रेल्वे प्रशासनातर्फे स्वच्छता जनजागृती रॅली

    23-Jun-2018
Total Views | 19
 

 
रेल्वे प्रशासनातर्फे स्वच्छता जनजागृती रॅली

 
भुसावळ, 23 जून
मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात डीआरएम कार्यालयातर्फे शनिवारी २३  रोजी स्वच्छतेबद्दल जनजागृती करण्यासाठी रॅलीचे आयोजन करण्यात आले.यात रेल्वे कर्मचाऱ्यासह  रेल्वेच्या शाळेचे विद्यार्थी सहभागी झाले.
 
रॅलीचा शुभारंभ डीआरएम आरा.के.यादव यांच्याहस्ते करण्यात आला. ही रॅली डीआरएम कार्यालयापासून सुरु होवून द.शि.विद्यालयाच्या समोरुन हंबर्डीकर चौकातुन रेल्वे स्थानका समोर समाप्त झाली.रॅलीमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती करण्याबाबत विविध घोषणा देण्यात आल्या . रॅलीमधील आकर्षक फलक नागरिकांचे लक्षवेधत होते. यावेळीआपल्या आसपासचा परिसर स्वच्छ ठेवण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले.
या रॅलीत डीआरएम आर.के.यादव, एडीआरएम  मनोज सिन्हा सर्व विभागांचे प्रमुख , रेल्वेच्या शाळेचे शिक्षक व विद्यार्थी सहभागी होते.
 
रेल्वे स्थानकावर पथनाटय
रेल्वे प्रशासनातर्फे शुक्रवाररोजी स्थानकावर पथनाटयाव्दारे स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यात आली. रेल्वेच्या विद्यालयातील इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थांनी पथनाटय सादर केले. यावेळी रेल्वेच्या विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.
अग्रलेख
जरुर वाचा
राज ठाकरेंची पक्षसंघटनेवर आचारसंहिता! म्हणाले, मला विचारल्याशिवाय...

राज ठाकरेंची पक्षसंघटनेवर आचारसंहिता! म्हणाले, "मला विचारल्याशिवाय..."

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षातील सर्व नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना एक ठाम आणि स्पष्ट आदेश दिला आहे. राज ठाकरे यांनी सांगितले की, "पक्षातील कोणताही नेता, कार्यकर्ता, प्रतिनिधी यांनी कोणत्याही वृत्तपत्र, वृत्तवाहिनी किंवा डिजिटल माध्यमांशी संपर्क साधू नये. तसेच, स्वतःचे मत व्हिडीओच्या माध्यमातून सोशल मीडियावर अपलोड करणेही थांबवावे." याशिवाय, त्यांनी पक्षाचे अधिकृत प्रवक्ते यांनाही इशारा दिला आहे. राज ठाकरे म्हणाले, "ज्यांना अधिकृत प्रवक्त्याची जबाबदारी दिली आहे त्यांनी सुद्धा माझी परवानगी घेतल्याशिवाय ..

महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुनर्रचनेची अधिसूचना जाहीर ; पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या पाठपुराव्याला यश

महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुनर्रचनेची अधिसूचना जाहीर ; पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या पाठपुराव्याला यश

राज्यातील विविध विकास कामे व प्रकल्पांना किनारी क्षेत्र नियमन (सीआरझेड) अंतर्गत वेळेवर मंजुरी मिळावी यासाठी महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण पुनर्रचना व्हावी यासाठी राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या या प्रयत्नांना अखेर यश मिळाले असून, केंद्र सरकारच्या पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण पुनर्रचित करत अधिसूचना जारी केली आहे...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121