'एकात्म मानवदर्शन' या तत्त्वाने विश्वकल्याणाचे उद्दिष्ट साधता येईल

- भाजपचे संघटन महामंत्री व्ही सतीश; रुईया महाविद्यालयात सर्वधर्मीय परिसंवाद

    25-Apr-2025
Total Views | 17


The principle of

मुंबई, पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी सांगितलेल्या 'एकात्म मानवदर्शन ' या तत्त्वाने विश्वकल्याणाचे उद्दिष्ट साधता येईल, त्यासाठी समाजात अध्यात्माचे धडे देणाऱ्या धर्मगुरूंनी समाजात आपल्या संयुक्तिक भाषेत जनतेला जागरूक करावे असे, आवाहन भाजपचे अखिल भारतीय संघटन महामंत्री व्ही. सतीश यांनी केले. पंडित दीनदयाळ उपाध्याय एकात्म मानवदर्शन हिरक महोत्सव अंतर्गत सर्व धर्मीय अध्यात्मिक साधकांच्या संवादाचा विशेष कार्यक्रम रुईया महाविद्यालयात आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते.

पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या 'एकात्म मानवदर्शन ' या तत्वज्ञानाच्या ऐतिहासिक व्याख्यानाला ६० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात मुंबईतील अनेक धार्मिक संस्थांचे प्रतिनिधी सहभागी झाले. अध्यात्माचा 'एकात्म मानवदर्शन' या तत्वावर परिणाम या विषयावर भाजपचे अखिल भारतीय सह संघटन मंत्री शिवकुमारजी यांनी अध्यात्मिक साधकांशी संवाद साधला. यावेळी शिवकुमारजी यांनी स्पष्ट केले की, पंडितजींचे “एकात्म मानवदर्शन” हे संपूर्ण मानवजातीसाठी उपयुक्त तत्त्वज्ञान आहे, ज्यात व्यक्तीचा सर्वांगीण विकास, समाजाच्या समरस रचना आणि पर्यावरणाशीही सुसंवाद( जपणूक) समावेश असून अध्यात्मिक साधकांनी याचा प्रसार आपापल्या धार्मिक संस्थांमध्ये करावा. एकात्म मानवदर्शन हे शरीर, मन, बुध्दी आणि आत्मा यांच्या संयोगातून “वसुधैव कुटुंबकम्”, “सर्वे भवंतु सुखिनः” यांसारख्या मूल्यांच्या आधाराने विश्वकल्याण साधता येते, हे शिवकुमारजी यांनी यावेळी उपस्थितांना पटवून दिले.

पंडित दीनदयाळ उपाध्याय एकात्म मानवदर्शन हिरक महोत्सव समितीचे अध्यक्ष आणि कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनीही यावेळी विविध धार्मिक आणि संप्रदायाच्या प्रतिनिधीशी संवाद साधला. यावेळी लोढा यांनी सांगितले की, एकात्म मानवदर्शन केवळ मनात न राहता, ते खऱ्या अर्थाने जनतेपर्यंत पोहोचले पाहिजे. देशाला पुढे नेण्यासाठी समाजातल्या प्रत्येक घटकांमध्ये हे तत्वज्ञान प्रसारित होणे आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

या कार्यक्रमात यशोदाबाई गोविंद गंगाधर फडके चॅरिटेबल ट्रस्ट, जगतगुरु नरेंद्र महाराज यांचे आयुयायी, बौद्ध भंतेजी, प्रजापती ब्रह्मकुमारी समुदाय, अध्यात्मिक गुरू अनिरुद्ध बापू यांचे प्रतिनिधी तसेच श्रीमत् रामचंद्र मिशन, युथ फॉर नेशन फाउंडेशन आणि सद्गुरू वामनराव पै संस्थेचे प्रतिनिधी ही यावेळी उपस्थित होते.



अग्रलेख
जरुर वाचा
एअर इंडियाचं विमान कोसळण्यापूर्वी काय काय झालं? प्रत्येक सेकंदाला काय घडत गेलं? १२ जूनचा घटनाक्रम जाणून घ्या सविस्तर..

एअर इंडियाचं विमान कोसळण्यापूर्वी काय काय झालं? प्रत्येक सेकंदाला काय घडत गेलं? १२ जूनचा घटनाक्रम जाणून घ्या सविस्तर..

(Ahmedabad Plane Crash 2025 Report) अहमदाबादमध्ये १२ जून रोजी झालेल्या एअर इंडिया विमान अपघाताच्या बरोबर एक महिन्यानंतर, या अपघाताचा प्राथामिक अहवाल केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयाकडे सादर करण्यात आला आहे. १५ पानांच्या अहवालात कॉकपिटमध्ये दोन्ही पायलट्समध्ये काय संवाद झाला, याची माहिती देण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, एअर इंडियाच्या विमानाने उड्डाण घेतल्यानंतर काही सेकंदातच दोन्हीं इंजिन बंद झाले होते, अशी माहिती समोर आली आहे. इंजिन १ आणि इंजिन २ यांना इंधन पुरवठा करणारे फ्युयल स्विचेस बंद झाल्यानंतर..

बांगलादेशातील हिंदू अल्पसंख्याकांची दुर्दशा, ब्रिटिश खासदारांची तीव्र प्रतिक्रिया! - युनूस सरकारविरोधात कडक कारवाईची मागणी

बांगलादेशातील हिंदू अल्पसंख्याकांची दुर्दशा, ब्रिटिश खासदारांची तीव्र प्रतिक्रिया! - युनूस सरकारविरोधात कडक कारवाईची मागणी

मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वातील बांगलादेशची सद्यस्थिती पाहता हिंदू अल्पसंख्याकांवर अद्याप हल्ले होत आहेत. दक्षिण आशियाई देशातील हिंदू अल्पसंख्याकांची सुरक्षा आणि कल्याण सुनिश्चित करण्यात अपयशी ठरल्याबद्दल बांगलादेशातील युनूस सरकार विरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी अनेक प्रमुख ब्रिटिश राजकीय नेते, माजी आणि विद्यमान खासदार, मानवाधिकार कार्यकर्ते आणि विविध धार्मिक समुदायांच्या सदस्यांनी पंतप्रधान केयर स्टारमर यांच्या सरकारला केली आहे. कन्झर्व्हेटिव्ह फ्रेंड्स ऑफ बांगलादेश (सीएफओबी) आयोजित एका चर्चासत्रात ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121