एकाचे जीवन संपवल्याप्रकरणी प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्याला अटक, सिनेइंडस्ट्रीत माजली खळबळ

    11-Jun-2024
Total Views | 111

south star 
 
 
मुंबई : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतून एक महत्वाची बातमी समोर आली आहे. लोकप्रिय कन्नड अभिनेता दर्शन थुगुदीपा याला बंगळुरू पोलिसांनी हत्येच्या प्रकरणा ताब्यात घेतले आहे. एका हत्येच्या प्रकरणात आरोपीने दर्शनचे नाव घेतल्यामुळे त्याच्यावर कामाक्षिपाल्या पोलिसांनी कडक कारवाई केली आहे. दर्शन थुगुदीपा सतत आरोपींच्या संपर्कात असल्यामुळे त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार, रेणुकास्वामी नावाच्या व्यक्तीची चित्रदुर्ग येथील सुमनहल्ली पुलावर हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी पोलिसांनी रेणुकाच्या आईच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल केल्यानंतर याप्रकरणी अभिनेत्याला कामाक्षिपाल्या पोलिसांनी अटक केली असून त्याच्या म्हैसूर येथील फार्म हाऊसमधून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. दर्शनला म्हैसुरहून बेंगळुरूला आणले जात आहे. कारण गुन्ह्याची नोंद कामाक्षिपल्य पोलिसांच्या हद्दीत करण्यात आली आहे.
 
 
 
बंगळुरू पोलिसांनी याबद्दल माहिती देताना म्हटले की, कन्नड अभिनेता दर्शन आणि त्याच्या काही साथिदारांना अटक करण्यात आली आहे, त्यांची चौकशी सुरू आहे. सध्या हे प्रकरण चौकशी पथावर असल्यानं या प्रकरणावर जास्त काही सांगता येणार नाही.
अग्रलेख
जरुर वाचा
तस्करीतील परदेशी वन्यजीवांना परत पाठवण्याची जबाबदारी विमान कंपन्यांचीच - DGCA

तस्करीतील परदेशी वन्यजीवांना परत पाठवण्याची जबाबदारी विमान कंपन्यांचीच - DGCA

विमानतळावर दाखल झालेल्या परदेशी वन्यजीवांना पुन्हा आलेल्या देशी धाडण्याची जबाबदारी ही विमान कंपन्यांचीच असल्याची स्पष्टोक्ती नागरी विमानवाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) दिली आहे (exotice live animal). यासंबंधीचे परिपत्रक त्यांनी २३ जुलै रोजी सर्व विमान कंपन्यांना पाठवले आहे (exotice live animal). गेल्या काही महिन्यांमध्ये परदेशी वन्यजीवांच्या तस्करीत वाढ झाल्याचे निदर्शनास आले होते. यासंबंधी मुंबई विमानतळावर मोठ्या प्रमाणात आलेल्या परदेशी वन्यजीवांच्या तस्करीचे वार्तांकन सर्वप्रथम दै. मुंबई तरुण भारतने ..

विजय सत्याचा, विजय न्यायाचा, विजय हिंदुत्वाचा!

विजय सत्याचा, विजय न्यायाचा, विजय हिंदुत्वाचा!

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण अत्यंत संवेदनशील आणि तितकेच वादग्रस्तही ठरले. या खटल्यात हिंदुत्ववादी व्यक्ती आणि संघटनांना नाहक गोवून बेछूट आरोप, असहनीय शारीरिक-मानसिक अत्याचार तर झालेच; पण तत्कालीन सत्ताधारी काँग्रेसची मजल ‘भगवा दहशतवाद’ असा शब्दप्रयोग रुढ करण्यापर्यंत गेली. पण, तब्बल १७ वर्षांच्या प्रदीर्घ न्यायालयीन लढ्यानंतर काल या खटल्याचा लागलेला निकाल म्हणजे, ‘भगवा दहशतवादा’चे कुभांड रचणार्‍यांना लगावलेली जोरदार चपराकच! त्यामुळे हिंदू धर्माविषयी कितीही असत्य पेरले, पसरवले, तरी शेवटी विजय सत्याचा, न्यायाचा..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121