मुस्लिमबहुल गावात कंवर यात्रेकरूंवर रास्तारोको करत हल्ला! पूर्वनियोजित कट असल्याचा आरोप...
06-Aug-2024
Total Views | 52
मुंबई (प्रतिनिधी) : उत्तर प्रदेशातील सहारनपूर जिल्ह्यातील मुस्लिमबहुल असलेल्या गावात कंवर यात्रेकरूंचा (Rastaroko during Kawad Yatra) मार्ग रोखण्यात आला. त्यांना शिवीगाळ आणि मारहाणही करण्यात आली. हा पूर्वनियोजित कट असल्याचे सांगत कंवर प्रवाशांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. बिल्लू, शाहिद, माजिद, गुलबहार, तैमूर, फारुख, महरूफ, कामिल, शाकीर, शाहरुख आणि इतर काही जणांविरोधात पोलिसांनी नोंदवला असून तपास सुरू आहे. आरोपींना अटक न केल्यामुळे संतप्त झालेल्या हिंदू संघटनांनी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केल्याचे दिसले.
सहारनपूर जिल्ह्यातील सरसावा पोलीस स्टेशन परिसरात ही घटना घडली. सुधीरकुमार शर्मा यांनी एफआयआरमध्ये नोंदविलेल्या माहितीनुसार त्यांच्या गावाच्या शेजारी एक मुस्लिमबहुल क्षेत्र आहे ज्याला तबरा गाव म्हणतात. कंवर यात्रेकरू दुपारी या गावात पोहोचले तेव्हा त्याच्यासोबत एक डीजेही होता ज्यावर धार्मिक गाणी वाजत होती. आरोपींसह इतर काही जणांनी कंवर यात्रेकरूंना थांबवून घेराव घातला. या सर्वांच्या हातात काठ्या, रॉड आदी असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यासोबतच या सर्वांनी आधी शिवभक्तांना शिवीगाळ केली आणि नंतर त्यांना मारहाण केल्याचा आरोप आहे. या गावातील काही मुस्लिमांनी कंवारियांना जाऊ न देण्याचा कट आधीच रचल्याचा आरोप आहे.
पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली. दोन्ही पक्षांची समजूत काढण्यात आली. पीडित कंवरियांच्या वतीने सुधीर कुमार यांनी आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी मुस्लिम समुदायातील १२ आरोपींविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. या सर्वांवर भारतीय न्यायिक संहितेच्या कलम १२६ (२), १९१ (२), ११५ (२), ३५२ आणि ३०० अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, २४ तास उलटूनही आरोपींना अटक न झाल्याने हिंदू संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे.