दसऱ्यादिवशी आयपीएल २०२१चा सुपर धमाका

    07-Jun-2021
Total Views | 62

IPL_1  H x W: 0
 
नवी दिल्ली : आयपीएल २०२१चे उर्वरित सामने सप्टेंबर ते ऑक्टोबर महिन्यात होणार असे समजल्यानंतर आता क्रीडाप्रेमी या स्पर्धेची वात पाहत आहेत. आयपीएल २०२१मध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्याने स्पर्धा अर्ध्यातच थांबवण्यात आली होती. त्यानंतर आता उर्वरित ३१ सामने हे युएईमध्ये होणार असल्याचे बीसीसीआयने घोषित केले आहे. यावर आता आणखी एक मोठी बातमी म्हणजे स्पर्धेचा अंतिम सामना हा १५ ऑक्टोबरला म्हणजेच दसऱ्यादिवशी होणार आहे.
 
 
 
मिळालेल्या माहितीनुसार, बीसीसीआय आणि संयुक्त अरब अमिरीती सरकारमध्ये स्पर्धेबाबत सकारात्मक चर्चा सुरु आहे. त्यामुळे आयपीएलचे हे पर्व यशस्वी होईल अशी आशा बीसीसीआयला आहे. तसेच, आयपीएलचे उर्वरित ३१ सामने हे २५ दिवसांत संपेल. म्हणजेच ही स्पर्धा १९ सप्टेंबरला चालू होऊन १५ ऑक्टोबरला म्हणजेच दसऱ्यादिवशी अंतिम सामना होईल, असे सांगण्यात येत आहे. याबाबत अधिकृत घोषणा जरी झाली नसली, तरी बीसीसीआय सर्व तपशीलसोबत लवकरच घोषणा करेल, असे सांगितले जात आहे.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
मनसेला झटका! अविनाश जाधव यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, पहाटे ३ वाजता कारवाई

मनसेला झटका! अविनाश जाधव यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, पहाटे ३ वाजता कारवाई

(Avinash Jadhav) मीरा-भाईंदर शहरात गेल्या काही दिवसांपासून मराठीवरुन वातावरण चांगलेच तापले आहे. अमराठी व्यापाऱ्यांनी केलेल्या शक्तीप्रदर्शनाला प्रत्युत्तर म्हणून मीरा-भाईंदर शहरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आज (८ जुलै) मोर्चा काढण्यात येणार आहे. मात्र, पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारत प्रतिबंधात्मक कारवाईला सुरूवात केली आहे. सोमवारपासून पोलिसांनी मनसे आणि उबाठाच्या पदाधिकाऱ्यांना नोटीस बजावण्यास सुरुवात केली होती. मंगळवारी पहाटे पोलिसांनी आणखी कठोर पाऊल उचलत मनसेचे ठाणे-पालघर जिल्हाप्रमुख अविनाश ..

मेट्रोला विलंब झाल्याने घाटकोपर स्थानकात तुफान गर्दी

मेट्रोला विलंब झाल्याने घाटकोपर स्थानकात तुफान गर्दी

मेट्रोचे डबे वाढविण्याची प्रवाशांची मागणी अतिरिक्त कोच खरेदीसाठी मेट्रो वनचा प्रस्ताव मुंबई मेट्रो मार्ग १ वर तांत्रिक बिघाडामुळे आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोमवार,दि.७ रोजी प्रवाशांची विशेषतः कार्यालयात जाणाऱ्या मुंबईकरांची प्रचंड तारांबळ उडाली. तांत्रिक बिघाडामुळे रेल्वेला उशीर झाल्याने बघता बघता घाटकोपर स्थानकासह इतर स्थानकांवर प्रवाशांची गर्दी वाढली. मुंबई मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, तांत्रिक बिघाडामुळे रेल्वेला उशीर झाल्याने गर्दी वाढली आहे. टार्गेट स्पीड गाठू न शकल्याने एक ट्रेन ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121