अयोध्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात नियमित सुनावणी होणार !

    02-Aug-2019
Total Views | 9



नवी दिल्ली : अयोध्येतील राम मंदिर प्रकरणावर ६ ऑगस्टपासून सर्वोच्च न्यायालयात नियमित सुनावणी होणार आहे. राम मंदिर प्रकरणावर नेमलेल्या मध्यस्थ समितीला तोडगा काढण्यात अपयश आल्याने सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय घेतला. अयोध्याप्रकरणी निकाल लागेपर्यंत आठवड्यातले तीन दिवस सुनावणी होणार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले.

 

सर्वोच्च न्यायालयाच्या ५ सदस्यीय घटनापीठाने मध्यस्त समितीची नियुक्ती केली होती. न्यायमूर्ती खलीफुल्ला यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या त्रिसदस्यीय समितीत आध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर आणि ज्येष्ठ वकील श्रीराम पंचू यांचा समावेश करण्यात आला होता. मात्र पाच महिने उलटून गेल्यानंतरही मध्यस्त समितीला यश न आल्याने सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी याप्रकरणी न्यायालयीन सुनावणी होणार असल्याचे सांगितले.

 

मध्यस्त समितीने आपला अहवाल सर्वोच्च न्यायालयाकडे सुपूर्द केल्यानंतर न्या.गोगोई यांनी हा निर्णय दिला. ६ ऑगस्टपासून निकाल लागेपर्यंत नियमित सुनावणी होणार असल्याचे यांनी सांगितले. ही नियमित सुनावणी आठवड्यातून तीन दिवस म्हणजेच मंगळवार, बुधवार, गुरुवार होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

अग्रलेख
जरुर वाचा
राहुल गांधी दुसरे आंबेडकर सिदध होतील - काँग्रेस नेते उदित राज यांच्या विधानावर जनतेत संताप

राहुल गांधी दुसरे आंबेडकर सिदध होतील - काँग्रेस नेते उदित राज यांच्या विधानावर जनतेत संताप

दिल्ली येथे काँगे्रसचे भागीदारी न्याय महासम्मेलन सुरू आहे. या संमेलनामध्ये काँग्रेसचे नेते यांनी राहुल गांधींची तुलना थेट महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी केली आहे. इतर मागासवर्गिय समाजाने राहुल गांधी यांचे एकावे त्यांना पाठिंबा द्यावा. मागासवर्बिय समाजाने तसे केले तर राहुल गांधी दुसरे आंबेडकर सिद्ध होतील असे उदित राज म्हणाले.इतर मागासवर्गिय समाजाला राहुल गांधीच्या समर्थनासाठी आवाहन करताना उदित राज यांनी राहुल गांधींना दुसरे डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणून सिद्ध होतील हे म्हंटले. त्यामुळे समाजात रोष पसरला ..

तृतीयपंथी नागरिकांना ओळखपत्र देण्यामध्ये महाराष्ट्र राज्य प्रथम क्रमांकावर

तृतीयपंथी नागरिकांना ओळखपत्र देण्यामध्ये महाराष्ट्र राज्य प्रथम क्रमांकावर

तृतीयपंथी नागरिकांना ओळखपत्र देण्यामध्ये महाराष्ट्र राज्य प्रथम क्रमांकावर आहे. तृतीयंपथीयांच्या हक्कांचे संरक्षण अधिनियम २०१९ मधील नियम २०२० अंतर्गत विभाग सहा आणि सात नुसार जिल्हास्तरीय समितीद्वारे तृतीयपंथीयांना त्यांचे ओळख प्रमाणपत्र, ओळखपत्र देण्यात येत आहे. तृतीयपंथी नागरिकांना ‘नॅशनल पोर्टल फॉर ट्रान्सजेंडर पर्सन’ या केंद्र शासनाच्या पोर्टलद्वारे तृतीयपंथी असल्याचे प्रमाणपत्र आणि ओळखपत्र उपलब्ध करून देण्याची योजना आहे. त्या अंतर्गत. आतापर्यंत राज्यातून ४,४११ ओळखपत्रे दिली आहेत. महाराष्ट्रानंतर दुसरा ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121