Microsoft आणि AirJaldi यांच्या भागीदारीतून ग्रामीण भारतात इंटरनेट कनेक्टिव्हिटीचा विस्तार

    07-Jun-2023
Total Views | 69
India Rural Internet Connectivity

मुंबई : भारतातील ग्रामीण भागात आता इंटरनेट कनेक्टिव्हिटीचा विस्तार करणे शक्य होणार आहे. इंटरनेट कनेक्टिव्हिटीसाठी मायक्रोसॉफ्ट आणि एअरजल्दी यांच्यात भागीदारी करून हा विस्तार होणार आहे. या दोन्ही कंपन्या एकत्र सहभागातून ग्रामीण भागात इंटरनेट विस्तार करणार आहेत. मायक्रोसॉफ्ट आणि AirJaldi यांनी भारताच्या ग्रामीण भागात इंटरनेटचा वापर आणि अर्थपूर्ण कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी 'कंटेंटफुल कनेक्टिव्हिटी' नावाच्या तीन वर्षांच्या सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे. या कराराद्वारे AirJaldi नेटवर्कचा विस्तार करणे हा कार्यक्रमाचा उद्देश असणार आहे.

दरम्यान, मायक्रोसॉफ्टने, ग्रामीण भागासाठी इंटरनेट कनेक्टिव्हिटी सोल्यूशन्सच्या AirJaldi नेटवर्क्सच्या सहकार्याने, 'कंटेंटफुल कनेक्टिव्हिटी' नावाच्या तीन वर्षांच्या सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे. खाजगी, सार्वजनिक आणि ना-नफा क्षेत्रांसोबत भागीदारी करून भारताच्या ग्रामीण भागात हाय-स्पीड इंटरनेट आणि अर्थपूर्ण कनेक्टिव्हिटीचा विस्तार करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश असणार आहे.

या करारांतर्गत पायाभूत सुविधांचे सक्षमीकरण, कौशल्य, शिक्षण आणि उद्योजकता प्रशिक्षण कार्यक्रम वाढवणे, महिला उद्योजकता, ग्रामीण कनेक्टिव्हिटी, डिजिटल उत्पादकता, रोजगारक्षमता कौशल्ये आणि एआय प्रवाह कौशल्यांवर लक्ष केंद्रित करणार असल्याचे दोन्ही कंपनीकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

दरम्यान, AirJaldi नेटवर्क्सचे स्ट्रॅटेजी आणि ऑपरेशन्सचे संचालक मायकेल गिंगुल्ड यांनी भागीदारीबद्दल आशावाद व्यक्त केला असून लोकांचे जीवन सुधारण्यासाठी कनेक्टिव्हिटी, डिजिटल टूल्स आणि डिजिटल कौशल्यांचे महत्त्व वाढवून संपूर्ण भारतभर व्यापक आणि प्रभावी कनेक्टिव्हिटी प्रदान करण्याच्या दिशेने काम केल्याबद्दल गिंगुल्ड यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे.

अग्रलेख
जरुर वाचा
मी टाटा ग्रुपला २ कोटी देते, माझे वडील परत आणा; एअर इंडियाच्या विमान अपघातात वडील गमावलेल्या लेकीचा आक्रोश!

"मी टाटा ग्रुपला २ कोटी देते, माझे वडील परत आणा"; एअर इंडियाच्या विमान अपघातात वडील गमावलेल्या लेकीचा आक्रोश!

(Ahmedabad Plane Crash updates) अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडियाच्या विमान अपघातामुळे संपूर्ण देश हादरला आहे. या भीषण अपघातात प्रियजनांना गमावलेल्यांनी आपला आक्रोश व्यक्त केला आहे. दरम्यान, मृतांच्या नातेवाईकांना टाटा समूहाकडून एक कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. आपल्या वडिलांच्या मृत्यूमुळे दुःखात असलेल्या फाल्गुनी यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये टाटा समूहाकडून जाहीर करण्यात आलेल्या आर्थिक मदतीबाबत आक्षेप घेत अपघातात मृत पावलेल्या आपल्या वडिलांना परत आणल्यास आपण टाटा ग्रुपला दोन कोटी ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121