नक्षलवाद्यांचा भारत बंद; गडचिरोलीत बॅनरबाजी

    25-Jan-2019
Total Views | 63


गडचिरोली : भामरागड तालुक्यात लाहेरी मार्गावरील मलमपडूर भागात नक्षलवाद्यांनी बॅनरबाजी केली आहे. येथून काही अंतरावर असलेल्या जुव्वी नाल्याजवळही एक बॅनर लावले आहे. या भागात काही पत्रकेही टाण्यात आली आहेत.

बॅनर आणि पत्रकांच्या माध्यमातून त्यांनी २५ जानेवारी ते ३१ जानेवारीपर्यंत भारत बंदचे आवाहन केले आहे. बॅनर लावलेल्या परिसरातील झाडांची नक्षलवाद्यांनी कत्तल केली आहे. गेल्या आठवड्यात २१ जानेवारीच्या पहाटे नक्षलवाद्यांनी कासनासूर येथील तीन नागरिकांची निर्घृण हत्या केली. त्यानंतर त्यांचे मृतदेह अल्लापल्ली-भामरागड मार्गाव कोसकुंडी फाट्याजवळ फेकून दिले.

 

नक्षवलवाद्यांनी शुक्रवारी पहाटे लाहेरी भामरागड मुख्य मार्गावर असलेल्या मलमपडूर व जुव्वी नाल्याजवळ बॅनर लावले आणि पत्रके टाकून २५ ते ३१ जानेवारीपर्यंत भारत बंदचे आवाहन केले आहे. भामरागड तालुक्यात तणावाचे वातावरण असून नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

अग्रलेख
जरुर वाचा
मुंबईतील विकासकामे थांबवता येणार नाहीत परंतु वारसस्थळांची देखभाल करणंही तितकंच महत्त्वाचं : उच्च न्यायालय

मुंबईतील विकासकामे थांबवता येणार नाहीत परंतु वारसस्थळांची देखभाल करणंही तितकंच महत्त्वाचं : उच्च न्यायालय

मेट्रो-३ प्रकल्पाच्या भूमिगत कामांमुळे इमारतीला नुकसान झाल्याचा आरोप करणाऱ्या जे. एन. पेटिट हेरिटेज इमारतीच्या विश्वस्तांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेत गुरूवार, दि.११ जुलै रोजी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती महेश सोनक आणि न्या.जितेंद्र जैन यांच्या खंडपीठाने विकास आणि वारसा यामधील समतोल राखत म्हटले की, मुंबईसारख्या शहरात विकास थांबवता येणार नाही. परंतु भावी पिढीसाठी वारसा इमारतींचे जतन आणि देखभाल करणे तितकेच महत्त्वाचे आहे.”..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121