शरद पवारांनी कृषीमंत्री असताना ठाणे जिल्ह्याच्या शेतकऱ्यांसाठी काय केलं?

खासदार कपील पाटील यांचा शरद पवारांना सवाल

    12-May-2024
Total Views | 42
 
Sharad Pawar
 
मुंबई : मला एकाने विचारले तुम्ही शेतकऱ्यांसाठी काय केलं. तेव्हा मी त्याला सांगितलं की, ते दहा वर्षे कृषी मंत्री होते. त्यांनी काय केलं? राज्यात त्यांचेच सरकार होते. त्यांनी ठाणे जिल्हयासाठी आणि ठाण्यातील शेतकऱ्यांसाठी काय केलं? असा सवाल भिवंडी लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढविणारे महायुतीचे उमेदवार खासदार कपील पाटील यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांचा नामोल्लेख न करता उपस्थित केला आहे.
 
ठाणे, कल्याण आणि भिवंडी लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार यांच्या प्रचारार्थ कल्याण पश्चिमेतील व्हर्टेक्स मैदानात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभेचे आयोजन १५ मे रोजी करण्यात आले आहे. या सभेची माहिती देताना खासदार पाटील यांनी उपरोक्त सवाल उपस्थित केला आहे.
 
हे वाचलंत का? -  "१९९९ मध्येच उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री..."; उपमुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट
 
खासदार पाटील यांनी सांगितले की, "आपल्याला नाशिक पुण्यावरुन आज भाजीपाला येतो. दुध आपल्याला बाहेरुन येते. ते आपल्याला आणावे लागले नसते. ठाणे आणि मुंबईची लोकसंख्या ही राज्यातील एकूण लोकसंख्येपैकी २५ टक्के आहे. या जिल्ह्यातील पैसे दुसऱ्या जिल्ह्यात जातात. त्यांना लागणारे दूध हे नाशिक, धुळे, पुणे, कोल्हापूरहून येते. इथे आपल्या गोव्या नाक्यावर मदर डेअरी आहे. मदर डेअरीत दूध बारामतीचे येते. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांकडून दूध घेऊन याठिकाणी विकायचे. हा निर्णय मी घेतलेला नाही," असे ते म्हणाले.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
एअर इंडियानं १६ विमानं वळवली! लंडनला निघालेलं विमान अर्ध्या तासात माघारी; नेमकं  काय घडलं?

एअर इंडियानं १६ विमानं वळवली! लंडनला निघालेलं विमान अर्ध्या तासात माघारी; नेमकं काय घडलं?

(Air India flights) इस्रायलने शुक्रवारी दि.१३ जून रोजी इराणची राजधानी तेहरानसह वेगवेगळ्या भागांमध्ये हवाई हल्ला केला, ज्यामुळे मध्य-पूर्वेत मोठा तणाव निर्माण झाला आहे. दरम्यान, सुरक्षेच्या कारणास्तव इराणने तातडीने आपले हवाई क्षेत्र बंद केले आहे. त्यामुळे आता कोणत्याही देशाची विमानं इराणच्या हवाई क्षेत्रामधून उड्डाण करू शकणार नाहीत. याचा भारतीय विमानांना मोठा फटका बसला आहे. इराणने त्यांची हवाई क्षेत्र बंद केल्यामुळे एअर इंडियाच्या १६ विमानांचा मार्ग बदलावा लागला आहे. यापैकी काही विमानं मागे वळवावी लागली. ..

एअर इंडिया विमान अपघातात खुशबू राजपुरोहित यांचा मृत्यू; पतीला भेटण्यासाठी निघाली होती लंडनला

एअर इंडिया विमान अपघातात खुशबू राजपुरोहित यांचा मृत्यू; पतीला भेटण्यासाठी निघाली होती लंडनला

एअर इंडियाच्या ए-१४१ अहमदाबाद-लंडन या विमानाचा उड्डाणाच्या काही कालावधीनंतर अपघात झाला. यात एकूण २४१ प्रवासी आणि २४ विद्यार्थी व डॉक्टर, असे मिळून २६५ जणांचा मृत्यू झाला. राजस्थानच्या पाली जिल्ह्यातील खुशबू राजपुरोहित यांचाही या मृतांमध्ये सामावेश होता. खुशबूचा पाच महिन्यांपूर्वीच विवाह झाला होता. तिचे पती मयूर पुरोहित हे लंडनमध्ये डॉक्टर म्हणून रुग्णसेवा बजावतात. खुशबू त्यांना भेटण्यासाठी लंडनला निघाली होती. ही तिची पतीसोबतची पहिली भेट होती, कारण विवाहानंतर लगेच मयूर लंडनला रवाना झाले होते. त्यामुळे खुशबूच..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121