"राज ठाकरे-नारायण राणेंनी शिवसेना का सोडली?", शिंदेंनी केली ठाकरेंची पोलखोल

    17-Feb-2024
Total Views | 132
eknath Shinde news

कोल्हापूर : शिशिर शिंदे यांनी वानखेडे खणून जेलमध्ये गेले, बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत काम केलेले लोक इथे आहेत. त्यांनी मोठा संघर्ष केलाय.तुम्ही आयत्या पिठावर रेखोट्या मारून आले त्या देखील नीट मारता आल्या नाहीत. माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या अपमान केला, रामदास भाईचा ही तशाच अपमान करण्यात आला. नारायण राणे, राज ठाकरे, त्यांच्यापासून तुम्हाला काय त्रास होता..? पण त्यांना तुम्ही दूर सारलं. माझ्या विभागात हस्तक्षेप करण्यात आला. त्यामुळे मला तुम्ही सांगितले असते तर मी मनमोकळेपणाने सगळे सोडून दिले असते,अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापुर दौऱ्यात घेतलेल्या सभेत केली.

शिवसैनिकांचे खच्चीकरण होत असताना शिवसेना वाचवण्यासाठी आम्ही हे धाडस केले. पुन्हा असे धाडस कधी होईल असे वाटत नाही.माझ्यासोबत ४० आमदार काही मंत्री त्यांनी पदे सोडली, माणूस सत्तेत जातो पण सत्तेतून पायउतार होण्याचा निर्णय आम्ही घेतला छातीवर दगड ठेवून निर्णय घेतला होता.शिवसैनिकांचे खच्चीकरण थांबवण्यासाठी पक्षप्रमुख स्वतःचा विचार करतो तो अविचार टाळण्यासाठी आम्हाला वेगळा विचार करावा लागला असता, असे ही शिंदे यावेळी म्हणाले.
 

अग्रलेख
जरुर वाचा
शाहू, फुले, आंबेडकर आणि अण्णा भाऊंसारखे महापुरुष असताना लेनिन-मार्क्स कशासाठी?

शाहू, फुले, आंबेडकर आणि अण्णा भाऊंसारखे महापुरुष असताना लेनिन-मार्क्स कशासाठी?

"भारताच्या सामाजिक परिवर्तनाच्या लढ्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि अण्णा भाऊ साठे यांसारखे थोर विचारवंत असताना, लेनिन आणि मार्क्ससारख्या परकीय विचारवंतांची गरजच काय?” असा थेट सवाल ज्येष्ठ शाहीर संदेश विठ्ठलराव उमप यांनी उपस्थित केला. अण्णा भाऊ साठे जयंतीनिमित्त दै. ‘मुंबई तरुण भारत’च्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘महाएमटीबी’ या युट्यूब वाहिनीवरील विशेष मुलाखतीत ते बोलत होते. या मुलाखतीत त्यांच्यासोबत गायिका रागिणी मुंबईकर आणि ढोलकीवादक महेश लोखंडे हेही उपस्थित होते...

डोंबिवली एमआयडीसी तील रस्त्यावरील छाटलेल्या झाडांच्या फांद्या उचलल्या ‘मुंबई तरूण भारत’ च्या वृत्ताचा इॅम्पकट

डोंबिवली एमआयडीसी तील रस्त्यावरील छाटलेल्या झाडांच्या फांद्या उचलल्या ‘मुंबई तरूण भारत’ च्या वृत्ताचा इॅम्पकट

डोंबिवली एमआयडीसी परिसरात वीजवितरण कंपनीने विजेच्या तारांवर आलेल्या झाडांच्या फांद्या कापल्या पण त्यानंतर छाटलेल्या फांद्या रस्त्यावर तशाच टाकून दिल्या होत्या. महावितरण, केडीएमसी आणि एमआयडीसी या सर्वाचा निष्काळजीपणा आणि कर्मचाऱ्यांच्या उदासीनतेमुळे त्यांचा नाहक त्रास नागरिकांना सहन करावा लागत होता. त्या विरोधात शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख राजेश कदम यांनी आवाज उठविला होता. या वृत्ताला ‘दैनिक मुंबई तरूण भारत’ ने दि. 1 ऑगस्ट रोजी प्रसिध्दी दिली. हे वृत्त प्रसिध्द होताच खडबडून जाग आलेल्या यंत्रणेकडून रस्त्यावरील ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121