"घरं फोडणाऱ्या पवारांबद्दल सहानुभूती बाळगण्याची गरज नाही!"

मनसे प्रवक्ते प्रकाश महाजन यांची जहरी टीका

    08-Feb-2024
Total Views | 68

Sharad Pawar


मुंबई :
घरं फोडणाऱ्या शरद पवारांबद्दल सहानुभूती बाळगण्याची गरज नाही, अशी टीका मनसेचे प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी केली आहे. निवडणुक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह अजित पवारांना दिलं. यावर आता प्रकाश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे. 
 
प्रकाश महाजन म्हणाले की, "शरद पवारांनी ४६ वर्षांपूर्वी आपल्या राजकीय स्वार्थापोटी आपले वरिष्ठ नेते स्वर्गिय वसंतदादा पाटील यांच्या पाठीत खंजीर खुपसला. त्यामुळे निवडणुक आयोगाचा निकाल हा शरद पवारांच्या काळजात कट्यार घुसवणाराच निघाला, असं मला वाटतं. ती कट्यार अजित पवारांनीच घुसवावी यासारखा दुर्दैव नाही."
 
ते पुढे म्हणाले की, "शरद पवारांनी आपल्या राजकीय आयुष्यात अनेक पक्ष फोडले, अनेक संस्था फोडल्या आणि अनेक नाती तोडली. त्यांनी काका-पुतण्यामध्ये, मामा-भाच्यामध्ये भांडण लावलं. शरद पवारांनी आयुष्यभर शाहु-फुले-आंबेडकरांचं नाव घेतलं पण, या महाराष्ट्रात जातीवादाला त्यांनीच खतपाणी दिलं. आज जातीजातींमध्ये होणारी भांडणं ही शरद पवारांच्या राजकारणाचं फलित आहे. त्यामुळे शरद पवारांचा पक्ष त्यांच्या हातून निसटला याबद्दल वाईट वाटण्याचं काहीच कारण नाही. शरद पवार सहानुभूती बाळगण्याचं काहीच कारण नाही. त्यांनी आयुष्यभर जे पेरलं तेच उगवलं आणि तेच त्यांना कापावं लागेल," असेही ते म्हणाले.





अग्रलेख
जरुर वाचा
शाहू, फुले, आंबेडकर आणि अण्णा भाऊंसारखे महापुरुष असताना लेनिन-मार्क्स कशासाठी?

शाहू, फुले, आंबेडकर आणि अण्णा भाऊंसारखे महापुरुष असताना लेनिन-मार्क्स कशासाठी?

"भारताच्या सामाजिक परिवर्तनाच्या लढ्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि अण्णा भाऊ साठे यांसारखे थोर विचारवंत असताना, लेनिन आणि मार्क्ससारख्या परकीय विचारवंतांची गरजच काय?” असा थेट सवाल ज्येष्ठ शाहीर संदेश विठ्ठलराव उमप यांनी उपस्थित केला. अण्णा भाऊ साठे जयंतीनिमित्त दै. ‘मुंबई तरुण भारत’च्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘महाएमटीबी’ या युट्यूब वाहिनीवरील विशेष मुलाखतीत ते बोलत होते. या मुलाखतीत त्यांच्यासोबत गायिका रागिणी मुंबईकर आणि ढोलकीवादक महेश लोखंडे हेही उपस्थित होते...

डोंबिवली एमआयडीसी तील रस्त्यावरील छाटलेल्या झाडांच्या फांद्या उचलल्या ‘मुंबई तरूण भारत’ च्या वृत्ताचा इॅम्पकट

डोंबिवली एमआयडीसी तील रस्त्यावरील छाटलेल्या झाडांच्या फांद्या उचलल्या ‘मुंबई तरूण भारत’ च्या वृत्ताचा इॅम्पकट

डोंबिवली एमआयडीसी परिसरात वीजवितरण कंपनीने विजेच्या तारांवर आलेल्या झाडांच्या फांद्या कापल्या पण त्यानंतर छाटलेल्या फांद्या रस्त्यावर तशाच टाकून दिल्या होत्या. महावितरण, केडीएमसी आणि एमआयडीसी या सर्वाचा निष्काळजीपणा आणि कर्मचाऱ्यांच्या उदासीनतेमुळे त्यांचा नाहक त्रास नागरिकांना सहन करावा लागत होता. त्या विरोधात शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख राजेश कदम यांनी आवाज उठविला होता. या वृत्ताला ‘दैनिक मुंबई तरूण भारत’ ने दि. 1 ऑगस्ट रोजी प्रसिध्दी दिली. हे वृत्त प्रसिध्द होताच खडबडून जाग आलेल्या यंत्रणेकडून रस्त्यावरील ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121