जी व्यक्ती राज्य सरकारच्या नोंदणीकृत सोसायट्यांमध्ये कार्यरत आहे, तिला संविधानाच्या कलम १२ अंतर्गत सरकारी व्यक्ती समजता येणार नाही, असा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने सोमवार, दि. १६ जून रोजी त्रिपूरा उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेसंदर्भात दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्या. उज्जल भुयान आणि न्या.मनमोहन यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी पार पडली
Read More
‘परिवर्तन ही संसार का नियम हैं’ - बदल हा विश्वाचा नियम आहे. या शक्तिशाली संदेशाच्या अनुषंगाने, बदलत्या जगाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी भारताचा वस्त्रोद्योग वारसा बदलत आहे. तांत्रिक वस्त्रोद्योगातील आपला प्रवास केवळ कापडापुरताच नाही - तो आहे 1.4 अब्ज भारतीयांसाठी स्वप्ने विणणे, भविष्य सुरक्षित करणे आणि शाश्वत उद्याची रचना करणे याबद्दल...
‘प्रोडक्शन लिंक्ड इन्सेन्टिव्ह’ योजनेअंतर्गत देशातील उत्पादन क्षेत्राला चालना देण्यात आली. ही योजना विदेशी गुंतवणूक आकर्षित करण्याबरोबरच रोजगाराच्या संधीही निर्माण करत आहे. म्हणूनच जागतिक पातळीवर भारत प्रमुख उत्पादन केंद्र म्हणून उदयास येत आहे. आयातीवरील अवलंबित्व कमी करण्याबरोबरच ‘मेक इन इंडिया’ला बळ देणारी, ही योजना म्हणूनच ‘गेम चेंजर’ ठरली आहे.
वस्त्रोद्योग क्षेत्रात दर्जात्मक उत्पादन व उत्पादकतेच्या जोडीलाच नावीन्य-कल्पकता, संशोधन स्थायी स्वरुपातील विकास व त्याशिवाय उद्योजकतेवर भर दिला जातो. याच धोरणांना अनुसरून केंद्र सरकारच्या वस्त्रोद्योग मंत्रालयाने विशेष बाब म्हणून, वस्त्रोद्योगाशी संबंधित स्टार्टअप धोरण जाहीर केले आहे. या नव्या उपक्रमाविषयी...
दिवाळीचे औचित्य साधून महायुती सरकारने राज्यातील गरजू महिलांसाठी विशेष योजना जाहीर केली आहे. 'कॅप्टिव्ह मार्केट' असे या योजनेचे नाव असून, त्याअंतर्गत अंत्योदय शिधापत्रिकाधारकांना दरवर्षी मोफत साडी वितरित केली जाणार आहे. वस्त्रोद्योग विभागामार्फत ही योजना राबविली जाणार आहे.
देशातील एकंदर निर्यातीत महाराष्ट्राचा वाटा ७२ अब्ज डॉलर इतका. भविष्यात तो वाढण्यासाठी निर्यातीला चालना देणारे धोरण नुकतेच राज्य सरकारतर्फे मंजूर करण्यात आले. उद्योगधंद्यांना त्याचा थेट फायदा तर होईलच, त्याशिवाय रोजगार निर्मितीलाही बळ मिळेल. म्हणूनच निर्यातक्षम महाराष्ट्राला आकार देणारे हे धोरण महत्त्वाचे ठरावे.
१९०५ मध्ये दसर्याच्या दिवशी स्वदेशीच्या पुस्कारार्थ झालेल्या विदेशी कपड्याच्या होळीचे जनक ठरले स्वातंत्र्यवीर सावरकर. राजकारणासाठी शिक्षण संस्थेच्या वसतिगृहातून हकालपट्टी झालेले सावरकर हे पहिले विद्यार्थी ठरले.
केंद्र सरकारने महाराष्ट्रासह अन्य राज्यात सात ‘मेगा टेक्सटाईल पार्क’ उभारण्याची योजना जाहीर केली आहे. ‘मेक इन इंडिया’ उपक्रमाचा एक भाग म्हणून हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. यामुळे तब्बल २० लोकांना रोजगार मिळणार आहेत. ‘पंतप्रधान मेगा इंटिग्रेटेड टेक्सटाईल रिजन्स अॅण्ड अपेरल’ योजनेंतर्गत घोषित करण्यात आलेले हे सात प्रकल्प तामिळनाडू, तेलंगणा, कर्नाटक, महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशमध्ये उभारले जाणार आहे.
वसाहतवादी धोरणांचा बळी ठरलेल्या वस्त्रोद्योगाच्या माध्यमातून ब्रिटिश सत्तेविरुद्ध असलेला असंतोष एकवटण्यासाठी ७ ऑगस्ट, १९०५रोजी स्वदेशी आंदोलनाची हाक देण्यात आली. याची आठवण म्हणून भारतात दरवर्षी ७ ऑगस्ट रोजी हातमाग दिवस साजरा केला जातो. त्यानिमित्ताने जाणून घेऊया भारतातील पारंपरिक वस्त्रकला अर्थात हातमाग क्षेत्र आणि त्यासाठी सर्वसामान्य भारतीय काय योगदान देऊ शकतो याविषयी...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्र सरकारच्यावतीने सुरू करण्यात आलेल्या ‘आत्मनिर्भर भारत’ योजनेला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. या योजनेंतर्गत आतापर्यंत देशात गेल्या दहा महिन्यांत ३० लाखांपेक्षा अधिक रोजगारांची निर्मिती करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे. ’कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटने’च्या (ईपीएफओ) वतीने जारी करण्यात आलेल्या आकडेवारीतून ही बाब उजेडात आली असून मार्च २०२२ पर्यंत केंद्र सरकारच्यावतीने या योजनेंतर्गत ५० लाखांहून अधिक रोजगार निर्मितीचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले आहे.
‘आर्ट एक्स्पो’सारखी संस्था आणि ‘उज्ज्वल तारा’ सारखा हातमागामधला मराठमोळा ब्रॅण्ड. हातमाग संस्कृतीला विणकरांच्या माध्यमातून घराघरांत पोहोचविणारी ही उद्योजिका आहे, उज्ज्वल सामंत.