ऑस्ट्रेलियात एक अनोखी घटना घडली आहे. शार्लेट नावाची २० वर्षांची तरुणी डॉक्टरकडे गेली होती. तिच्या पोटात वेदना होत होत्या. ती महिला डॉक्टरकडे गेली, तिच्या डॉक्टरांनी काही नियमित तपासण्या केल्या. पण रिपोर्ट पाहून डॉक्टरही थक्क झाले. कारण शार्लेट प्रेग्नंट होती.
Read More
Australia मध्ये नुकतेच ‘सेंटर फॉर लँग्वेज एक्सचेंज अॅण्ड को-ऑपरेशन’ केंद्राच्या अनेक शाखांना टाळे ठोकण्यात आले आहे. या केंद्रांच्या शाखा जगभरातल्या 160 देशांमध्ये आहेत आणि यामध्ये दहा दशलक्ष विद्यार्थी चिनी भाषा आणि संस्कृती शिकत आहेत. अशा या केंद्रांना बंद करण्याचे पाऊल ऑस्ट्रेलियाने का उचलले? ‘सेंटर फॉर लँग्वेज एक्सचेंज अॅण्ड को-ऑपरेशन’ केंद्र नक्की काय आहे?
Steve Smith Retired टीम इंडिया विरूद्ध ऑस्ट्रिलेया दरम्यान चॅम्पियन्स ट्रॉफी सेमीफायनल दुबईमध्ये दि : ४ मार्च २०२५ रोजी पार पडली. या सेमी फयनलमध्ये टीम इंडियाने ऑस्ट्रेलियावर विजय मिळवत वनडे विश्वचषकाचा बदला घेतला आहे. त्यामुळे आता ऑस्ट्रेलियाचा पराभव हा चांगलाच जिव्हारी लागला आहे. मात्र, या सामन्यानंतर आता ऑस्ट्रेलियाचा अनुभवी खेळाडू आणि कर्णधार स्टिव्ह स्मिथने वनडे क्रिकेटला अखेरचा राम राम केला आहे.
त्या महिलेने, मुस्लीम महिलेच्या हिजाबनेच तिचा गळा आवळला. नंतर दुसर्या मुस्लीम महिलेलाही मारहाण केली. दोन मुस्लीम महिलांना मारहाण केली, म्हणून आता पोलिसांनी तिला अटक केली आहे. त्या मुस्लीम महिलांचे म्हणणे होते की, आम्ही शॉपिंग सेंटरमध्ये हिजाब घालून आलो, म्हणून त्या महिलेने आमच्यावर हल्ला केला. ही घटना आहे ऑस्ट्रेलियाची.
भारताच्या कृषी निर्यातीसाठी एका महत्त्वपूर्ण टप्प्याअंतर्गत कृषी व प्रक्रिया केलेले अन्न उत्पादने निर्यात विकास प्राधिकरण अर्थात(अपेडा) अॅग्रोस्टार व के. बी. एक्सपोर्ट्सच्या सहकार्याने प्रीमियम सांगोला तसेच भगवा या डाळिंबाची भारतातील पहिली व्यावसायिक चाचणी शिपमेंट समुद्रमार्गे ऑस्ट्रेलियाला यशस्वीरित्या पाठवण्यात आली. भारतातील ताज्या उत्पादनांसाठी बाजारपेठ उपलब्धता वाढविण्याच्या दृष्टीने हे एक मोठे यश आहे.
समोर आलेल्या परिस्थितीचे रुपांतर संधीमध्ये करत, कष्ट, जिद्द आणि सचोटी यांच्या जोरावर ऑस्ट्रेलियामध्ये सर्जंट ( Surgent in Australia ) पदावर कार्यरत असलेल्या अशोक घुगे यांच्याविषयी....
(Gautam Gambhir) भारतीय क्रिकेट संघ सध्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू असलेल्या या कसोटी मालिकेमध्ये भारतीय संघाची कामगिरी फारशी चांगली झालेली नाही. त्यामुळेच सिडनीमध्ये होणाऱ्या शेवटच्या कसोटी सामन्यापूर्वी मेलबर्न येथील पराभवाचे पडसाद भारतीय ड्रेसिंग रुममध्ये उमटल्याच्या चर्चा होत्या. मेलबर्न पराभवानंतर भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरने भारतीय खेळाडूंना फटकारल्याचे वृत्त माध्यमांमधून समोर येत होते. परंतु गंभीरने ड्रेसिंग रुममधील या
(Rohit Sharma) मेलबर्न कसोटी सामन्यातील भारताच्या पराभवानंतर आता क्रिकेटविश्वातून मोठी बातमी समोर येत आहे. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा लवकरच कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा करू शकतो. माध्यमांना मिळालेल्या माहितीनुसार, ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू असलेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेनंतर रोहित शर्माच्या निवृत्तीची घोषणा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे आता सिडनीमध्ये खेळला जाणारा पाचव्या कसोटी सामना हा त्याच्या कारकिर्दीतील शेवटचा सामना असल्याचे बोलले जात आ
Virat Kohli and Sam Constas आंतरराष्ट्रीय क्रिकेट बोर्डाने भारताचा रन मशिन विराट कोहलीवर एका सामन्यात गैरवर्तन केल्याप्रकरणी एकूण मानधनांपैकी २० टक्के कपातीची दंडात्मक कारवाई ठोठावण्यात आली. भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या तिसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशीच घडलेल्या घटनेप्रसंगी आयसीसीने कारवाईचे आदेश दिले. ही घटना गुरूवारी २६ डिसेंबर २०२४ रोजी घडली.
( Dr. S. Jaishankar ) कॅनडामध्ये जस्टीन ट्रुडो यांच्या नेतृत्वाखालील सरकार दहशतवाद्यांना ‘राजकीय आश्रय’ उपलब्ध करून देत आहे, अशी टिका परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी आपल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यामध्ये मंगळवार दि. ५ नोव्हेंबर रोजी1 केली आहे.
ऑस्ट्रेलियातील न्यू साउथ वेल्स विद्यापीठाने नुकत्याच केलेल्या अभ्यासात, भारतातील समर्पित मालवाहतूक कॉरिडॉर देशाच्या जीडीपीमध्ये १६,००० कोटी रुपयांनी वाढ करण्याचा अंदाज आहे. वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर कार्यान्वित झाल्यामुळे मालवाहतूक खर्च आणि प्रवासाच्या वेळेत लक्षणीय घट झाली आहे, ज्यामुळे वस्तूंच्या किंमती ०.५ टक्क्यांपर्यंत कमी झाल्या आहेत, असे या अहवालात म्हणण्यात आले आहे.
(Quad summit 2024) पंतप्रधान नरेंद्र मोदी २१ ते २३ सप्टेंबर रोजी त्यांच्या अमेरिका दौऱ्यादरम्यान चौथ्या ‘क्वाड’ शिखर परिषदेस उपस्थित राहणार आहेत. या शिखर परिषदेत ‘क्वाड’ सदस्य देशांमधील गेल्या एक वर्षातील प्रगतीचा आढावा घेतला जाईल आणि भविष्यासाठी योजना ठरवल्या जातील.
ऑस्ट्रेलियातील सिडनीच्या अब्जावधी डॉलर्सच्या मेट्रो सिस्टीमचा नवीनतम टप्पा ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुरु होणार आहे. ज्याप्रमाणे आपल्याला मुंबईच्या उदरातून धावणार्या ‘मेट्रो ३’ची प्रतीक्षा आहे, त्याचप्रमाणे आता सिडनीवासीयांना या अब्जावधींच्या मेट्रो प्रकल्पाचा दुसरा टप्पा सुरु होण्याची प्रतीक्षा आहे. काही मिनिटांत चालकविरहित गाड्यांतून प्रवाशांना शहराच्या एका टोकाकडून दुसर्या टोकाकडे आरामदायी प्रवास करता येईल.
