राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे आलिया-रणबीरलाही निमंत्रण!

    08-Jan-2024
Total Views | 85

alia and ranbir
 
मुंबई : अयोध्येत राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा २२ जानेवारीला संपन्न होणार असून या दिवसाची प्रत्येक रामभक्त आतुरतेने वाट पाहात आहे. या सोहळ्याचे निमंत्रण विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळींना दिले जात आहे. यात हिंदी आणि दाक्षिणात्य कलाकारांचा देखील समावेश आहे. अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूर यांना देखील नुकतेच निमंत्रण देण्यात आले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर, कोकण प्रांत प्रचार प्रमुख अजय मुडपे आणि निर्माता महावीर जैन यांच्या उपस्थितीत आलिया व रणबीरला श्रीरामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे आमंत्रण दिले आहे.
 
 
 
श्रीराम जन्मभूमीवर होणाऱ्या या सोहळ्याचे निमंत्रण यापूर्वी रजनीकांत, प्रभास, कंगना रणौत, माधुरी दीक्षित, अनुपम खेर, सनी देओल, अजय देवगण, आयुष्मान खुराना, मधुर भांडारकर, संजय लीला भन्साळी या खास कलाकारांनासुद्धा मिळाले आहे.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
शाहू, फुले, आंबेडकर आणि अण्णा भाऊंसारखे महापुरुष असताना लेनिन-मार्क्स कशासाठी?

शाहू, फुले, आंबेडकर आणि अण्णा भाऊंसारखे महापुरुष असताना लेनिन-मार्क्स कशासाठी?

"भारताच्या सामाजिक परिवर्तनाच्या लढ्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि अण्णा भाऊ साठे यांसारखे थोर विचारवंत असताना, लेनिन आणि मार्क्ससारख्या परकीय विचारवंतांची गरजच काय?” असा थेट सवाल ज्येष्ठ शाहीर संदेश विठ्ठलराव उमप यांनी उपस्थित केला. अण्णा भाऊ साठे जयंतीनिमित्त दै. ‘मुंबई तरुण भारत’च्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘महाएमटीबी’ या युट्यूब वाहिनीवरील विशेष मुलाखतीत ते बोलत होते. या मुलाखतीत त्यांच्यासोबत गायिका रागिणी मुंबईकर आणि ढोलकीवादक महेश लोखंडे हेही उपस्थित होते...

डोंबिवली एमआयडीसी तील रस्त्यावरील छाटलेल्या झाडांच्या फांद्या उचलल्या ‘मुंबई तरूण भारत’ च्या वृत्ताचा इॅम्पकट

डोंबिवली एमआयडीसी तील रस्त्यावरील छाटलेल्या झाडांच्या फांद्या उचलल्या ‘मुंबई तरूण भारत’ च्या वृत्ताचा इॅम्पकट

डोंबिवली एमआयडीसी परिसरात वीजवितरण कंपनीने विजेच्या तारांवर आलेल्या झाडांच्या फांद्या कापल्या पण त्यानंतर छाटलेल्या फांद्या रस्त्यावर तशाच टाकून दिल्या होत्या. महावितरण, केडीएमसी आणि एमआयडीसी या सर्वाचा निष्काळजीपणा आणि कर्मचाऱ्यांच्या उदासीनतेमुळे त्यांचा नाहक त्रास नागरिकांना सहन करावा लागत होता. त्या विरोधात शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख राजेश कदम यांनी आवाज उठविला होता. या वृत्ताला ‘दैनिक मुंबई तरूण भारत’ ने दि. 1 ऑगस्ट रोजी प्रसिध्दी दिली. हे वृत्त प्रसिध्द होताच खडबडून जाग आलेल्या यंत्रणेकडून रस्त्यावरील ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121