वांद्र्यातल्या कट्ट्यावर बसलेले उमेश-प्रिया, दुसऱ्या दिवशी थेट वृत्तपत्रात फोटो, २५ वर्षांनी सांगितला किस्सा

    26-Oct-2024
Total Views | 70
 
priya umesh
 
 
मुंबई : मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय जोडी म्हणजे उमेश कामत आणि प्रिया बापट. त्यांची लव्हस्टोरी सर्वांना माहिच आहेच. पण नुकताच झी मराठी पुरस्कार सोहळा संपन्न झाला आणि यावेळी उमेशने आजवर कधीही न सांगितलेला मजेशीर किस्सा २५ वर्षांनी पहिल्यांदाच सांगितला. नक्की लव्हस्टोरीचा तो खास किस्सा कोणता आहे जाणून घेऊयात..
 
झी मराठी पुरस्कार सोहळ्याचं यंदा २५ वं वर्ष होतं. या निमित्तानं या २५ वर्षात गाजलेल्या सगळ्याच मालिकांमधील कलाकार हा सोहळ्याला हजर होते. उमेश कामत आणि प्रिया बापट यांनी देखील या सोहळ्याला हजेरी लावल्याचं पाहायला मिळालं. तसेच,  लोकप्रिय मालिका आभाळमाया या मालिकेतील सर्व जुन्या कलाकारांनी आवर्जून हजेरी लावत सगळ्यांनाच भावूक केले.
 

priya umesh  
 
उमेश म्हणाला की, “एकदा आम्ही वांद्रे रेक्लेमेशनला बसलो होतो. सगळ्यांना माहितीच असतील ते स्पॉट्स. यावर प्रिया हसली. उमेश म्हणाला की, हे तुला पण नाही माहिती. आतापर्यंत आम्ही मुलाखतींमध्ये तेच तेच किस्से सांगितलेत. पण किस्सा आता पहिल्यांदाच सांगतोय. आम्ही तिथेच बाइक लावून, कट्ट्यावर बसलो होतो. हे सगळं लपवा लपवीचे दिवस होते. दुसऱ्या दिवशी प्रियाचा मला फोन आला घाबरून. एका पेपरात असा एक फोटो आलेला आहे. वांद्रे रेक्लेमेशनच्या कट्ट्यावर बसलेल्या कपल्सचा एक फोटो मुंबई वृत्तांतच्या पहिल्या पानावर आला होता. त्यामुळं पुढचे दोन दिवस आम्ही एकमेकांना समजवत होतो की, ते आपण आहोत हे नाही कळणार कोणाला”, उमेशने हा किस्सा सांगितल्यावर उपस्थितांमध्ये हशा पिकला होता. तर यावर पुढे प्रिया म्हणाली की, माझ्या मैत्रिणीच्या मावशीनं मला त्या फोटोत ओळखलं होतं, त्यानंतर मी घरी आलेल्या पेपरातून तो फोटो कापून टाकला होता..”
अग्रलेख
जरुर वाचा
छत्रपती शिवाजी महाराजांची दुर्गसंपदा महाराष्ट्राच्या शौर्याचा वारसा!

छत्रपती शिवाजी महाराजांची दुर्गसंपदा महाराष्ट्राच्या शौर्याचा वारसा!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केले महाराष्ट्राचे अभिनंदन महाराष्ट्रातील रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, स्वर्णदुर्ग, विजयदुर्ग, खान्देरी हे ११ किल्ले आणि तमिळनाडूतीलजिंजी असे एकूण १२ किल्ले जागतिक वारसा म्हणून घोषित करण्यात आले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी घडवलेली ही दुर्ग संपदा ही महाराष्ट्राच्या शौर्याचा आणि सांस्कृतिक वारसा आहे. या ऐतिहासिक किल्ल्यांचा युनोस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश होणे, ही संपूर्ण महाराष्ट्र आणि देशासाठी अत्यंत अभिमानाची ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121