ज्येष्ठ साहित्यिक मनोहर म्हैसाळकर यांचे निधन

    14-Oct-2022
Total Views | 62

मनोहर म्हैसाळकर
नागपूर : विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ साहित्यिक मनोहर म्हैसाळकर यांचे शुक्रवार, दि. १४ ऑक्टोबर रोजी नागपूर येथे निधन झाले. मृत्यूसमयी ते ९० वर्षांचे होते. उत्तम संघटक, व्यवस्थापक, खेळाडू, साहित्याचे जाणकार आणि अष्टपैलू व्यक्तिमत्वाचे धनी म्हणून म्हैसाळकर सुपरिचित होते. त्यांच्या पश्चात दोन विवाहित मुली आणि मोठा परिवार आहे.
 
 
साहित्य जगताची मोठी हानी
 
मनोहरराव म्हैसाळकर यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दु:खद आहे. त्यांच्या निधनाने केवळ एक उत्तम साहित्यिकच नाही, तर एक चांगला संघटक, व्यवस्थापक, खेळाडू आपल्यातून हिरावला गेला आहे. अनेक दिग्गज साहित्यिक आणि लेखकांना एका सूत्रात बांधण्याचे काम मनोहररावांनी केले होते. या जाणकार साहित्यिकाचे निधन ही साहित्यजगताची मोठी हानी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.
 
- देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र
 
 
साहित्य चळवळ पोहोचवण्यात योगदान
 
विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष मनोहर म्हैसाळकर यांच्या निधनाचे वृत्त ऐकून अतिशय दुःख झाले. मनोहरजी उत्तम संघटक आणि प्रशासक होते. साहित्य चळवळ विदर्भाच्या कानाकोपऱ्यात पोहचविण्यात त्यांचे मोलाचे योगदान होते. विदर्भातील नाट्य चळवळीशी देखील त्यांचा जवळचा संबंध होता. त्यांच्या निधनाने साहित्य क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. ईश्वर दिवंगत आत्म्यास शांती देवो आणि त्यांच्या परिवारास हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो.'
 
- नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री, भारत सरकार
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
एअर इंडियानं १६ विमानं वळवली! लंडनला निघालेलं विमान अर्ध्या तासात माघारी; नेमकं  काय घडलं?

एअर इंडियानं १६ विमानं वळवली! लंडनला निघालेलं विमान अर्ध्या तासात माघारी; नेमकं काय घडलं?

(Air India flights) इस्रायलने शुक्रवारी दि.१३ जून रोजी इराणची राजधानी तेहरानसह वेगवेगळ्या भागांमध्ये हवाई हल्ला केला, ज्यामुळे मध्य-पूर्वेत मोठा तणाव निर्माण झाला आहे. दरम्यान, सुरक्षेच्या कारणास्तव इराणने तातडीने आपले हवाई क्षेत्र बंद केले आहे. त्यामुळे आता कोणत्याही देशाची विमानं इराणच्या हवाई क्षेत्रामधून उड्डाण करू शकणार नाहीत. याचा भारतीय विमानांना मोठा फटका बसला आहे. इराणने त्यांची हवाई क्षेत्र बंद केल्यामुळे एअर इंडियाच्या १६ विमानांचा मार्ग बदलावा लागला आहे. यापैकी काही विमानं मागे वळवावी लागली. ..

एअर इंडिया विमान अपघातात खुशबू राजपुरोहित यांचा मृत्यू; पतीला भेटण्यासाठी निघाली होती लंडनला

एअर इंडिया विमान अपघातात खुशबू राजपुरोहित यांचा मृत्यू; पतीला भेटण्यासाठी निघाली होती लंडनला

एअर इंडियाच्या ए-१४१ अहमदाबाद-लंडन या विमानाचा उड्डाणाच्या काही कालावधीनंतर अपघात झाला. यात एकूण २४१ प्रवासी आणि २४ विद्यार्थी व डॉक्टर, असे मिळून २६५ जणांचा मृत्यू झाला. राजस्थानच्या पाली जिल्ह्यातील खुशबू राजपुरोहित यांचाही या मृतांमध्ये सामावेश होता. खुशबूचा पाच महिन्यांपूर्वीच विवाह झाला होता. तिचे पती मयूर पुरोहित हे लंडनमध्ये डॉक्टर म्हणून रुग्णसेवा बजावतात. खुशबू त्यांना भेटण्यासाठी लंडनला निघाली होती. ही तिची पतीसोबतची पहिली भेट होती, कारण विवाहानंतर लगेच मयूर लंडनला रवाना झाले होते. त्यामुळे खुशबूच..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121