आशियाडमध्ये भारताची आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी

    01-Sep-2018
Total Views | 20



 

 

अखेरच्या दिवशी भारताला दोन सुवर्ण, एक रौप्य-कांस्य

 

जकार्ता : मागील १४ दिवसांपासून सुरु असलेल्या आशियाई खेळांचा मेळा म्हणजे आशियाड स्पर्धांचा थरार आज संपला. भारताने आज अखेरच्या दिवशी दोन सुवर्ण पदके पटकावत भारतीय चाहत्यांना गोड आठवणी दिल्या. बॉक्सर अमित पांघलने ४९ किलो वजनी गटात, तर प्रणब बर्धन-शिबनाथ सरकार या जोडीने ब्रिज या पत्त्यांच्या क्रीडा प्रकारा पुरुष दुहेरी गटात सुवर्णपदकावर नाव कोरले.
 
 
याशिवाय भारताने दिवसभरात स्क्वॉशमध्ये एका रौप्यपदकाची कमाई करून एकूण पदकसंख्या ६९ वर नेली. तर भारताच्या पुरुष हॉकी संघाने पाकिस्तानला धूळ चारत कांस्यपदक मिळवले आणि भारताला पदकांची सत्तरी गाठून दिली. विशेष म्हणजे आशियाड स्पर्धांच्या इतिहासातली भारताची ही आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे. यंदाच्या आशियाडमध्ये भारताने सर्वाधिक ७० पदके मिळवली आहेत. भारताने याआधी गुआंगझू येथे झालेल्या २०१० सालच्या आशियाड स्पर्धेत ६५ पदके पटकावली होती.
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

अग्रलेख
जरुर वाचा
राज ठाकरेंची पक्षसंघटनेवर आचारसंहिता! म्हणाले, मला विचारल्याशिवाय...

राज ठाकरेंची पक्षसंघटनेवर आचारसंहिता! म्हणाले, "मला विचारल्याशिवाय..."

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षातील सर्व नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना एक ठाम आणि स्पष्ट आदेश दिला आहे. राज ठाकरे यांनी सांगितले की, "पक्षातील कोणताही नेता, कार्यकर्ता, प्रतिनिधी यांनी कोणत्याही वृत्तपत्र, वृत्तवाहिनी किंवा डिजिटल माध्यमांशी संपर्क साधू नये. तसेच, स्वतःचे मत व्हिडीओच्या माध्यमातून सोशल मीडियावर अपलोड करणेही थांबवावे." याशिवाय, त्यांनी पक्षाचे अधिकृत प्रवक्ते यांनाही इशारा दिला आहे. राज ठाकरे म्हणाले, "ज्यांना अधिकृत प्रवक्त्याची जबाबदारी दिली आहे त्यांनी सुद्धा माझी परवानगी घेतल्याशिवाय ..

महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुनर्रचनेची अधिसूचना जाहीर ; पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या पाठपुराव्याला यश

महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुनर्रचनेची अधिसूचना जाहीर ; पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या पाठपुराव्याला यश

राज्यातील विविध विकास कामे व प्रकल्पांना किनारी क्षेत्र नियमन (सीआरझेड) अंतर्गत वेळेवर मंजुरी मिळावी यासाठी महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण पुनर्रचना व्हावी यासाठी राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या या प्रयत्नांना अखेर यश मिळाले असून, केंद्र सरकारच्या पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण पुनर्रचित करत अधिसूचना जारी केली आहे...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121