गेली अनेक वर्ष 'तारक मेहता का उलटा चश्मा' हा टेलीव्हिजन विश्वातील चर्चेचा विषय आहे. ह्या मालिकेतील सर्वच कलाकारांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. पण गेल्या काही दिवसांपासून चाहते मालिकेबाबत नाराजी व्यक्त करत आहेत, कारण मालिकेतील जवळजवळ निम्मे कलाकार एकामागून एक मालिका सोडून जात आहेत.
काही दिवसांपूर्वी तारक मेहता ही भूमिका साकारणारे शैलेश लोढा यांनी मालिकेला रामराम ठोकणार ही बातमी पसरली होती. त्यानंतर चाहत्यांमध्ये बबिता म्हणून प्रसिद्ध असलेली अभिनेत्री मुनमुन दत्ता सुद्धा मालिकेतून एक्झिट घेत आहेत अशी बातमी कानावर आली आहे. आणि अशा चर्चा सुरु असतानाच आता मालिकेतून टप्पू देखील निरोप घेणार अशी चर्चा सुरु झाली आहे.
ह्या मालिकेतील महत्त्वाचे पात्र असलेल्या टप्पूने आणि टप्पूसेनेने अनेक वर्ष प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. मध्यंतरी टप्पूची भूमिका करणारा कलाकार बदलला पण मालिकेची लोकप्रियता तशीच राहिली. परंतु आता हा टप्पू म्हणजेच राज अनादकट हा गेले अनेक भाग मालिकेत दिसला नाही त्यामुळे आता राज सुद्धा मालिका सोडत आहे ही चर्चा आत्ता सुरु आहे.