नवी दिल्ली : सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरुद्धचा महाभियोग प्रस्ताव आज उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी फेटाळला आहे. काँग्रेसने दिलेल्या महाभियोग प्रस्तावावर ७१ खासदारांपैकी केवळ ७ निवृत्त खासदारांच्या सह्या असल्याने व्यंकय्या नायडू यांनी हा प्रस्ताव फेटाळून लावला आहे. यामुळे विरोधकांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे.
या महाभियोग प्रस्तावामुळे भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेसमध्ये राजकारण पेटले होते. आता याचा निर्णय उपराष्ट्रपती यांनी घोषित केला आहे. राजकीय द्वेषामुळे काँग्रेसने हा प्रस्ताव मांडला होता असे म्हटले जात होते. यातून काँग्रेसला राजकारण करायचे होते असा आरोप भाजपने केला होता.
१ डिसेंबर २०१४ साली न्यायमूर्ती लोया यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला होता. ते आपल्या मित्राच्या मुलीच्या लग्नाला गेले असताना हि घटना घडली होती. न्यायमूर्ती लोया हे सोहराबुद्दीन एन्काऊंटर प्रकरणात सी.बी.आय न्यायालयाचे न्यायाधीश होते. आणि म्हणून त्यांच्या मृत्यूचा राजकीय संबंध लावण्याचा प्रकार काही कॉंग्रेसी नेत्यांनी केला. मात्र आज त्याचे स्पष्टीकरण सर्वोच्च न्यायालयाने दिले आहे.