परदेशात जाऊन उच्च शिक्षण घेणे ही जरी मोठी गोष्ट असली, तरी व्हिसासंदर्भातील नवनवीन नियमावलीमुळे या विषयाकडे सध्या मोठ्या गांभीर्यतेने पाहिले जात आहे. कॅनडा आणि ऑस्ट्रेलिया या दोन ठिकाणी सुरू असलेल्या व्हिसा संदर्भातील महत्त्वाच्या मुद्द्याने अनेकांचे लक्ष वेधून घेतले.
जगभरातून विद्यार्थी दर्जेदार शिक्षणासाठी विविध देशांत स्थलांतर करताना दिसून येतात. याच स्थलांतराचा सामना करण्यासाठी चक्क ऑस्ट्रेलियाने नवी शक्कल लढवली आहे. या देशाने परदेशी विद्यार्थ्यांकरिता आकारण्यात येणाऱ्या व्हिसा शुल्कात दुपटीने वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
भारताशी स्पर्धा करण्यासाठी तयार असलेल्या चीनने खलिस्तानी फुटीरतावादाला खतपाणी घालण्याचे काम सुरु केले आहे. यासाठी चीन बनावट सोशल मीडिया अकाउंटचाही वापर करत होता. जेणेकरून भारतााबाहेर राहणाऱ्या खलिस्तानी समर्थकांना एकत्र करता येईल. यासाठी चीन बॉट्सची मदत घेत होता, मात्र फेसबुकची मूळ कंपनी मेटाने त्याच्यावर कारवाई केली आहे. मेटाने एक अहवाल प्रसिद्ध केला आहे, ज्यामध्ये चीनच्या चुकीच्या धोरणांचा खुलासा केला आहे,
ऑस्ट्रेलियाचे राष्ट्रीय संकटगेल्या महिन्यात ऑस्ट्रेलियातील एका शॉपिंग सेंटरमध्ये जोएल कोची याने चाकूहल्ला करत सहा महिलांचा खून केला. यावर त्याच्या वडिलांचे म्हणणे होते की, त्याने हे भयानक कृत्य केले. पण, तो दु:खी होता. त्याला एकही ‘गर्लफ्रेंड’ नव्हती, म्हणून त्याने महिलांवरच हल्ला केला असावा. त्याच ऑस्टे्रलियामध्ये आता महिलांवर होणारे हिंसाचार ‘राष्ट्रीय आपत्ती’ म्हणून घोषित करण्यात आले आहेत.
ऑस्ट्रेलियात उबेर कंपनीने महिलेचं नाव 'स्वास्तिक' असल्याने सेवा देण्यास नकार दिला. उबर कंपनीने हे नाव बेकायदेशीर घोषित केले. उबरने स्वास्तिक नावाचे वर्णन नाझी चिन्ह हेकेनक्रेझ असे केले आणि महिलेला सेवा देण्यास नकार दिला. हेकेनक्रेझसारखी कट्टरतावादी विचारसरणी नसल्याचे सांगून ही स्वास्तिकला सेवा देण्यात कंपनीने तयार दर्शवली नाही. मात्र आता याप्रकरणी उबरने नंतर माफीही मागितली आहे.
ऑस्ट्रेलिया हा भारताचा अतिशय विश्वसनीय भागीदार असून, आगामी काळात व्यापाराशिवाय उच्च शिक्षण, कौशल्य विकास, चित्रपट सहनिर्मिती, कला व संस्कृती तसेच पर्यटन वाढविण्याबद्दल कसोशीने प्रयत्न करणार असल्याची माहिती ऑस्ट्रेलियाचे मुंबईतील नवनियुक्त वाणिज्यदूत पॉल मर्फी यांनी शुक्रवार, दि. २२ मार्च रोजी दिली.पॉल मर्फी यांनी राज्यपाल रमेश बैस यांची राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, ऑस्ट्रेलियात जवळपास १० लाख भारतीय लोक राहत असून ते तेथील अर्थकारण, समाजकारण, क्रिकेट तसेच सांस्कृतिक क
भारताने ऑस्ट्रेलियाच्या कृषी उत्पादनांना आयात शुल्कात सवलत दिल्यास, तो भारताला अत्याधुनिक कृषी तंत्रज्ञानाचे हस्तांतरण करेल, असा एक प्रस्ताव ऑस्ट्रेलियाने नुकताच भारताला दिला. तसेच साठवणूक करण्यासाठीचे प्रगत तंत्रज्ञानही भारताला देण्याचे आश्वासनही ऑस्ट्रेलियाने दिले. कृषीहित विचारात घेऊन, त्यावर निर्णय झाल्यास दोन्ही देशांना त्याचा नक्कीच लाभ होईल.
