स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर दरवर्षीप्रमाणे या वर्षीही शौर्य पुरस्काराची घोषणा केली आहे. भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना वीरचक्र पुरस्कार जाहीर झाला आहे. बालाकोट एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तानने केलेल्या प्रतिहल्ल्याला उत्तर देताना भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन यांनी पाकिस्तानचे 'एफ १६' हे लढाऊ विमान पाडले होते. स्वातंत्र्य दिनानिमित्त त्यांना या पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.
Read More
वयाच्या ७४ व्या वर्षी 'सर्वोत्कृष्ट साहाय्यक अभिनेत्री' म्हणून पुरस्कार मिळालेल्या एक चिरतरुण अभिनेत्री सुरेखा सिकरी यांच्या विशेष कार्याबद्दल जाणून घेऊया...
भारतीय अंतराळ संशोधन क्षेत्रासाठी सोमवारचा दिवस ऐतिहासिक ठरला. स्थापनेपासूनच स्वतःच्या हिमतीच्या जोरावर पृथ्वीच्या कक्षेबाहेरील विश्वाचा वेध घेण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती बाळगलेल्या भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात 'इस्रो'ने चंद्राच्या दिशेने अंतराळयान प्रक्षेपित केले.
भारत-पाकिस्तान यांच्यात विश्वचषकाच्या सामन्यापूर्वी दोन्ही देशांच्या चाहत्यांमध्ये शाब्दिक युद्ध रंगले आहे.
भारतीय वायुसेनेचा विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांच्या युनिट 'मिग २१' बाइसन स्क्वॉड्रनला 'फाल्कन स्लेयर्स' आणि 'एम्राम डॉजर्स' या शीर्षकांसहित पट्टा बहाल करत त्यांचा गौरव करण्यात आला. २७ फेब्रुवारी रोजी हवाई हल्ल्यादरम्यान पाकिस्तानच्या 'एफ-१६' या लढाऊ विमानाला हाणून पाडण्याच्या कामगिरीमुळे या युनिटचे कौतुक करण्यात आले आहे.
पाकिस्तानी लढाऊ विमान एफ-१६ या विमानाला पाडणारे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान अडीच महिन्यांनंतर पुन्हा सेवेत परतले आहेत.
राजस्थानमध्ये नियमित टेहाळणी करण्यासाठी गेलेले मिग २१ विमान शुक्रवारी कोसळले. या घटनेत पायलट सुरक्षित असल्याची माहिती आहे. बिकानेर येथे भारतीय वायुसेनेचे मिग २१ हे विमान कोसळले. यातून पायलट सुरक्षितरित्या बाहेर पडला.
अभिनंदन यांच्या सुटकेनंतर परिस्थिती निवळली असली तरी आपल्याला गाफील राहून चालणार नाही. नुकतीच बिकानेर सेक्टरमध्ये भारताने पाकिस्तानचा ड्रोन पाडल्याची बातमी आली. त्यामुळे भविष्यातील कार्यवाहीबद्दल काही सूचना कराव्याशा वाटतात.
भारताचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान हे अटारी बॉर्डरवर दाखल झाले आहेत. कोणत्याही क्षणी पाकिस्तान त्यांना भारताकडे सोपवेल.
पाकिस्तानच्या तावडीत असलेले भारतीय विंग कमांडर अभिनंदन वर्धमान हे उद्या भारतात परतणार आहेत. साऱ्या देशवासीयांकडून अभिनंदन यांच्या सुटकेसाठी प्रार्थना सुरू होती. मात्र, आता त्यांच्या सुटकेच्या बातमीने भारताला दिलासा मिळाला आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पाकिस्तान सरकारच्या ट्विटरून ही माहिती दिली आहे. हे शांततेची भावना असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.