‘जैन’च्या मसाले प्रक्रिया प्रकल्पाचे उद्या उद्घाटन

    29-Mar-2018
Total Views | 27

मुख्यमंत्र्यांची प्रमुख उपस्थिती

 
 
जळगाव:
जैन इरिगेशन सिस्टिम्स लि.ची सहयोगी कंपनी जैन फार्मफ्रेश फुडसच्या मसाले प्रक्रिया प्रकल्पाचे उद्घाटन शुक्रवार, ३० रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते सकाळी ११.१५ ला होणार आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार हे अध्यक्षस्थानी राहतील. जैन फुड पार्क येथे हा कार्यक्रम होईल.
 
 
सर्वसामान्य नागरिकांना देखील उच्च प्रतिच्या मसाल्याची चव चाखता यावी, या प्रमुख उद्देशाने या प्रकल्पाची निर्मिती करण्यात आलेली आहे. या मसाले प्रक्रिया प्रकल्पाची वार्षिक क्षमता २४ हजार टन इतकी आहे. यामध्ये आलं, लसुण, कांदा, मिरची यांची पेस्ट तयार केली जाईल. त्याप्रमाणे कोरडा मसाला देखील तयार केला जाणार आहे. या प्रकल्पासाठी १०० कोटींची गुंतवणूक करण्यात आली असून, त्यासाठी लागणारा कच्चा माल जळगाव, धुळे, नंदुरबारसह मध्यप्रदेश व गुजरातला लागून असलेल्या परिसरातील शेतकर्‍यांकडून घेतला जाणार आहे. प्रकल्पातून तयार होणारा माल सुरुवातीच्या काळात निर्यात केला जाणार आहे. आगामी काळात भारतात उपलब्ध होणार आहे. मसाले प्रक्रिया प्रकल्प उद्घाटन सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन जैन इरिगेशचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक अनिल जैन यांनी केले आहे. या उद्घाटन सोहळ्यास पालकमंत्री तथा महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील, जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्यासह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.
अग्रलेख
जरुर वाचा
राज ठाकरेंची पक्षसंघटनेवर आचारसंहिता! म्हणाले, मला विचारल्याशिवाय...

राज ठाकरेंची पक्षसंघटनेवर आचारसंहिता! म्हणाले, "मला विचारल्याशिवाय..."

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षातील सर्व नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना एक ठाम आणि स्पष्ट आदेश दिला आहे. राज ठाकरे यांनी सांगितले की, "पक्षातील कोणताही नेता, कार्यकर्ता, प्रतिनिधी यांनी कोणत्याही वृत्तपत्र, वृत्तवाहिनी किंवा डिजिटल माध्यमांशी संपर्क साधू नये. तसेच, स्वतःचे मत व्हिडीओच्या माध्यमातून सोशल मीडियावर अपलोड करणेही थांबवावे." याशिवाय, त्यांनी पक्षाचे अधिकृत प्रवक्ते यांनाही इशारा दिला आहे. राज ठाकरे म्हणाले, "ज्यांना अधिकृत प्रवक्त्याची जबाबदारी दिली आहे त्यांनी सुद्धा माझी परवानगी घेतल्याशिवाय ..

महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुनर्रचनेची अधिसूचना जाहीर ; पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या पाठपुराव्याला यश

महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुनर्रचनेची अधिसूचना जाहीर ; पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या पाठपुराव्याला यश

राज्यातील विविध विकास कामे व प्रकल्पांना किनारी क्षेत्र नियमन (सीआरझेड) अंतर्गत वेळेवर मंजुरी मिळावी यासाठी महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण पुनर्रचना व्हावी यासाठी राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या या प्रयत्नांना अखेर यश मिळाले असून, केंद्र सरकारच्या पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण पुनर्रचित करत अधिसूचना जारी केली आहे...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121