चीनच्या आक्रमकतेला वेसण घालण्यासाठी, भारताला मॉरिशससारख्या देशांशी असलेले आपले संबंध आणखी सुदृढ करावे लागतील. त्यासोबतच हिंद महासागरात अमेरिका, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया, जपान आणि ब्रिटन यांसारख्या देशांच्या नौदलांसोबत सहकार्य वाढवावे लागेल.
नुकत्याच पार पडलेल्या, १९ वर्षांखालील पुरूष क्रिकेट ‘विश्वचषका’च्या स्पर्धेतदेखील ऑस्ट्रेलियाने भारताला नमवले. त्यानिमित्ताने ऑस्ट्रेलियन मनुष्याच्या जीवनात खेळाला असलेले महत्त्व, त्याचप्रमाणे भारताची क्रिकेटमधील सद्यःस्थिती याविषयीचा आढावा घेणारा हा लेख...
मूलतः चिनी वंशाचे; पण ऑस्ट्रेलियाचे नागरिक असलेल्या यांग हेंगजून यांना चीनने नुकतीच निलंबित फाशीची शिक्षा सुनावली. निलंबित म्हणजे तत्काळ फाशी होणार नाही; तसेच फाशीची शिक्षा पुढे-मागे रद्द होऊ शकते. यांग हेंगजून यांना दोन वर्षं कारावासाची शिक्षा मिळाली आहे.
ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज शॉन मार्श याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. शॉन मार्शने आस्ट्रेलियाकडून टी-२०, कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांमधून निवृत्ती घेतली आहे. शॉन मार्शने ऑस्ट्रेलियाकडून खेळताना अटीतटीच्या सामन्यात संघाला महत्त्वपूर्ण खेळी करत संघासाठी निर्णयात्मक विजय मिळवून दिला आहे.
ऑस्ट्रेलियाचा तडाखेबाज डावखुरा फलंदाज डेव्हिड वॉर्नरने कसोटीमधून निवृत्ती घेतल्यानंतर आता एकदिवसीय क्रिकेटमधूनही निवृत्ती जाहीर केली आहे. डेव्हिड वॉर्नरने आतापर्यंत आपल्या आक्रमक फंलदाजी शैलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेट आपला दबदबा निर्माण केला आहे. दरम्यान, नववर्षाच्या सुरुवातीलाच वॉर्नरने आपली निवृत्ती जाहीर करत क्रिकेटप्रेमींना मोठा धक्का दिला.
भारतीय महिला क्रिकेट संघ आणि ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेट संघ यांच्यात एकमेव कसोटी सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळविण्यात आला होता. या सामन्यात भारतीय महिला क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलियन संघाला नमवत नवा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. अवघ्या ७५ धावांचं लक्ष्य पूर्ण करत ऑस्ट्रेलियावर पहिलाच विजय मिळविला.
