ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर

    30-Sep-2024
Total Views | 48
 
mithun
 
 
 
मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना यंदाचा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहिर करण्त आला आहे. ७० व्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यामध्ये मिथुन चक्रवर्तींना हा सन्मान दिला जाणार असून केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सोशल मिडियाद्वारी ही घोषणा केली आहे. मनोरंजन विश्वासाठी दिलेल्या अतुलनीय योगदानाबद्दल मिथुन चक्रवर्तींना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे.
 
केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पोस्ट करत लिहिले आहे की, "आम्हाला ही घोषणा करुन अत्यंत आनंद होत आहे की, दादासाहेब फाळके पुरस्कारांसाठी ज्युरींनी दिग्गज अभिनेते मिथुन चक्रवर्तींची निवड केलीय. मिथुन चक्रवर्तींनी सिनेमाक्षेत्रात दिलेल्या विशेष योगदानाबद्दल त्यांना दादासाहेब फाळके पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला आहे. ८ ऑक्टोबरला होणाऱ्या ७० व्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात मिथुन चक्रवर्तींचा हा खास सन्मान केला जाणार आहे."
 
 
 
मिथुन चक्रवर्ती यांचा जन्म १६ जून १९५० रोजी झाला. कोलकातामधील एका बंगाली हिंदू कुटुंबात मिथुन यांचा जन्म झाला. पुण्यातील FTII मधून त्यांनी पदवीचं शिक्षण घेतलं. मृणाल सेन दिग्दर्शित 'मृग्या' या सिनेमातून मिथुन चक्रवर्तींनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. आणि त्यानंतर एकाहून एक दर्जेदार कलाकृती त्यांनी चाहत्यांना दिल्या. दरम्यान, मिथुन यांनी अभिनयक्षेत्रासोबतच राजकीय क्षेत्रही गाजवलं आहे.
अग्रलेख
जरुर वाचा
शाहू, फुले, आंबेडकर आणि अण्णा भाऊंसारखे महापुरुष असताना लेनिन-मार्क्स कशासाठी?

शाहू, फुले, आंबेडकर आणि अण्णा भाऊंसारखे महापुरुष असताना लेनिन-मार्क्स कशासाठी?

"भारताच्या सामाजिक परिवर्तनाच्या लढ्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि अण्णा भाऊ साठे यांसारखे थोर विचारवंत असताना, लेनिन आणि मार्क्ससारख्या परकीय विचारवंतांची गरजच काय?” असा थेट सवाल ज्येष्ठ शाहीर संदेश विठ्ठलराव उमप यांनी उपस्थित केला. अण्णा भाऊ साठे जयंतीनिमित्त दै. ‘मुंबई तरुण भारत’च्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘महाएमटीबी’ या युट्यूब वाहिनीवरील विशेष मुलाखतीत ते बोलत होते. या मुलाखतीत त्यांच्यासोबत गायिका रागिणी मुंबईकर आणि ढोलकीवादक महेश लोखंडे हेही उपस्थित होते...

डोंबिवली एमआयडीसी तील रस्त्यावरील छाटलेल्या झाडांच्या फांद्या उचलल्या ‘मुंबई तरूण भारत’ च्या वृत्ताचा इॅम्पकट

डोंबिवली एमआयडीसी तील रस्त्यावरील छाटलेल्या झाडांच्या फांद्या उचलल्या ‘मुंबई तरूण भारत’ च्या वृत्ताचा इॅम्पकट

डोंबिवली एमआयडीसी परिसरात वीजवितरण कंपनीने विजेच्या तारांवर आलेल्या झाडांच्या फांद्या कापल्या पण त्यानंतर छाटलेल्या फांद्या रस्त्यावर तशाच टाकून दिल्या होत्या. महावितरण, केडीएमसी आणि एमआयडीसी या सर्वाचा निष्काळजीपणा आणि कर्मचाऱ्यांच्या उदासीनतेमुळे त्यांचा नाहक त्रास नागरिकांना सहन करावा लागत होता. त्या विरोधात शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख राजेश कदम यांनी आवाज उठविला होता. या वृत्ताला ‘दैनिक मुंबई तरूण भारत’ ने दि. 1 ऑगस्ट रोजी प्रसिध्दी दिली. हे वृत्त प्रसिध्द होताच खडबडून जाग आलेल्या यंत्रणेकडून रस्त्यावरील ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121