मोबाइलचा वापर सोशल मीडियापेक्षा शासकीय योजनांसाठी अधिक करा!

    10-Jul-2025   
Total Views | 7

मुंबई : “उंच झेप घेण्यासाठी संधीचे सोने करा आणि विविध कौशल्ये आत्मसात करा. मोबाइलचा वापर सोशल मीडियापेक्षा शासकीय योजनांसाठी अधिक करा. नकारात्मकतेवर मात करून स्वतःला विकसित करा,” असे प्रेरणादायी उद्गार मुंबई शहराच्या जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी बुधवार, दि. ९ जुलै रोजी काढले.

श्रीमती मणिबेन एम.पी. शाह कला आणि वाणिज्य स्वायत्त महिला महाविद्यालय, माटुंगा येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘झेप: एक पाऊल कौशल्याकडे’ या उपक्रमात विद्यार्थिनींना संबोधित करताना त्या बोलत होत्या. ‘जागतिक युवा कौशल्य दिना’निमित्त बॅचरल ऑफ अकाउंटिंग आणि फायनान्स विभाग आणि जिल्हा कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबवण्यात आला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. अर्चना पत्की यांनी सेवा मंडळ एज्युकेशन सोसायटीची माहिती दिली आणि प्रमुख पाहुणे जिल्हाधिकारी आंचल गोयल, सन्माननीय पाहुणे जिल्हा कौशल्य विकास केंद्राचे सहायक आयुक्त शैलेश भगत, उद्योग क्षेत्रातील मार्गदर्शक विश्राम बापट, कार्यालयीन अधिकारी, प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांचे स्वागत केले.

कार्यक्रमात चार कौशल्याधिष्ठित विद्यार्थिनी - हिरल परमार, फैझा खान, प्रियंका जोगदंड आणि सिद्धी गीते यांचा जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. मार्गदर्शक विश्राम बापट यांनी शासकीय कौशल्य उपक्रमांची माहिती देताना श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरशी विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी विकसित केलेल्या ‘गुरूसूत्र’ ॲपविषयी सविस्तर माहिती दिली. विद्यार्थ्यांनी मान्यवरांशी प्रश्नोत्तर स्वरूपात संवाद साधला. बॅचरल ऑफ अकाउंटिंग आणि फायनान्स विभागाच्या द्वितीय वर्षाच्या विद्यार्थिनींनी महिला सक्षमीकरणावर आधारित नाटिका सादर केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मराठी विभागप्रमुख डॉ. रश्मी शेट्ये-तुपे यांनी, तर आभार प्रदर्शन समन्वयक प्रा. दत्तात्रय गावडे यांनी केले.



सुहास शेलार

'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' म्हणून कार्यरत. मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. गेल्या आठ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. महाराष्ट्राचे राजकारण आणि त्यासंबंधीच्या वृत्तांकनामध्ये विशेष रस. २०१४, २०१९ आणि २०२४ सालच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांचे वार्तांकन. २०१८ साली राजस्थानमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रत्यक्ष वार्तांकनाचा अनुभव.
'मुंबई तरुण भारत'चं व्हॉट्सअप चॅनल फॉलो करा!
अग्रलेख
जरुर वाचा
शाहू, फुले, आंबेडकर आणि अण्णा भाऊंसारखे महापुरुष असताना लेनिन-मार्क्स कशासाठी?

शाहू, फुले, आंबेडकर आणि अण्णा भाऊंसारखे महापुरुष असताना लेनिन-मार्क्स कशासाठी?

"भारताच्या सामाजिक परिवर्तनाच्या लढ्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि अण्णा भाऊ साठे यांसारखे थोर विचारवंत असताना, लेनिन आणि मार्क्ससारख्या परकीय विचारवंतांची गरजच काय?” असा थेट सवाल ज्येष्ठ शाहीर संदेश विठ्ठलराव उमप यांनी उपस्थित केला. अण्णा भाऊ साठे जयंतीनिमित्त दै. ‘मुंबई तरुण भारत’च्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘महाएमटीबी’ या युट्यूब वाहिनीवरील विशेष मुलाखतीत ते बोलत होते. या मुलाखतीत त्यांच्यासोबत गायिका रागिणी मुंबईकर आणि ढोलकीवादक महेश लोखंडे हेही उपस्थित होते...

डोंबिवली एमआयडीसी तील रस्त्यावरील छाटलेल्या झाडांच्या फांद्या उचलल्या ‘मुंबई तरूण भारत’ च्या वृत्ताचा इॅम्पकट

डोंबिवली एमआयडीसी तील रस्त्यावरील छाटलेल्या झाडांच्या फांद्या उचलल्या ‘मुंबई तरूण भारत’ च्या वृत्ताचा इॅम्पकट

डोंबिवली एमआयडीसी परिसरात वीजवितरण कंपनीने विजेच्या तारांवर आलेल्या झाडांच्या फांद्या कापल्या पण त्यानंतर छाटलेल्या फांद्या रस्त्यावर तशाच टाकून दिल्या होत्या. महावितरण, केडीएमसी आणि एमआयडीसी या सर्वाचा निष्काळजीपणा आणि कर्मचाऱ्यांच्या उदासीनतेमुळे त्यांचा नाहक त्रास नागरिकांना सहन करावा लागत होता. त्या विरोधात शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख राजेश कदम यांनी आवाज उठविला होता. या वृत्ताला ‘दैनिक मुंबई तरूण भारत’ ने दि. 1 ऑगस्ट रोजी प्रसिध्दी दिली. हे वृत्त प्रसिध्द होताच खडबडून जाग आलेल्या यंत्रणेकडून रस्त्यावरील ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121