‘द ग्रेट अमेरिकन ड्रीम’च्या नादात, चांगल्या जीवनशैलीच्या स्वप्नपूर्तीसाठी आजही जगभरातून लाखो लोक अमेरिकेची वाट धरतात. पण, मग ज्यांना अमेरिकेचे मार्ग विविध कारणास्तव आडवळणाचे वाटतात, त्यांची पावलं अमेरिकेसम जीवनमान असलेल्या देशांकडे वळतात. यामध्ये मुख्यत्वे युरोपीय देश, ऑस्ट्रेलिया आणि कॅनडा यांचा समावेश. त्यात अलीकडे युद्धजन्य परिस्थितीमुळे तर जागतिक स्तरावर स्थलांतराचा वेग आणि स्थलांतरितांचे लोंढे विकसित देशांच्या सीमांवर आदळू लागले. त्यामुळे शिक्षण, रोजगार असो अथवा मायदेशातील युद्धसदृश परिस्थिती, अशा विवि
‘पाकिस्तान जिंदाबाद’ अशी घोषणाबाजी करणाऱ्या 'शेर-ए-काश्मीर कृषी विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्यापीठा'तील सात विद्यार्थ्यांविरोधात बेकायदेशीर कृत्य प्रतिबंध कायद्यांतर्गत (युएपीए) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.जम्मू-काश्मीरमधील गांदरबल येथील शेर-ए-काश्मीर कृषी विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्यापीठाच्या सात विद्यार्थ्यांना अटक करण्यात आली आहे. या काश्मिरी विद्यार्थ्यांवर १९ नोव्हेंबर रोजी विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून भारताचा पराभव झाल्यानंतर जल्लोष करण्याचा आणि पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्याचा आरोप
टीम इंडियाने वर्ल्ड कप २०२३ ची ट्रॉफी गमावल्यानंतर संपूर्ण भारत दु:खी असताना, पाकिस्तानमध्ये आनंद साजरा केला जात आहे. यापूर्वी अनेक कारणांमुळे वादात सापडलेला पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू अब्दुल रज्जाकने टीम इंडियाच्या पराभवावर म्हटले आहे की, भारताचा पराभव झाला हे चांगले आहे. त्यांच्या मते, असे झाले नसते तर संपूर्ण क्रिकेट भारताकडे वळले असते आणि क्रिकेटचा पराभव झाला असता.
भारत आणि ऑस्ट्रेलियाने संरक्षण सहकार्य वाढविण्यासाठी आणि महत्त्वपूर्ण खनिजे आणि व्यापार आणि गुंतवणूक यासारख्या क्षेत्रांमध्ये धोरणात्मक संबंध दृढ करण्यासाठी टू प्लस टू मंत्रीस्तरीय चर्चा केली.दुसऱ्या भारत-ऑस्ट्रेलिया टू प्लस टू मंत्रिस्तरीय चर्चेअंतर्गत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी ऑस्ट्रेलियाचे उपपंतप्रधान आणि संरक्षण मंत्री रिचर्ड मार्ल्स आणि परराष्ट्र मंत्री पेनी वोंग यांच्याशी चर्चा केली.
एकदिवसीय विश्वचषकात भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील अंतिम सामन्यात भारताच्या पदरी निराशा आली. विश्वचषकील प्रत्येक सामना जिंकून अंतिम फेरीत पोहोचल्यानंतर झालेला पराभव भारतीय खेळाडूंच्या आणि प्रत्येक भारतीय नागरिकांच्या जिव्हारी लागला आहे. मात्र, अशा स्थितीतही भारतीयांनी खेळाडूंना प्रोत्साहन देणाऱ्या पोस्ट समाज माध्यमावर केल्या आहेत. तर काही जणांना दुर्दैवाने कुणी त्यांना वाईट म्हणणारे मीम्स व्हायरल केले आहेत. परंतु, या सगळ्यात अभिनेता जितेंद्र जोशीने केलेल्या खास पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतले आहे.
ऑस्ट्रेलियाने रविवारी भारताविरुद्ध विश्वचषकाचा अंतिम सामना जिंकून वर्ल्डकप ट्रॉफी पटकावली. मात्र, ऑस्ट्रेलियन खेळाडूंना या ट्रॉफीची काहीच किंमत नसल्याचे सिद्ध झाले आहे. ऑस्ट्रेलियन कांगारू वर्ल्ड कप ट्रॉफीवर पाय ठेवतानाचे फोटो व्हायरल झाले आहे. त्यामुळे नेटकऱ्यांकडून कागांरुंवर संताप व्यक्त करण्यात येत आहे.
