पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली 'ही' मोठी घोषणा

    30-May-2022
Total Views | 90

CARE
 
 
 
 
 
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी करोना संसर्गामुळे माता-पित्यांचे छत्र गमाविलेल्या मुला-मुलींना ‘पीएम केअर फॉर चिल्ड्रेन’ योजनेअंतर्गत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आर्थिक मदत जारी केली. यावेळी केंद्रीय मंत्री आणि राज्यांचे मुख्यमंत्री या कार्यक्रमात सहभागी झाले होते.
 
 
 
पंतप्रधानांनी कोरोनामुळे आपल्या प्रियजनांना गमावलेल्या मुलांना आयुष्यात भेडसावत असलेल्या अडचणींबद्दल सहानुभूती व्यक्त केली. आई आणि वडील दोघांचेही छत्र गमावलेल्या अशा मुलांच्या अडचणी कमी करण्यासाठी पीएम केअर्स फॉर चिल्ड्रन हा एक छोटा प्रयत्न असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. देशातील प्रत्येक नागरिक तुमच्या पाठिशी असल्याची ग्वाही पंतप्रधानांनी यावेळी त्यांना दिली. कोणा व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी किंवा उच्च शिक्षणासाठी शैक्षणिक कर्ज हवे असेल तर त्यासाठी देखील पीएम-केअर्स मदत करेल अशी माहिती पंतप्रधानांनी दिली.
 
 
 
इतर दैनंदिन गरजांसाठी अन्य योजनांद्वारे दरमहा ४ हजार रुपयांची व्यवस्थाही करण्यात आली आहे. वयाच्या २३ व्या वर्षी १० लाख रुपयांव्यतिरिक्त आयुष्मान कार्डद्वारे आरोग्य सुरक्षा आणि मानसिक आणि भावनिक मदतीसाठी संवाद हेल्पलाइनद्वारे भावनिक समुपदेशन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे, असेही पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले. केंद्र सरकारने आठ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला असून देशवासियांना सरकारवर विश्वास असून त्यांचा स्वत:वरील विश्वासही वाढला असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.
 
 
 
ते पुढे म्हणाले, भ्रष्टाचार, हजारो कोटींचे घोटाळे, घराणेशाही, देशभर पसरत असलेल्या दहशतवादी संघटना आणि प्रादेशिक भेदभाव या दुष्टचक्रात देश २०१४ पूर्वी अडकला होता. मात्र, २०१४ सालानंतर आता देश त्यातून बाहेर पडत आहे. स्वच्छ भारत मिशन, जन धन योजना किंवा हर घर जल अभियान यांसारख्या कल्याणकारी योजनांद्वारे ‘सबका साथ सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास’ या भावनेने केंद्र सरकार वाटचाल करत आहे. मागील ८ वर्षे गोरगरिबांच्या कल्याणासाठी आणि सेवेसाठी समर्पित होती, असेही पंतप्रधानांनी यावेळी नमूद केले.
 
 
 
 
 
 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
एअर इंडियानं १६ विमानं वळवली! लंडनला निघालेलं विमान अर्ध्या तासात माघारी; नेमकं  काय घडलं?

एअर इंडियानं १६ विमानं वळवली! लंडनला निघालेलं विमान अर्ध्या तासात माघारी; नेमकं काय घडलं?

(Air India flights) इस्रायलने शुक्रवारी दि.१३ जून रोजी इराणची राजधानी तेहरानसह वेगवेगळ्या भागांमध्ये हवाई हल्ला केला, ज्यामुळे मध्य-पूर्वेत मोठा तणाव निर्माण झाला आहे. दरम्यान, सुरक्षेच्या कारणास्तव इराणने तातडीने आपले हवाई क्षेत्र बंद केले आहे. त्यामुळे आता कोणत्याही देशाची विमानं इराणच्या हवाई क्षेत्रामधून उड्डाण करू शकणार नाहीत. याचा भारतीय विमानांना मोठा फटका बसला आहे. इराणने त्यांची हवाई क्षेत्र बंद केल्यामुळे एअर इंडियाच्या १६ विमानांचा मार्ग बदलावा लागला आहे. यापैकी काही विमानं मागे वळवावी लागली. ..

एअर इंडिया विमान अपघातात खुशबू राजपुरोहित यांचा मृत्यू; पतीला भेटण्यासाठी निघाली होती लंडनला

एअर इंडिया विमान अपघातात खुशबू राजपुरोहित यांचा मृत्यू; पतीला भेटण्यासाठी निघाली होती लंडनला

एअर इंडियाच्या ए-१४१ अहमदाबाद-लंडन या विमानाचा उड्डाणाच्या काही कालावधीनंतर अपघात झाला. यात एकूण २४१ प्रवासी आणि २४ विद्यार्थी व डॉक्टर, असे मिळून २६५ जणांचा मृत्यू झाला. राजस्थानच्या पाली जिल्ह्यातील खुशबू राजपुरोहित यांचाही या मृतांमध्ये सामावेश होता. खुशबूचा पाच महिन्यांपूर्वीच विवाह झाला होता. तिचे पती मयूर पुरोहित हे लंडनमध्ये डॉक्टर म्हणून रुग्णसेवा बजावतात. खुशबू त्यांना भेटण्यासाठी लंडनला निघाली होती. ही तिची पतीसोबतची पहिली भेट होती, कारण विवाहानंतर लगेच मयूर लंडनला रवाना झाले होते. त्यामुळे खुशबूच..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121