भारतीयांसाठी यशस्वी 'पॅराऑलिम्पिक'चा समारोप : सुवर्णकन्या अवनी ध्वजवाहक

भारतीयांसाठी यशस्वी "पॅराऑलिम्पिक"चा समारोप : सुवर्णकन्या अवनी ध्वजवाहक

    05-Sep-2021
Total Views | 120

Tokiyo Paralympic _1 


टोकीयो : भारतासाठी सर्वात यशस्वी ठरलेल्या टोकीयो पॅरालिंपिकचा रविवारी समारोप सोहळा पार पडला. समारोप समारंभात 'सुवर्णकन्या' अवनी लेखरा भारतीय खेळाडूंच्या ध्वजवाहक होत्या. १९ वर्षीय अवनीने दोन पदके जिंकली ज्यात एका सुवर्णपदकाचा सामावेश आहे.









अवनीनं SH1 प्रकारात दहा मीटर एअर पिस्तुलमध्ये सुवर्णपदक आणि ५० मीटर रायफल थ्री पॉजिशनमध्ये कांस्य पदक जिंकलं. याशिवाय सिंहराज याने टोकीयोत दोन पदकं जिंकली. दहा मीटर एअर पिस्टलमध्ये कांस्य आणि ५० मीटर एअर पिस्टलमध्ये रौप्य पदक जिंकले.
समारोप समारंभात भारताच्या एकूण ११ खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता. २४ ऑगस्टला झालेल्या उद्घाटनाला पाच खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता. शॉटपुटर टेकचंद ध्वजवाहक होते. त्यांनी हायजंपर मरियप्पन थांगवेलु यांची जागा घेतली होती. मरियप्पन हे कोरोना संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आल्याने त्यांना विलगिकरणात रहावे लागले होते.



१९ पदकांवर भारताचे नाव

भारताकडे आता एकूण १९ पदकं आली आहेत. गेल्या ५३ वर्षात ११ पॅराऑलम्पिकमध्ये १२ पदके आली आहेत. १९६० पासून ही स्पर्धा खेळविली जात आहे. भारताने १९६८ पासून या स्पर्धेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला होता. तिथेच १९७६ आणि १९८० या वर्षांत भारताने स्पर्धेत सहभाग नोंदविला नव्हता. या वर्षी एकूण ५ सुवर्ण पदके, आठ रौप्य, सहा कांस्य पदक भारताच्या नावे आहेत.






बॅटमिंटनच्या ७ पैकी चार खेळाडूंनी आणली पदकं
बँटमिंटन हा खेळ पहिल्यांदाच पॅराऑलिम्पिकमध्ये सहभागी करण्यात आला होता. भारतातून इथे एकूण सात खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता. विविध गटांमध्ये सहभागी झालेल्या या खेळाडूंपेकी एकूण चार जणांनी पदके जिंकली. प्रमोद भगत आणि कृष्णा नागर यांनी सुवर्ण, सुहास यथिराज यांनी रौप्य आणि मनोज सरकार यांनी कांस्य पदक जिंकलं.





१६३ देशांतील ४५०० खेळाडू सहभागी
पॅरालंपिक खेळांमध्ये १६३ देशांपैकी एकूण ४५०० खेळाडूंनी २२ खेळांच्या ५४० स्पर्धांमध्ये सहभाग नोंदविला.




अग्रलेख
जरुर वाचा
एअर इंडियाचं विमान कोसळण्यापूर्वी काय काय झालं? प्रत्येक सेकंदाला काय घडत गेलं? १२ जूनचा घटनाक्रम जाणून घ्या सविस्तर..

एअर इंडियाचं विमान कोसळण्यापूर्वी काय काय झालं? प्रत्येक सेकंदाला काय घडत गेलं? १२ जूनचा घटनाक्रम जाणून घ्या सविस्तर..

(Ahmedabad Plane Crash 2025 Report) अहमदाबादमध्ये १२ जून रोजी झालेल्या एअर इंडिया विमान अपघाताच्या बरोबर एक महिन्यानंतर, या अपघाताचा प्राथामिक अहवाल केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयाकडे सादर करण्यात आला आहे. १५ पानांच्या अहवालात कॉकपिटमध्ये दोन्ही पायलट्समध्ये काय संवाद झाला, याची माहिती देण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, एअर इंडियाच्या विमानाने उड्डाण घेतल्यानंतर काही सेकंदातच दोन्हीं इंजिन बंद झाले होते, अशी माहिती समोर आली आहे. इंजिन १ आणि इंजिन २ यांना इंधन पुरवठा करणारे फ्युयल स्विचेस बंद झाल्यानंतर..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121