विश्वचषक २०२३ स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताच्या पदरी पराभव आला. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर हा सामना रंगला होता. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाचा हा रंजक सामना पाहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रिय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह अनेक हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकार देथी उपस्थित होते. यात किंग खान शाहरुख खान पत्नी गौरी खान सह सामना पाहण्यासाठी गेला होता. भारताच्या पराभवानंतर चाहते आणि कलाकार जरी निराश झाले असले तरी त्.नी भारतीय क्रिकेटपटूंचे कौतुक केले आहे. यात शाहरुख खान याचाही समावेश आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात क्रिकेट विश्वचषक २०२३ चा अंतिम सामना पार पडणार आहे. १९ नोव्हेंबर रोजी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना खेळला जाणार आहे. दरम्यान, भारताला विश्वचषक मिळावे यासाठी देशभरातील जनता प्रार्थना करत आहे. यासाठी पुजा, हवन, उपवास करण्यात येत आहे.
भारत विरुध्द ऑस्ट्रेलिया यांच्यात विश्वचषकाचा अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळविण्यात येत आहे. . भारतीय कर्णधार रोहित शर्मा आपल्या आक्रमक अंदाजात फलंदाजी करत त्याने ३१ चेंडूंमध्ये ४७ धावावर असताना मॅक्सवेलच्या बॉलिंगवर उंच फटका मारताना बाद झाला. रोहितच्या रुपात भारताला मोठा झटका बसला आहे.
जगातील सर्व क्रिकेटप्रेमींचे लक्ष सध्या १९ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या भारत- ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या विश्वचषक अंतिम सामन्याकडे लागले आहे. एकदिवसीय विश्वचषक सामन्यात भारत-ऑस्ट्रेलियाचा सामना अहमदाबाद येथे रंगणार असून स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी हा सामना पाहण्यासाठी हजर राहणार आहेत. १५ नोव्हेंबर रोजी झालेल्या उपांत्य फेरीसाठी भारताला प्रोत्साहन देण्यासाठी कलाकारांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. यात दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत देखील होते. आता रजनीकांत यांनी १९ नोव्हेंबरला होणाऱ्या अंतिम सामन्याची भविष्य
एकदिवसीय विश्वचषकच्या अंतिम सामन्याकडे सध्या संपुर्ण जगाचे लक्ष लागले आहे. भारत आणि ऑस्ट्रेलियात चुरशीची लढत १९ नोव्हेंबरला पाहायला मिळणार आहे. अहमदाबादयेथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर वर्ल्ड कपसाठीचा थरार पाहायला मिळणार आहे. अनेक कलाकारांसोबत अभिनेता सिद्धार्थ जाधव देखील क्रिकेटप्रेमी आहे. आणि भारत-ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या अंतिम सामन्याबद्दल त्याने रेडिओ मिरचीला दिलेल्या मुलाखतीत भाष्य केले आहे. सिद्धार्थने यावेळी भारतीय क्रिकेट संघाला एक सल्ला दिला आहे. तो म्हणाला, "माझी इच्छा आहे की त्या ऑस्ट्रेलियाची अशी
‘आसियान’ या दक्षिण पूर्व आशियाई देशांच्या संघटनेतील देशांच्या संरक्षणमंत्र्यांची दोन दिवसीय परिषद नुकतीच इंडोनेशियामधील जकार्ता येथे संपन्न झाली. या बैठकीला रशिया, ऑस्ट्रेलिया यांसारख्या इतरही देशांचे सदस्य निमंत्रित होते. भारतातर्फे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी या परिषदेला हजेरी लावली आणि पुन्हा एकदा हे युद्धाचे युग नसल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विचार त्यांनी यावेळी अधोरेखित केले. या परिषदेत मुख्यत्वे दक्षिण आशियाशी संबंधित प्रश्नांवर चर्चा होणे, त्यावर कायमस्वरुपी उपाय शोधणे अपेक्षित. तशी चर्चा
फिफा २०३४ विश्वचषकाचे यजमानपद सौदी अरेबियाला देण्यात आले आहे. फिफाचे अध्यक्ष जिआनी इन्फेंटिनो यांनी यांसदर्भात मोठी घोषणा केली आहे. त्यानुसार, २०३४ च्या फुटबॉल विश्वचषकाचे यजमानपद सौदी अरेबियाला देण्यात आले आहे. दरम्यान, मंगळवार, दि. ३१ ऑक्टोबर २०२३ रोजी अंतिम मुदतीच्या दिवशी ऑस्ट्रेलियाने जागतिक बोली लावणार नाही याबाबत स्पष्टता दिल्यानंतर २०३४ विश्वचषकाचे यजमानपद सौदी अरेबियाकडे सोपविण्यात आले.
