'आपल्यातील मतभेद आणि वाद मिटवून संघटित व्हा!'

सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांचे हिंदूंना आवाहन

    06-Oct-2024
Total Views | 23539
rss sarsanghchalak dr mohanji bhagwat


मुंबई (विशेष प्रतिनिधी) :   "हिंदू समाजाला सुरक्षित राहायचं असेल तर भाषा, जात आणि प्रांतावर आधारित मतभेद आणि वाद मिटवून संघटित व्हा.", असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी केले. राजस्थानच्या बारण येथे शनिवार, दि. ५ ऑक्टोबर रोजी धनमंडी मैदानावर नगरातील स्वयंसेवकांचे एकत्रिकरण संपन्न झाले. त्यावेळी ते बोलत होते.
 
 


भारत हे हिंदू राष्ट्र असल्याचे सांगत सरसंघचालक म्हणाले, आम्ही भारतमातेचे पुत्र आहोत. म्हणून आम्ही भारत मातेसाठी जगू आणि भारत मातेसाठीच मरू. हिंदू भारतात अनादीकाळापासून राहत आहेत. हिंदू हा शब्द भारतात राहणाऱ्या सर्व पंथांसाठी वापरण्यात आला. हिंदू प्रत्येकाला आपलं मानतात आणि सर्वांना सामावून घेतात. समाज असा असावा जिथे संघटन, सद्भावना आणि आत्मीयता असेल. समाजात आचरणाची शिस्त, राज्याप्रती कर्तव्य आणि ध्येयासाठी समर्पित राहण्याची गुणवत्ता आवश्यक आहे. समाज केवळ मी आणि माझ्या कुटुंबाने बनत नाही, तर समाजाच्या सर्वांगीण चिंतेतून आपल्या जीवनात भगवंताची प्राप्ती करायची असते.
 
उपस्थित स्वयंसेवकांना संबोधत सरसंघचालक पुढे म्हणाले, वस्तीवस्तीपर्यंत स्वयंसेवकाचा संपर्क असावा. समाजाला बळकटी देऊन वस्त्यांमधील उणिवा दूर करण्याचा प्रयत्न प्रत्येकाने केला पाहिजे. सामाजिक समरसता, सामाजिक न्याय, सामाजिक आरोग्य, शिक्षण आणि स्वावलंबनासाठी समाजात आग्रही असले पाहिजे. समाजाच्या छोट्या घटकांमध्ये समरसता, सद्भावना, पर्यावरण, कुटुंब प्रबोधन, स्वदेशी आणि नागरी भावना या गोष्टी सहज सुलभ होऊ शकतात. जीवनात छोट्या-छोट्या गोष्टी अंमलात आणून समाज आणि राष्ट्राच्या प्रगतीत मोठे योगदान देता येते.

यावेळी मंचावर सरसंघचालकांसह राजस्थान क्षेत्र संघचालक डॉ. रमेश अग्रवाल, चित्तोड प्रांत संघचालक जगदीश सिंह राणा, बारण विभाग संघचालक रमेश चंद मेहता आणि बारण जिल्हा संघचालक वैद्य राधेश्याम गर्ग उपस्थित होते. नगर एकत्रिकरणात एकूण ३८२७ स्वयंसेवक सहभागी झाले होते.



अग्रलेख
जरुर वाचा
पहिला श्रावण सोमवार , वसईच्या शिवालयात महादेवाची पूजा अर्चा ,जलाभिषेक करण्यासाठी भाविकांची रिघ ,भालीवली ईश्वरपुरी येथे विशाल भंडारा

पहिला श्रावण सोमवार , वसईच्या शिवालयात महादेवाची पूजा अर्चा ,जलाभिषेक करण्यासाठी भाविकांची रिघ ,भालीवली ईश्वरपुरी येथे विशाल भंडारा

श्रावण मासारंभाच्या पहिल्या सोमवारी वसईच्या शिवालयात पहाटे पासून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.तर येथील शिवालयात भोळ्या महादेवाच्या पिंडीवर पूजा अर्चा करून जलाभिषेक करण्यासाठी भाविकांची मोठी रिघ लागली होती.यातील प्राचीन मंदिरांपैकी तुंगार अरण्यातील ईश्वरपुरी च्या निसर्गरम्य आत्मलिंगेश्वर मंदिरात व भालीवली येथील जागृत महादेव वृंदावन टेकडी मंदिरात विशाल भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते .याचा लाभ आलेल्या भाविकांनी घेतला.या भंडाऱ्यात उपवासाला चालणारे पदार्थही होते.अगदी संध्याकाळ ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121