पंतप्रधान मोदी आणि ब्रुनेईचे सुलतान यांच्यात द्विपक्षीय चर्चा

    05-Sep-2024
Total Views |

narendra modi
 
 
नवी दिल्ली, दि. ४ : विशेष प्रतिनिधी : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्रुनेईचे सुलतान हाजी हसनल बोलकिया यांची बुधवारी द्विपक्षीय बैठक झाली. या भेटीत द्विपक्षीय संबंधांशी संबंधित अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली.
 
"भारताच्या पंतप्रधानांचा ब्रुनेईचा हा पहिला द्विपक्षीय दौरा असून द्विपक्षीय संबंधांना चालना देण्याची भारताची तीव्र इच्छा यातून दिसून येते," असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. हा दौरा भारताच्या ‘ॲक्ट ईस्ट पॉलिसी’ला बळकट करण्याप्रति वचनबद्धतेच्या अनुषंगाने होता, ज्याला आता १० वर्षे होत आहेत. द्विपक्षीय संबंध भागीदारीमध्ये रूपांतरित झाल्याचे दोन्ही नेत्यांनी स्वागत केले. उभय नेत्यांनी संरक्षण,व्यापार आणि गुंतवणूक, अन्न सुरक्षा, शिक्षण, ऊर्जा, अंतराळ तंत्रज्ञान, आरोग्य, क्षमता निर्मिती, संस्कृती तसेच लोकांमधील देवाणघेवाण अशा विविध विषयांवर द्विपक्षीय चर्चा केली. त्यांनी आयसीटी, फिनटेक, सायबर सुरक्षा, नवीन आणि उदयोन्मुख तंत्रज्ञान तसेच नवीकरणीय ऊर्जा यांसारख्या क्षेत्रांमध्ये सहकार्याच्या संधींचा शोध आणि पाठपुरावा करण्याबाबत सहमती दर्शवली.
 
पंतप्रधान आणि ब्रुनेईचे सुलतान यांनी प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवरही चर्चा केली. दोन्ही नेत्यांनी दहशतवादाच्या सर्व प्रकारांचा आणि अभिव्यक्तींचा निषेध केला आणि इतर देशांनाही त्याला थारा न देण्याचे आवाहन केले. दोन्ही नेत्यांनी आसियान – भारत सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारी आणखी मजबूत करण्यासाठी परस्पर हितांच्या क्षेत्रात एकत्रितपणे काम करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. 'आसियान सेंटर फॉर क्लायमेट चेंज' च्या आयोजनात ब्रुनेई दारुस्सलामच्या प्रयत्नांना भारताने दिलेल्या पाठिंब्याची सुलतान यांनी प्रशंसा केली.
 
सेरी बेगवान ते चेन्नई थेट विमानसेवा
 
उपग्रह आणि प्रक्षेपण वाहनांसाठी टेलिमेट्री, ट्रॅकिंग आणि टेलिकमांड स्टेशनच्या परिचालनात सहकार्यसंबंधी सामंजस्य करारावर दोन्ही नेत्यांच्या उपस्थितीत परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस.जयशंकर आणि ब्रुनेईचे परिवहन आणि माहितीसंचारमंत्री पेंगिरन दातो शामरी पेंगिरन दातो मुस्तफा यांनी स्वाक्षरी केली आणि देवाणघेवाण केली. बंदर सेरी बेगवान आणि चेन्नई दरम्यान थेट विमान सेवा लवकरच सुरु केली जाणार असल्याबद्दल उभय नेत्यांनी स्वागत केले.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
विमानाने झेप घेताच २ मिनिटांत काळाचा घाला - अहमदाबादहुन लंडनच्या दिशेने जाणारे विमान कोसळले

विमानाने झेप घेताच २ मिनिटांत काळाचा घाला - अहमदाबादहुन लंडनच्या दिशेने जाणारे विमान कोसळले

अहमदाबादहून लंडनच्या दिशेने झेपावलेले एअरइंडियाचे फ्लाइट नंबर एआय-१७१ हे विमान उड्डाणानंतर अवघ्या २ मिनिटांत तांत्रिक बिघाडामुळे निवासी भागात कोसळले. या भीषण दुर्घटनेत अहमदाबादहून लंडनला निघालेल्या २४२ प्रवासी होते. यात २४१ प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. एक प्रवासी जखमी अवस्थेत मिळाला आहे. या २४२ प्रवाशांमध्ये आणि क्रू मेंबर्स, १६९ भारतीय नागरिक, ५३ ब्रिटिश नागरिक, १ कॅनेडियन नागरिक आणि ७ पोर्तुगीज नागरिक होते. या संपूर्ण दुर्घटनेबाबत जगभरातुन शोक व्यक्त करण्यात येत आहे. अत्यंत दुर्दैवी बाब म्हणजे ..

सिंचन वाढीसाठी मुख्यमंत्र्यांकडून कालबद्ध कार्यक्रम - ३८१ सिंचन प्रकल्पातून ३० लाख ६८ हजार ६७३ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार

सिंचन वाढीसाठी मुख्यमंत्र्यांकडून कालबद्ध कार्यक्रम - ३८१ सिंचन प्रकल्पातून ३० लाख ६८ हजार ६७३ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार

सिंचन क्षमता वाढवण्यासाठी राज्यातील ३८१ सिंचन प्रकल्पांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. या प्रकल्पांच्या माध्यमातून ३० लाख ६८ हजार ६७३ हेक्टर सिंचन क्षेत्र निर्माण होणार आहे. तर ४५ उदंचन प्रकल्पांच्या माध्यमातून ६२ हजार १२५ मेगावॅट वीज निर्मिती, तर ९६ हजार १९० रोजगार निर्मिती होणार आहे. राज्याचे विकासचक्र वेगवान करण्यासाठी सिंचन प्रकल्प आणि उदंचन जलविद्युत प्रकल्पांची कामे कालबध्दरित्या गतीने पूर्ण करावीत, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवार, दि. १२ जून रोजी दिले...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121