महाराष्ट्र पोलीस दलाच्या C-60 कमांडोंनी ठार केले १३ नक्षली

    21-May-2021
Total Views | 192

ANI _1  H x W:
 
गडचिरोली : महाराष्ट्र पोलीस दलातील C-60 कमांडो पथकाने १३ नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले असून आत्तापर्यंत सहा मृतदेह हाती लागले आहेत. एट्टापल्ली तालुक्यातील पैदी कोटमी जंगलात ही चकमक झाली. गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी संदर्भातील माहिती दिली आहे.
 
 
 
शुक्रवारी सकाळपासूनच नक्षलविरोधी अभियान राबवण्यात आले आहे. या ठिकाणी नक्षलवाद्यांचे शिबिर सुरू होते. नेमकी याच ठिकाणी पोलीसांची तुकडी पोहचली. त्यावेळी पोलीसांनी नक्षलवाद्यांनी गोळीबार सुरू केला. या चकमकीत १३ नक्षली ठार झाले.
चकमक उशीरापर्यंत सुरू होती, असे सांगण्यात आले.
 
 
 
त्यावेळी सहा मृतदेह ताब्यात घेण्यात आले आहे. अधीक्षक गोयल म्हणाले, "एकूण किती नक्षलवादी ठार झाले आहेत याची माहिती मोहिम संपल्यावरच हाती येणार आहे. कसनसुर येथे नक्षलवादी दल एकत्र आले. तेंदू हंगाम सुरू असल्याने नक्षली तेंदू कंत्राटदारांकडून खंडणी वसूल करतात. याच नियोजनाची बैठक सुरू होती, ही माहिती पोलीसांना मिळाल्यावर अभियान सुरू केली.
अग्रलेख
जरुर वाचा
ट्रम्प आणि मुनीर यांची भेट पाकिस्तानसाठी लज्जास्पद!; भारताचे पाकवर टीकास्त्र

"ट्रम्प आणि मुनीर यांची भेट पाकिस्तानसाठी लज्जास्पद!"; भारताचे पाकवर टीकास्त्र

(India on Trump-Munir meet) पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची नुकतीच व्हाईट हाऊसमध्ये भेट घेतली. या भेटीत डोनाल्ड ट्रम्प आणि असीम मुनीर यांच्यात महत्वाच्या विषयांवर चर्चा झाल्याचे बोलले जात आहे. तसेच त्यांची ही भेट सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. मात्र, पाकिस्तानच्या पंतप्रधानांऐवजी लष्करप्रमुख ट्रम्प यांना भेटल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. असीम मुनीर आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या भेटीवर आता भारताने प्रतिक्रिया देत पाकिस्तानवर जोरदार टीका केली आहे...

ऑपरेशन सिंधू सुरुच! आतापर्यंत ५१७ भारतीय नागरिक मायदेशी परतले, इराणमधून तिसरे विमान नवी दिल्लीत दाखल!

ऑपरेशन सिंधू सुरुच! आतापर्यंत ५१७ भारतीय नागरिक मायदेशी परतले, इराणमधून तिसरे विमान नवी दिल्लीत दाखल!

(Iran-Israel War) इराण आणि इस्त्रायलमध्ये सशस्त्र संघर्ष सुरु झाल्यापासून इराणमध्ये मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाल्याचे समोर आले आहे. या दोन्ही देशांतील संघर्ष तीव्र होत असल्याचे लक्षात घेता भारताने युद्धग्रस्त इराणमधून भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यासाठी 'ऑपरेशन सिंधू' (Operation Sindhu)राबवत नागरिकांच्या सुरक्षित परतीची जबाबदारी घेतली आहे. ऑपरेशन सिंधू अंतर्गत आतापर्यंत इराणमधील ५१७ भारतीय नागरिक मायदेशी परतले असल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी दिली...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121