४५० रोहिंग्या मुस्लिमांना परत पाठवल्यानंतर ४७ दलालांना अटक; घुसखोरांचा बंदोबस्त करण्यासाठी टोळी सक्रिय!
09-Nov-2023
Total Views | 135
नवी दिल्ली : त्रिपुरातून रेल्वेने आसाममध्ये पोहोचलेल्या ४५० रोहिंग्या मुस्लिमांना परत पाठवण्यात आले. आसामचे विशेष डीजीपी (विशेष पोलीस महासंचालक) हरमीत सिंग यांनी सांगितले की, सीमा सुरक्षा दलाच्या मदतीने अवैध घुसखोरांना परत पाठवण्यात आले. जुलैमध्ये, आसामच्या स्पेशल टास्क फोर्सने (एसटीएफ) ऑपरेशन सुरू केले. यात अवैध घुसखोरी आणि मानवी तस्करीत सक्रिय दलाल शोधण्यासाठी ही कारवाई करण्यात आली.
त्रिपुरातून अशा १० दलालांना अटक करण्यात यश आल्याचे एसडीजीपी म्हणाले. त्याच्या चौकशीच्या आधारे तपास केला असता असे आढळून आले की, हा राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न असून त्याचे अनेक राज्यांवर विपरीत परिणाम होत आहेत. त्यांनी सांगितले की, पहिल्या दिवसापासून मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा यांना या प्रकरणाची माहिती होती आणि सरकारने हे प्रकरण एनआयएकडे (नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी) पाठवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्रालयाला निवेदन देण्यात आले.
आसामचे विशेष पोलीस प्रमुख हरमीत सिंग यांनी माहिती दिली की एनआयएने या प्रकरणाचा तपास हाती घेतला आणि संयुक्त तपास करण्यात आला त्यानंतर देशभरात घुसखोरांना मदत करणाऱ्या अशा दलालांची यादी तयार करण्यात आली. विशेष DGP च्या म्हणण्यानुसार, आता या प्रकरणात बुधवारी (८ नोव्हेंबर २०२३) पहाटे एक ऑपरेशन सुरू करण्यात आले ज्यामध्ये टोळी म्हणून काम करणाऱ्या अशा ४७ दलालांना पकडण्यात आले. यापैकी २५ जणांना एकट्या त्रिपुरातून अटक करण्यात आली आहे.
तर कर्नाटकातून ९, आसाममधून ५, पश्चिम बंगालमधून ३, तामिळनाडूतून ३ आणि हरियाणा आणि तेलंगणामधून प्रत्येकी एक दलाल पकडण्यात आला आहे. एसडीजीपी म्हणाले की, एनआयए आणि आसाम पोलिसांनी परस्पर सहकार्याने ही मोहीम सुरू केली आहे. यामध्ये विविध स्थानिक पोलिसांनीही मदत केली. या प्रकरणी आसाम पोलिसांच्या १७ टीम आहेत. म्यानमार आणि बांगलादेशसारख्या शेजारील देशांतून मोठ्या संख्येने रोहिंग्या मुस्लिम भारतात स्थायिक झाले आहेत.