व्यापार, गुंतवणुकीबरोबरच दळणवळण, संरक्षण क्षेत्रांसाठीही हिंद-प्रशांत क्षेत्र महत्त्वपूर्ण मानले जाते. याचमुळे भारतासोबतच अमेरिका, युरोपही हिंद-प्रशांत महासागर क्षेत्रात आपली उपस्थिती भक्कम करू इच्छित आहे. या क्षेत्रात चीनच्या वाढत्या प्रभावामुळे अनेक देश चिंतीत आहेत. त्यावर उपाय म्हणून ‘क्वाड,’ ‘ऑकस’ (AUKUS) यांसारख्या अनेक बहुपक्षीय संघटनांची निर्मिती करण्यात आली.
भारत आणि पाकिस्तानची फाळणी होऊन जवळपास आठ दशके लोटली आहेत, पण लाखो लोक अजूनही फाळणीच्या भीषण काळात मागे राहिलेल्या आपल्या प्रियजनांना सापडतील अशी आशा बाळगून आहेत. पाकिस्तानमधील करतारपूर कॉरिडॉरमधून असेच एक प्रकरण समोर आले आहे, जिथे फाळणीच्या वेळी विभक्त झालेले भाऊ-बहीण ७६ वर्षांनंतर पुन्हा एकत्र आले.
एका पोलीस अधिकार्याची इयत्ता आठवीत शिकणारी मुलगी. एकेदिवशी अचानक बेशुद्ध पडली. त्यानंतर तिला दवाखान्यात नेण्यात आले. मात्र दवाखान्यात उपचार सुरू करण्याआधीच त्या १४ वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला.मात्र, तिचा शवविच्छेदन अहवाल मिळाला आणि तिच्या पोलीस अधिकारी असलेल्या पित्याला आणि कुटुंबाला काय करावे हे सुचेनासे झाले. कारण, शवविच्छेदन अहवालात लिहिले होते की, अंमली पदार्थाच्या प्रमाणाबाहरे सेवन केल्याने तिच्या मेंदूच्या नसा फुटल्या होत्या. तसेच त्या अल्पवयीन मुलीवर अनेकदा क्रूर लैंगिक अत्याचार झाला होता. ही घटना
आयसीसी विश्वचषकातील ऑस्ट्रेलियाचा दुसरा सामना दक्षिण आफ्रिकेशी लखनऊ येथे होत आहे. ऑस्ट्रेलियाने सर्वप्रथम नाणेफेक जिंकत क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना ३१२ धावांचा डोंगर उभा केला. यात सर्वाधिक धावांचे योगदान डावखुरा फलंदाज, सलामीवीर क्विंटन डिकॉकने १०६ चेंडूत १०९ धावांची खेळी केली. तर कप्तान बवुमासोबत पहिल्या विकेटसाठी १०८ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली.
भारताने ‘वर्ल्ड कप’च्या पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियावर सहा गडी राखून विजयी सलामी दिली. चेपॉक स्टेडियमवर झालेल्या सामन्यात कांगारुंचा संघ प्रथम फलंदाजीसाठी मैदानावर उतरला. त्यांनी ४९.३ षटकांत सर्व बाद १९९ धावा करून अवघ्या २०० धावांचे माफक लक्ष्य ठेवले.
