पाचोर्यात सिनेअभिनेते मकरंद अनासपुरेंचे कृषी प्रदर्शनात प्रतिपादन
पाचोरा, 17 नोव्हेंबर
महाराष्ट्रात भीषण दुष्काळामुळेे सर्वत्र विदारक चित्र असून शेतकरी बांधव मोठ्या अडचणीत आहे.शेतकर्यांच्या वाईट अवस्थेला परावलंबी समाज व्यवस्थाच जबाबदार आहे.
शेतकर्यांच्या शेतमालाला जोपर्यंत हमीभाव मिळत नाही, तोवर शेतकर्यांचे जगणे सुकर होणार नाही. शेतकरी बांधवांनी गटशेतीच्या माध्यमाने एकत्रित येऊन उत्पादन करण्याबरोबरच विक्री कौशल्य आत्मसात केले पाहिजे, असे प्रतिपादन प्रसिद्ध सिनेअभिनेते व नाम फाउंडेशनचे मकरंद अनासपुरे यांनी पाचोर्यात कृषी प्रदर्शन मेळाव्यात केले.
शहरात भव्य असे कृषी प्रदर्शन भरवून युवानेते अमोल शिंदे यांनी सामाजिक जाणीव कृतीतून व्यक्त केल्याने शिंदे यांचे कौतुकही मकरंद अनासपुरे यांनी केले.
अध्यक्षस्थानी जलसंपदामंत्री गिरीश महाजन, खा. ए.टी. पाटील, आ. उन्मेश पाटील, युवानेते अमोल शिंदे, अटल महापणन योजनेचे ब्रँड अॅम्बेसेडर गणेश शिंदे, सभापती सतीश शिंदे, उपसभापती अॅड. विश्वासराव भोसले, पं.स. सभापती बन्सीलाल पाटील, जि. प. सदस्य मधुकर काटे, प्रांत राजेंद्र कचरे पाटील, तहसीलदार बी. ए. कापसे, जालनाच्या सीताताई मोहिते पाटील, सुभाष पाटील, नरेंद्र पाटील, नीरज मुणोत, पं. स. सदस्या अनिता चौधरी, रत्नप्रभा पाटील, अर्चना पाटील, अलकाबाई पाटील, विजया शिंदे, अॅड. जे. डी. काटकर, ग. स. सोसायटीचे विलास नेरकर, बाजार समितीचे सचिव बी. बी. बोरुडे, संचालक दिलीप पाटील व्यासपीठावर होते.
नदीजोड प्रकल्प पूर्ण करणार : ना. महाजन
जिल्ह्यात नारपार योजनेतून 20 हजार कोटी रुपयांचे नदीजोड प्रकल्प विधानसभा निवडणुकीपूर्वी पूर्ण करणार असून यासाठी नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत बैठक आयोजित करण्यात आली असल्याचे ना. गिरीश महाजन यांनी यावेळी सांगितले.