मंदिरांवरील हल्ल्यावर नरेंद्र मोदी ऑस्ट्रेलियन पंतप्रधान अल्बानीज यांना काय म्हणाले?

ऑस्ट्रेलियातील भारतीयांच्या सुरक्षेला प्राधान्य

    12-Mar-2023
Total Views | 83
pm-modi-speaks-with-pm-albanese-on-attacks-on-temples-in-australia

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियातील भारतीय मंदिरे आणि समुदायाच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यात येईल, असे आश्वासन ऑस्ट्रेलियन पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या संदर्भातील प्रश्न उपस्थित केला होता.

 ऑस्ट्रेलियन पंतप्रधान अल्बानीज ८ ते ११ मार्च दरम्यान भारताच्या दौर्‍यावर होते. त्यावेळी पंतप्रधान मोदी यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. या संदर्भात पंतप्रधान मोदी म्हणाले, “गेल्या काही आठवड्यांपासून ऑस्ट्रेलियातील मंदिरांवर हल्ले होत असल्याचे वृत्त येत आहे. यामुळे भारतातील लोकांची चिंता वाढली आहे. यासंदर्भात आमची पथके नियमितपणे संपर्कात राहतील. अशा आव्हानांचा सामना करणे महत्त्वाचे आहे,‘’ असेही ते म्हणाले.
 
जानेवारीत ऑस्ट्रेलियात तीन मंदिरांवर झाले होते हल्ले
 
जानेवारीत मेलबर्नच्या अल्बर्ट पार्क भागात इस्कॉनच्या हरेकृष्ण मंदिराची तोडफोड झाली. याच महिन्यात कॅरम डाउन्समध्ये श्री शिव विष्णू मंदिर व स्वामीनारायण मंदिरात तोडफोड झाली होती. याचे पडसाद सर्वत्र उमटले होते.

अग्रलेख
जरुर वाचा
राज ठाकरेंची पक्षसंघटनेवर आचारसंहिता! म्हणाले, मला विचारल्याशिवाय...

राज ठाकरेंची पक्षसंघटनेवर आचारसंहिता! म्हणाले, "मला विचारल्याशिवाय..."

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षातील सर्व नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना एक ठाम आणि स्पष्ट आदेश दिला आहे. राज ठाकरे यांनी सांगितले की, "पक्षातील कोणताही नेता, कार्यकर्ता, प्रतिनिधी यांनी कोणत्याही वृत्तपत्र, वृत्तवाहिनी किंवा डिजिटल माध्यमांशी संपर्क साधू नये. तसेच, स्वतःचे मत व्हिडीओच्या माध्यमातून सोशल मीडियावर अपलोड करणेही थांबवावे." याशिवाय, त्यांनी पक्षाचे अधिकृत प्रवक्ते यांनाही इशारा दिला आहे. राज ठाकरे म्हणाले, "ज्यांना अधिकृत प्रवक्त्याची जबाबदारी दिली आहे त्यांनी सुद्धा माझी परवानगी घेतल्याशिवाय ..

महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुनर्रचनेची अधिसूचना जाहीर ; पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या पाठपुराव्याला यश

महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुनर्रचनेची अधिसूचना जाहीर ; पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या पाठपुराव्याला यश

राज्यातील विविध विकास कामे व प्रकल्पांना किनारी क्षेत्र नियमन (सीआरझेड) अंतर्गत वेळेवर मंजुरी मिळावी यासाठी महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण पुनर्रचना व्हावी यासाठी राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या या प्रयत्नांना अखेर यश मिळाले असून, केंद्र सरकारच्या पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण पुनर्रचित करत अधिसूचना जारी केली आहे...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121