राज ठाकरे म्हणाले, "ज्यांना अधिकृत प्रवक्त्याची जबाबदारी दिली आहे त्यांनी सुद्धा माझी परवानगी घेतल्याशिवाय ..

महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुनर्रचनेची अधिसूचना जाहीर ; पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या पाठपुराव्याला यश

महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुनर्रचनेची अधिसूचना जाहीर ; पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या पाठपुराव्याला यश

राज्यातील विविध विकास कामे व प्रकल्पांना किनारी क्षेत्र नियमन (सीआरझेड) अंतर्गत वेळेवर मंजुरी मिळावी यासाठी महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण पुनर्रचना व्हावी यासाठी राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या या प्रयत्नांना अखेर यश मिळाले असून, केंद्र सरकारच्या पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण पुनर्रचित करत अधिसूचना जारी केली आहे...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121