अॅपलमुळे भारतात २५ हजार रोजगाराच्या संधी

    27-Dec-2018
Total Views | 16


नवी दिल्ली :  जगातील आघाडीची मोबाईल कंपनी अॅपल इन्कोर्पोरेशन त्यांच्या फोक्सोकॉन या युनिटच्या भागिदारीसह २०१९मध्ये आयफोन एक्सची जोडणी भारतात केली जाणार आहे. तैवानची कंत्राटदार निर्माती कंपनी लवकरच भारतात आयफोन्सच्या सुट्या भागांची जोडणीचे काम सुरू करणार आहे. त्यासाठी २५ हजार कामगारांची आवश्यकता भासणार आहे.

 

आयफोनचे सर्वात मोठे उत्पादन असलेल्या आयफोन एक्स सीरीजच्या सुट्या भागांची जोडणी भारतात केली जाणार आहे. एका अहवालानुसार भारतातील व्यवसायिक बाजारपेठेवर लक्ष केंद्रीत करून अॅपल इन्कोर्पोरेशनने हा निर्णय घेतला आहे. तमिळनाडूतील श्रीपेरुम्बुदुर येथे ही फॉक्सॉकोनचा प्लान्ट असणार आहे. दरम्यान यासाठी अडीच हजार कोटींची गुंतवणूक केली जाणार आहे. यामुळे थेट २५ हजार रोजगारनिर्मिती होणार असल्याचे म्हटले आहे. फॉक्सॉकोनच्या भारतातील या गुंतवणूकीबद्दल आयफोन प्रवक्त्यांनी या प्रकरणी थेट भाष्य करण्यास नकार दिला आहे. गेल्या महिन्यात आयफोनच्या विक्रीत घट झाल्याने गुंतवणूकदारांनी चिंता व्यक्त केली होती. त्यामुळेच भारतातील बाजारासह आशियातील बाजारपेठेकडे लक्ष केंद्रीत करण्यासाठी हे पाऊल मानले जात आहे.

 

आयफोन होणार स्वस्त ?

 

यापूर्वी बंगळुरू येथील विस्ट्रर्न कॉर्प या युनिटमध्ये आयफोन ६ ची जोडणी केली जात होती. त्यामुळे पूर्वीच्या तुलनेत आयफोन ६ च्या किमती कमी झाल्या होत्या. आयफोनच्या एक्स सिरिजच्या भारतातील निर्मितीमुळे आता एक्स सिरीजच्या किमती कमी होतील, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान अॅपलने २०१७मध्ये सर्वात महागडा आयफोन एक्स लॉन्च केला होता. त्यानंतर नव्या श्रेणीतील उत्पादन आयफोन एक्स एस आणि आर यांच्या निर्मितीमुळे त्याचे उत्पादन घटवण्यात आले होते.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
अग्रलेख
जरुर वाचा
राज ठाकरेंची पक्षसंघटनेवर आचारसंहिता! म्हणाले, मला विचारल्याशिवाय...

राज ठाकरेंची पक्षसंघटनेवर आचारसंहिता! म्हणाले, "मला विचारल्याशिवाय..."

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षातील सर्व नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना एक ठाम आणि स्पष्ट आदेश दिला आहे. राज ठाकरे यांनी सांगितले की, "पक्षातील कोणताही नेता, कार्यकर्ता, प्रतिनिधी यांनी कोणत्याही वृत्तपत्र, वृत्तवाहिनी किंवा डिजिटल माध्यमांशी संपर्क साधू नये. तसेच, स्वतःचे मत व्हिडीओच्या माध्यमातून सोशल मीडियावर अपलोड करणेही थांबवावे." याशिवाय, त्यांनी पक्षाचे अधिकृत प्रवक्ते यांनाही इशारा दिला आहे. राज ठाकरे म्हणाले, "ज्यांना अधिकृत प्रवक्त्याची जबाबदारी दिली आहे त्यांनी सुद्धा माझी परवानगी घेतल्याशिवाय ..

महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुनर्रचनेची अधिसूचना जाहीर ; पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या पाठपुराव्याला यश

महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुनर्रचनेची अधिसूचना जाहीर ; पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या पाठपुराव्याला यश

राज्यातील विविध विकास कामे व प्रकल्पांना किनारी क्षेत्र नियमन (सीआरझेड) अंतर्गत वेळेवर मंजुरी मिळावी यासाठी महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण पुनर्रचना व्हावी यासाठी राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या या प्रयत्नांना अखेर यश मिळाले असून, केंद्र सरकारच्या पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण पुनर्रचित करत अधिसूचना जारी केली आहे...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121