दिल्लीतील एका कौटुंबिक न्यायालयाने भारतीय क्रिकेटपटू शिखर धवन आणि आयशा मुखर्जी यांच्या घटस्फोटाला मंजुरी दिली आहे. आयशा शिखरचा मानसिक छळ करत असे, असे न्यायालयाने मान्य केले आहे. त्यांची बदनामी करण्यासाठी अनेकांना अपमानास्पद संदेश पाठवण्यात आले. लग्नानंतर भारतात राहण्याचे वचन पाळले नाही. याशिवाय मालमत्तेचे मालकी हक्क मिळविण्यासाठीही दबाव टाकण्यात आला,असे न्यायलयाने नमुद केला आहे.
१९३३ ते १९४५ असा दहा वर्षांहून अधिकचा कालखंड हा जगाच्या पाठीवरचा काळा कालखंड. यादरम्यान हिटलरप्रणीत नाझी जर्मनीकडून जवळपास सहा दशलक्ष ज्यूंची अतिशय निर्घृण पद्धतीने हत्या करण्यात आली. नाझी जर्मनीच्या या पाशवी हत्याकांडावर अनेक पुस्तकं, नाटकं, चित्रपटदेखील होऊन गेले. पण, दुर्देवाने ज्यूंच्या रक्ताने हात माखलेले नाझी युद्धसैनिक आजही युरोपसह अमेरिकेत आश्रयास आहेत. याचे कारण म्हणजे, चर्चच्या संगनमताने या नाझी युद्धसैनिकांचे मागच्या दाराने अमेरिका, लॅटिन अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया यांसारख्या देशांत गपचूप पुनर्व
भारत आणि अमेरिकेचे आर्थिक आणि सैन्य सहकार्य सतत वाढत आहे. भारतीय नौदल प्रमुख अॅडमिरल आर हरी कुमार नुकतेच चार दिवसांच्या अमेरिकेच्या दौऱ्यावर गेले आहेत. यादरम्यान, दोन्ही देशांच्या नौदलामध्ये हिंद-पॅसिफिक महासागर क्षेत्रात सहकार्य वाढविण्यावर चर्चा झाली. भारतीय नौदलाच्या अधिकाऱ्यांनी रविवारी ही माहिती दिली.
भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान सुरू असलेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना इंदौरच्या होळकर स्टेडियमवर खेळला जात आहे. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेत भारतास फलंदाजीचे आमंत्रण दिले. भारताने प्रथम फलंदाजी करत ५ बाद ३९९ धावांचं लक्ष्य ऑस्ट्रेलियाला दिले.
आमच्या घरातील पाळीव किंवा आजूबाजूला फिरणार्या भटक्या मांजरींमुळे काही प्रदेशनिष्ठ प्रजाती नामशेष झाल्या आहेत, असे तुम्हाला कोणी सांगितले, तर त्यावर तुमचा विश्वास बसेल का? पण, असं खरंच घडलं आहे. ऑस्ट्रेलियातील सरकारने नुकतेच याविषयी युद्धपातळीवर प्रयत्न सुरु केले आहेत. त्यानिमित्ताने भटक्या किंवा फिरसत्या मांजरींचा प्रदेशनिष्ठ प्रजातींना कसा धोका निर्माण होतो, होऊ शकतो त्याचा आढावा घेऊया.
एखादी व्यक्ती मुक्त राष्ट्रात राहते, तरच ती मुक्त असल्याचे म्हटले जाते. एखादे राष्ट्र स्वतंत्र आहे, असे तेव्हा म्हटले जाते, जेव्हा त्या राष्ट्राने ते स्वातंत्र्य आपल्या नागरिकांना प्रदान केले असेल तरच. अशा प्रकारे व्यक्तिस्वातंत्र्य आणि राष्ट्रीय स्वातंत्र्य यांचा एकमेकांशी जवळचा संबंध आहे. आज स्वातंत्र्य दिनानिमित्ताने यासंबंधीचे चिंतन...