मुंबई इमारत दुरूस्ती व पुनर्रचना मंडळातर्फे जनता दरबार

Total Views | 8

मुंबई : जनसामान्यांच्या समस्यांकडे तात्काळ लक्ष देत त्यांचे निवारण करण्याच्या उद्देशाने ‘म्हाडा’च्या मुंबई इमारत दुरूस्ती व पुनर्रचना मंडळातर्फे नुकतेच दुसर्‍या जनता दरबार दिनाचे आयोजन करण्यात आले. वांद्रे (पूर्व) येथील म्हाडा मुख्यालयातील भारतरत्न गुलजारीलाल नंदा सभागृहात झालेल्या या विशेष उपक्रमात, मुंबई इमारत दुरूस्ती व पुनर्रचना मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या अध्यक्षतेखाली एकूण २७ तक्रार अर्जांवर सुनावणी करण्यात आली.शंभरकर यांनी सर्व अर्जदारांच्या समस्यांचे त्वरित निराकरण करत अर्जदारांच्या मागण्या व प्रलंबित कामे तत्परतेने सोडविण्याचे निर्देश संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांना दिले.

या जनता दरबार दिनात, पुनर्विकासासाठी गेलेल्या उपकरप्राप्त इमारतीतील मूळ भाडेकरू/रहिवासी यांची नावे वगळली जाणे, विकासकाकडून भाडे न मिळणे, पुनर्विकासासाठी ना हरकत प्रमाणपत्र प्रलंबित असणे, सदनिका हस्तांतरित करतेवेळी इतर वारसांचे ना-हरकत प्रमाणपत्र घेतलेले नसणे, वारस म्हणून नाव लावणे, म्हाडा सर्वेक्षणानंतर भाडेकरू/रहिवासी असल्याची प्रमाणित प्रत देणे आदी मुद्यांवरील तक्रारी प्राप्त झाल्या. शंभरकर यांनी सर्व अर्जदारांचे म्हणणे सहानुभूतीपूर्वक ऐकून घेऊन, संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ व योग्य कार्यवाही करण्याचे स्पष्ट निर्देश दिले.

गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.
'मुंबई तरुण भारत'चं व्हॉट्सअप चॅनल फॉलो करा!
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121