एलपीजीऐवजी इतर इंधनासाठी मिळणार अनुदान

    15-Jul-2018
Total Views | 25



 

नवी दिल्‍ली : एलपीजीऐवजी स्वयंपाकासाठी वापरल्या जाणार्‍या जैववायू व पाईपद्वारे पुरवठा करण्यात येणार्‍या गॅसवर अनुदान देण्याच्या प्रस्तावावर सध्या नीति आयोग कार्य करीत आहे, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकार्‍याने दिली.
 

“स्वयंपाकासाठी वापरल्या जाणार्‍या सर्व प्रकारच्या इंधनासाठी अनुदान दिले जाईल,” असे नीति आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार यांनी सांगितले. सध्या केंद्र सरकार एलपीजी गॅसवर अनुदान देत आहे. एलपीजीऐवजी स्वयंपाकासाठी अनुदान देण्यासाठी सादर करण्यात आलेल्या प्रस्तावावर सध्या नीति आयोग कार्य करीत आहे. एलपीजी हे एक विशिष्ट उत्पादन असून, स्वयंपाकासाठी वापर केल्या जाणार्‍या सर्वच इंधनांवर अनुदान दिले जाईल, असे त्यांनी सांगितले. स्वयंपाकासाठी वापरल्या जाणार्‍या सर्वच प्रकारच्या इंधनांवर अनुदान दिले जाईल. कारण, काही शहरांमध्ये पीएनजीचा (पाइप नॅचरल गॅस) वापर केला जातो. त्यामुळे अनुदानाची व्याप्ती वाढवणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले.

 

राष्ट्रीय ऊर्जा धोरण २०३० च्या मसुद्यात या बदलाचा समावेश होण्याची शक्यता आहे. हा मसुदा मागील वर्षी जाहीर करण्यात आला होता. मंत्रिमंडळासोबत सल्लामसलत केल्यावर हे धोरण कॅबिनेटसमोर ठेवले जाणार आहे. हा बदल झाल्यावर एलपीजी ग्राहकांना बाजारमूल्याप्रमाणे सिलिंडर विकत घ्यावे लागेल. सध्या केंद्र सरकार वर्षभरात १४ .२ किलो वजनाच्या १२ एलपीजी सिलिंडरवर अनुदान देते. हे अनुदान थेट ग्राहकाच्या खात्यात जमा केले जाते.

अग्रलेख
जरुर वाचा
राज ठाकरेंची पक्षसंघटनेवर आचारसंहिता! म्हणाले, मला विचारल्याशिवाय...

राज ठाकरेंची पक्षसंघटनेवर आचारसंहिता! म्हणाले, "मला विचारल्याशिवाय..."

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षातील सर्व नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना एक ठाम आणि स्पष्ट आदेश दिला आहे. राज ठाकरे यांनी सांगितले की, "पक्षातील कोणताही नेता, कार्यकर्ता, प्रतिनिधी यांनी कोणत्याही वृत्तपत्र, वृत्तवाहिनी किंवा डिजिटल माध्यमांशी संपर्क साधू नये. तसेच, स्वतःचे मत व्हिडीओच्या माध्यमातून सोशल मीडियावर अपलोड करणेही थांबवावे." याशिवाय, त्यांनी पक्षाचे अधिकृत प्रवक्ते यांनाही इशारा दिला आहे. राज ठाकरे म्हणाले, "ज्यांना अधिकृत प्रवक्त्याची जबाबदारी दिली आहे त्यांनी सुद्धा माझी परवानगी घेतल्याशिवाय ..

महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुनर्रचनेची अधिसूचना जाहीर ; पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या पाठपुराव्याला यश

महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुनर्रचनेची अधिसूचना जाहीर ; पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या पाठपुराव्याला यश

राज्यातील विविध विकास कामे व प्रकल्पांना किनारी क्षेत्र नियमन (सीआरझेड) अंतर्गत वेळेवर मंजुरी मिळावी यासाठी महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण पुनर्रचना व्हावी यासाठी राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या या प्रयत्नांना अखेर यश मिळाले असून, केंद्र सरकारच्या पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण पुनर्रचित करत अधिसूचना जारी केली आहे...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121