३६००० फुटांवर पुन्हा विमानाचा थरार

    30-Sep-2018
Total Views | 15


 

 

नवी दिल्ली: विमानाच्या बिघाडाचे शुक्लकाष्ट काही संपत नाही असे दिसते आहे. हैद्राबाद विमानतळावरून निघालेले ७३७ एअरक्राफ्ट हे ३६००० फुटांवर पोहचले असता इंजिनच बंद पडल्याचे पायलटच्या लक्षात आले. प्रसंगावधान राखून त्यांनी इंदूर विमानतळावर इमरजन्सी लँडिंग केली. यामुळे विमानात असलेल्या १०३ प्रवाशांचा जीव भांड्यात पडला.

 

रविवारी सकाळी १०.४८ वाजता जेट एअरवेजच्या विमानाने १०३ प्रवाश्यांना घेऊन हैद्राबाद येथून उड्डाण केले होते. त्यानंतर ३६००० फूट म्हणजेच ११ किमी अंतर वर गेले असता अचानक तांत्रिक बिघाड झाला. त्यावेळी विमान ८५० किमी प्रति तास एवढी होती. तांत्रिक बिघाड झाल्याचे पायलटच्या लक्षात येताच त्यांनी इंदोर विमानतळावर तातडीने उतरवले. त्यानंतर त्यांनी विमानतळ प्राधिकरण आणि विमान कंपनीच्या तंत्रज्ञांना यांना कळवले.

 

जेट एअरवेजच्या बाबतीत ही गेल्या २ आठवड्यातली तिसरी घटना आहे. याआधी शुक्रवारी सायंकाळी मुंबईहून उड्डाण केलेल्या विमानामध्ये माजी उपमुख्यमंत्री छगऩ भुजबळ यांच्यासमवेत खासदार प्रीतम मुंडेंसह अन्य महत्वाचे पदाधिकारी, अधाकारी औरंगाबादला जात होते. यावेळी विमान अचानक खाली जाऊ लागले होते. या विमानचेही इमर्जन्सी लँडींग करण्यात आले. तसेच गेल्या आठवड्यात मुंबई- जयपूर विमानामध्ये हवेच्या दाबाचा बिघाड झाल्याने ३३ प्रवाशांच्या नाक आणि कानातून रक्त येऊ लागले होते. यामुळे त्यांना पुन्हा मुंबई विमानतळावर आणण्यात आले.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
अग्रलेख
जरुर वाचा
राहुल गांधी दुसरे आंबेडकर सिदध होतील - काँग्रेस नेते उदित राज यांच्या विधानावर जनतेत संताप

राहुल गांधी दुसरे आंबेडकर सिदध होतील - काँग्रेस नेते उदित राज यांच्या विधानावर जनतेत संताप

दिल्ली येथे काँगे्रसचे भागीदारी न्याय महासम्मेलन सुरू आहे. या संमेलनामध्ये काँग्रेसचे नेते यांनी राहुल गांधींची तुलना थेट महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी केली आहे. इतर मागासवर्गिय समाजाने राहुल गांधी यांचे एकावे त्यांना पाठिंबा द्यावा. मागासवर्बिय समाजाने तसे केले तर राहुल गांधी दुसरे आंबेडकर सिद्ध होतील असे उदित राज म्हणाले.इतर मागासवर्गिय समाजाला राहुल गांधीच्या समर्थनासाठी आवाहन करताना उदित राज यांनी राहुल गांधींना दुसरे डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणून सिद्ध होतील हे म्हंटले. त्यामुळे समाजात रोष पसरला ..

तृतीयपंथी नागरिकांना ओळखपत्र देण्यामध्ये महाराष्ट्र राज्य प्रथम क्रमांकावर

तृतीयपंथी नागरिकांना ओळखपत्र देण्यामध्ये महाराष्ट्र राज्य प्रथम क्रमांकावर

तृतीयपंथी नागरिकांना ओळखपत्र देण्यामध्ये महाराष्ट्र राज्य प्रथम क्रमांकावर आहे. तृतीयंपथीयांच्या हक्कांचे संरक्षण अधिनियम २०१९ मधील नियम २०२० अंतर्गत विभाग सहा आणि सात नुसार जिल्हास्तरीय समितीद्वारे तृतीयपंथीयांना त्यांचे ओळख प्रमाणपत्र, ओळखपत्र देण्यात येत आहे. तृतीयपंथी नागरिकांना ‘नॅशनल पोर्टल फॉर ट्रान्सजेंडर पर्सन’ या केंद्र शासनाच्या पोर्टलद्वारे तृतीयपंथी असल्याचे प्रमाणपत्र आणि ओळखपत्र उपलब्ध करून देण्याची योजना आहे. त्या अंतर्गत. आतापर्यंत राज्यातून ४,४११ ओळखपत्रे दिली आहेत. महाराष्ट्रानंतर दुसरा ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121